नंदुरबार : भाजप सरकारचा वर्षपूर्ती कार्यक्रम छोटेखानी स्वरूपात जळगावचे खासदार ए.टी. पाटील यांच्या उपस्थितीत झाला. परंतु स्थानिक खासदार व आमदारांना ऐनवेळी कळविण्यात आल्याने त्यांनी पाठ फिरवल्याने कार्यकत्र्यामध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यानिमित्त जिल्हास्तरावर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. नंदुरबारची जबाबदारी खासदार ए.टी. पाटील यांच्याकडे आहे. शनिवारी ते नंदुरबारात आलेदेखील. परंतु मोजक्याच पदाधिकारी आणि कार्यकत्र्याच्या उपस्थितीत त्यांनी बैठक घेतली. नंतर पत्रकार परिषद घेतली. परंतु या वेळी स्थानिक खासदार किंवा दोन आमदारांपैकी एकही आमदार उपस्थित नव्हते. ऐनवेळी कळविण्यात आल्याने खासदार व आमदार येऊ शकले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘वर्षपूर्ती’ कार्यक्रमाला ‘बुरे दिन’
By admin | Updated: November 1, 2015 00:30 IST