शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

‘अवकाळी’ जळगाव जिल्ह्याची पाठ सोडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिला असून, वादळी वाऱ्यासह शनिवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिला असून, वादळी वाऱ्यासह शनिवारी रात्री विजांच्या कडकडाटाह जोरदार पाऊस झाला. यामुळे केळीसह इतरही फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने बळिराजावर पुन्हा एकदा संकट ओढावले आहे.

पावसाळ्यात अतिपावसामुळे फटका बसल्यानंतर रब्बी हंगामाकडून मोठ्या अपेक्षा असलेल्या बळिराजाला दर महिन्याला अवकाळी पावसाला सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात दोन हजारांहून अधिक हेक्‍टर क्षेत्रावरील केळीचे पीक भुईसपाट झाल्यानंतर शनिवारी पुन्हा अवकाळी पाऊस होऊन रावेर, यावल, चोपडा, बोदवड, एरंडोल या तालुक्यांतदेखील अवकाळी पावसामुळे केळीसह पपई, पेरू, लिंबू, डाळिंब या पिकांचेदेखील नुकसान झाले. ३५०हून अधिक हेक्‍टर क्षेत्रावर हे नुकसान असून, गुरुवार व शनिवारचे नुकसान पाहता अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक नष्ट झाले आहे.

या पाच तालुक्यांसह जळगावसह इतर तालुक्यांमध्येदेखील शनिवारी मध्यरात्री विजांच्या कटकडाटात जोरदार पाऊस झाला. या भागातदेखील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, प्रत्यक्ष पंचनामे सुरू झाल्यानंतर एकूण नुकसान स्पष्ट होणार आहे. या अवकाळी पावसामुळे व चक्रीवादळामुळे विजेचे खांबदेखील पडल्याने निम्म्याहून अधिक जळगाव शहर अंधारात होते. यासोबतच हतनूर धरण क्षेत्रात ५८ मिलिमीटर पाऊस झाल्याने धरणाची पातळी १५ सेंटिमीटरने वाढली. मात्र, रविवारी दुपारी उन्हामुळे पाच सेंटिमीटरने कमी झाली.