शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
5
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
6
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
7
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
8
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
9
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
10
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
11
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
12
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
13
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
14
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
15
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
16
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
17
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
18
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
19
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
20
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा

‘अवकाळी’ जळगाव जिल्ह्याची पाठ सोडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिला असून, वादळी वाऱ्यासह शनिवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिला असून, वादळी वाऱ्यासह शनिवारी रात्री विजांच्या कडकडाटाह जोरदार पाऊस झाला. यामुळे केळीसह इतरही फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने बळिराजावर पुन्हा एकदा संकट ओढावले आहे.

पावसाळ्यात अतिपावसामुळे फटका बसल्यानंतर रब्बी हंगामाकडून मोठ्या अपेक्षा असलेल्या बळिराजाला दर महिन्याला अवकाळी पावसाला सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात दोन हजारांहून अधिक हेक्‍टर क्षेत्रावरील केळीचे पीक भुईसपाट झाल्यानंतर शनिवारी पुन्हा अवकाळी पाऊस होऊन रावेर, यावल, चोपडा, बोदवड, एरंडोल या तालुक्यांतदेखील अवकाळी पावसामुळे केळीसह पपई, पेरू, लिंबू, डाळिंब या पिकांचेदेखील नुकसान झाले. ३५०हून अधिक हेक्‍टर क्षेत्रावर हे नुकसान असून, गुरुवार व शनिवारचे नुकसान पाहता अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक नष्ट झाले आहे.

या पाच तालुक्यांसह जळगावसह इतर तालुक्यांमध्येदेखील शनिवारी मध्यरात्री विजांच्या कटकडाटात जोरदार पाऊस झाला. या भागातदेखील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, प्रत्यक्ष पंचनामे सुरू झाल्यानंतर एकूण नुकसान स्पष्ट होणार आहे. या अवकाळी पावसामुळे व चक्रीवादळामुळे विजेचे खांबदेखील पडल्याने निम्म्याहून अधिक जळगाव शहर अंधारात होते. यासोबतच हतनूर धरण क्षेत्रात ५८ मिलिमीटर पाऊस झाल्याने धरणाची पातळी १५ सेंटिमीटरने वाढली. मात्र, रविवारी दुपारी उन्हामुळे पाच सेंटिमीटरने कमी झाली.