शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

‘अवकाळी’ जळगाव जिल्ह्याची पाठ सोडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिला असून, वादळी वाऱ्यासह शनिवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिला असून, वादळी वाऱ्यासह शनिवारी रात्री विजांच्या कडकडाटाह जोरदार पाऊस झाला. यामुळे केळीसह इतरही फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने बळिराजावर पुन्हा एकदा संकट ओढावले आहे.

पावसाळ्यात अतिपावसामुळे फटका बसल्यानंतर रब्बी हंगामाकडून मोठ्या अपेक्षा असलेल्या बळिराजाला दर महिन्याला अवकाळी पावसाला सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात दोन हजारांहून अधिक हेक्‍टर क्षेत्रावरील केळीचे पीक भुईसपाट झाल्यानंतर शनिवारी पुन्हा अवकाळी पाऊस होऊन रावेर, यावल, चोपडा, बोदवड, एरंडोल या तालुक्यांतदेखील अवकाळी पावसामुळे केळीसह पपई, पेरू, लिंबू, डाळिंब या पिकांचेदेखील नुकसान झाले. ३५०हून अधिक हेक्‍टर क्षेत्रावर हे नुकसान असून, गुरुवार व शनिवारचे नुकसान पाहता अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक नष्ट झाले आहे.

या पाच तालुक्यांसह जळगावसह इतर तालुक्यांमध्येदेखील शनिवारी मध्यरात्री विजांच्या कटकडाटात जोरदार पाऊस झाला. या भागातदेखील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, प्रत्यक्ष पंचनामे सुरू झाल्यानंतर एकूण नुकसान स्पष्ट होणार आहे. या अवकाळी पावसामुळे व चक्रीवादळामुळे विजेचे खांबदेखील पडल्याने निम्म्याहून अधिक जळगाव शहर अंधारात होते. यासोबतच हतनूर धरण क्षेत्रात ५८ मिलिमीटर पाऊस झाल्याने धरणाची पातळी १५ सेंटिमीटरने वाढली. मात्र, रविवारी दुपारी उन्हामुळे पाच सेंटिमीटरने कमी झाली.