शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

दहा वर्षांत हिवाळ्यातील किमान तापमानाच्या सरासरीत ३ अंशांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:13 IST

हवामान बदलाचा परिणाम : रब्बीवर परिणाम होण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क - हिवाळ्याचा कालावधी नोव्हेंबर ते मार्च - पाच ...

हवामान बदलाचा परिणाम : रब्बीवर परिणाम होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

- हिवाळ्याचा कालावधी

नोव्हेंबर ते मार्च

- पाच महिन्यांतील किमान तापमानाची सरासरी

१४ अंश

- यंदाची किमान तापमानाची सरासरी

१७ अंश

गेल्या दहा वर्षांतील हिवाळ्यातील किमान तापमानाची सरासरी

२०११ -१२ - १२ अंश

२०१२ -१३ - १३ अंश

२०१३ -१४ - १४ अंश

२०१४ -१५ - १५ अंश

२०१५ -१६ - १४ अंश

२०१६ -१७ - १३ अंश

२०१७ -१८ - १४ अंश

२०१८ - १९ - १३ अंश

२०१९ - २० - १६ अंश

२०२० - २१ - १७ अंश

जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत असून, त्याचा परिणाम तीनही ऋतूंवर पडलेला दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. तर उन्हाळ्यातील तापमानात वाढ होऊन उन्हाळा जूनपर्यंत लांबला आहे. तर हिवाळ्यातदेखील आता थंडीच्या प्रमाणात घट होत असून, गेल्या दहा वर्षांत हिवाळ्यातील किमान तापमानाच्या सरासरीत ३ ते ४ अंशाची वाढ झाली आहे. थंडीचे प्रमाण कमी होऊन पावसाळ्याच्या सरासरीत वाढ व तापमानातदेखील वाढ होत आहे.

काय परिणाम होईल

बदलत्या हवामानामुळे गेल्या दोन वर्षांचा विचार केल्यास रब्बीचा हंगाम नेहमी नोव्हेंबर ते मार्चपर्यंत घेतला जात होता. तो हंगाम आता डिसेंबर ते एप्रिलपर्यंत लांबत आहे. तसेच थंडीचे प्रमाण कमी झाल्यास रब्बीतील गहू, हरभऱ्याचा पिकांवरदेखील परिणाम होण्याची शक्यता आहे. गहूची वाढ खुंटेल व उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. पावसाचा हंगाम लांबत असल्याने उडीद व मूग या पिकांचे दरवर्षी नुकसान होऊन हे पीक पाण्यातच जाण्याची शक्यता आहे.

तापमानात वाढ होण्याचे कारण

हवामान बदलामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. यंदा अरबी समुद्रात अल निनोचा प्रभाव कमी झाल्याने, पाऊस चांगला झाला. मात्र, आता ला लिनाचा प्रभाव वाढला आहे. दक्षिण अमेरिकेकडून दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून बाष्पयुक्त वारे अरबी व हिंदी महासागरात दाखल होत आहेत. या वाऱ्यांना लॅटिन भाषेत ला लिना असे संबोधले जाते. आधीच समुद्राच्या पाण्याच्या तापमानात वाढ होत असल्याने चक्रीवादळांची स्थिती निर्माण होत असल्याने, दुसरीकडे बाष्पयुक्त वाऱ्यांचा मिलाप होत असल्याने यंदा हिवाळ्यातही पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार डिसेंबर व जानेवारी महिन्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच फेब्रुवारी व मार्च महिन्यातदेखील गारपीट व अवकाळी पावसाची शक्यता आहे.

कोट..

शेतकऱ्यांनी बियाणांमध्ये बदल करण्याची गरज आहे. पावसाळ्यात मूग, उडीदचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी मूगची लागवड करण्याची गरज आहे. यासह हवमान बदलामुळे तापमानात होणारी वाढ लक्षात घेता शेतकऱ्यांनी बांधावर वृक्षांची लागवड करण्याची गरज आहे. हवामान बदलामुळे पारंपरिक शेतीला फटका बसण्याची शक्यता आहे.

- समाधान रतन पाटील, कृषी तज्ज्ञ,

हवामानात दिवसेंदिवस बदल होत आहेत. समुद्रावरील तापमानात वाढ होत आहे. यामुळे सातत्याने चक्रीवादळं तयार होत आहेत. यामुळे हिवाळ्यातही अवकाळी पावसाची स्थिती आता कायमच राहण्याची शक्यता आहे. या वादळांमुळे उत्तरेकडील थंड वारे अडविले जात आहेत. यामुळे थंडीच्या प्रमाणात घट होत आहे. हवामान कोरडे राहिले तर थंडीचा कडाकादेखील वाढू शकतो.

- नीलेश गोरे, हवामान तज्ज्ञ, संचालक, वेलनेस वेदर