शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांत हिवाळ्यातील किमान तापमानाच्या सरासरीत ३ अंशांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:13 IST

हवामान बदलाचा परिणाम : रब्बीवर परिणाम होण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क - हिवाळ्याचा कालावधी नोव्हेंबर ते मार्च - पाच ...

हवामान बदलाचा परिणाम : रब्बीवर परिणाम होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

- हिवाळ्याचा कालावधी

नोव्हेंबर ते मार्च

- पाच महिन्यांतील किमान तापमानाची सरासरी

१४ अंश

- यंदाची किमान तापमानाची सरासरी

१७ अंश

गेल्या दहा वर्षांतील हिवाळ्यातील किमान तापमानाची सरासरी

२०११ -१२ - १२ अंश

२०१२ -१३ - १३ अंश

२०१३ -१४ - १४ अंश

२०१४ -१५ - १५ अंश

२०१५ -१६ - १४ अंश

२०१६ -१७ - १३ अंश

२०१७ -१८ - १४ अंश

२०१८ - १९ - १३ अंश

२०१९ - २० - १६ अंश

२०२० - २१ - १७ अंश

जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत असून, त्याचा परिणाम तीनही ऋतूंवर पडलेला दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. तर उन्हाळ्यातील तापमानात वाढ होऊन उन्हाळा जूनपर्यंत लांबला आहे. तर हिवाळ्यातदेखील आता थंडीच्या प्रमाणात घट होत असून, गेल्या दहा वर्षांत हिवाळ्यातील किमान तापमानाच्या सरासरीत ३ ते ४ अंशाची वाढ झाली आहे. थंडीचे प्रमाण कमी होऊन पावसाळ्याच्या सरासरीत वाढ व तापमानातदेखील वाढ होत आहे.

काय परिणाम होईल

बदलत्या हवामानामुळे गेल्या दोन वर्षांचा विचार केल्यास रब्बीचा हंगाम नेहमी नोव्हेंबर ते मार्चपर्यंत घेतला जात होता. तो हंगाम आता डिसेंबर ते एप्रिलपर्यंत लांबत आहे. तसेच थंडीचे प्रमाण कमी झाल्यास रब्बीतील गहू, हरभऱ्याचा पिकांवरदेखील परिणाम होण्याची शक्यता आहे. गहूची वाढ खुंटेल व उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. पावसाचा हंगाम लांबत असल्याने उडीद व मूग या पिकांचे दरवर्षी नुकसान होऊन हे पीक पाण्यातच जाण्याची शक्यता आहे.

तापमानात वाढ होण्याचे कारण

हवामान बदलामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. यंदा अरबी समुद्रात अल निनोचा प्रभाव कमी झाल्याने, पाऊस चांगला झाला. मात्र, आता ला लिनाचा प्रभाव वाढला आहे. दक्षिण अमेरिकेकडून दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून बाष्पयुक्त वारे अरबी व हिंदी महासागरात दाखल होत आहेत. या वाऱ्यांना लॅटिन भाषेत ला लिना असे संबोधले जाते. आधीच समुद्राच्या पाण्याच्या तापमानात वाढ होत असल्याने चक्रीवादळांची स्थिती निर्माण होत असल्याने, दुसरीकडे बाष्पयुक्त वाऱ्यांचा मिलाप होत असल्याने यंदा हिवाळ्यातही पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार डिसेंबर व जानेवारी महिन्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच फेब्रुवारी व मार्च महिन्यातदेखील गारपीट व अवकाळी पावसाची शक्यता आहे.

कोट..

शेतकऱ्यांनी बियाणांमध्ये बदल करण्याची गरज आहे. पावसाळ्यात मूग, उडीदचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी मूगची लागवड करण्याची गरज आहे. यासह हवमान बदलामुळे तापमानात होणारी वाढ लक्षात घेता शेतकऱ्यांनी बांधावर वृक्षांची लागवड करण्याची गरज आहे. हवामान बदलामुळे पारंपरिक शेतीला फटका बसण्याची शक्यता आहे.

- समाधान रतन पाटील, कृषी तज्ज्ञ,

हवामानात दिवसेंदिवस बदल होत आहेत. समुद्रावरील तापमानात वाढ होत आहे. यामुळे सातत्याने चक्रीवादळं तयार होत आहेत. यामुळे हिवाळ्यातही अवकाळी पावसाची स्थिती आता कायमच राहण्याची शक्यता आहे. या वादळांमुळे उत्तरेकडील थंड वारे अडविले जात आहेत. यामुळे थंडीच्या प्रमाणात घट होत आहे. हवामान कोरडे राहिले तर थंडीचा कडाकादेखील वाढू शकतो.

- नीलेश गोरे, हवामान तज्ज्ञ, संचालक, वेलनेस वेदर