शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
2
ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले
3
पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...
4
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
5
कॅनडाच्या 'त्या' जाहिरातीत असं काय होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला? व्यापार करार रोखला!
6
विवाहित महिला पुतण्याच्या प्रेमात पडली, लिव्ह-इनमध्ये राहिली; वाद सुरू होताच आयुष्य संपवलं! आता पती म्हणाला...
7
IND vs AUS : DSP सिराजला 'रिमांड'वर घेण्याच्या मूडमध्ये होता हेड; पण त्याच्यावरच आली ‘अरेस्ट’ होण्याची वेळ
8
Manifestation Tips: पैसा, मनःशांती, समाधान, जे हवं ते सगळं मिळेल; फक्त रोज करा 'हे' तीन उपाय
9
परेश रावल यांनी 'दृश्यम ३'ला दिला नकार; कारण सांगत म्हणाले, "स्क्रिप्ट खूप चांगली आहे पण..."
10
LG सारख्या लिस्टिंगचे संकेत देतोय 'हा' आयपीओ; २९ तारखेपासून खुला होणार, किती आहे GMP, पाहा डिटेल्स
11
थायलंडच्या 'मातृतुल्य' पूर्व महाराणी सिरिकिट यांचे निधन, दीर्घकाळ आजाराशी दिली झुंज
12
Marriage Astro Tips: लग्न ठरवताना घाई केली, तर भविष्यात हर्षल नेपच्युन देऊ शकतो धोका!
13
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
14
हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली
15
"हा फक्त सिनेमा नाही तर एक यज्ञ आहे"; 'रामायण' सिनेमात लक्ष्मण साकारणाऱ्या अभिनेत्याची भावना
16
प्रामाणिक करदात्यांसोबत नम्रपणे वागा, बेईमानी करणाऱ्या.., पाहा अधिकाऱ्यांना काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?
17
"मुलाला टाक, आपण लग्न करू..."; 'आई' असणाऱ्या गर्लफ्रेंडने नकार देताच बॉयफ्रेंडने चिमुकल्याला संपवलं!
18
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
19
'साथिया'फेम अभिनेत्री संध्या मृदुलला मिळेना काम; म्हणाली, "भाई, हा काय नवीन सीन आहे..."
20
घरातून मांजरीची पिल्ले गायब झाली, संतापलेली पुतणी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली; काका-काकूंवर दाखल केला FIR! 

दडपलेला इतिहास ‘हे मृत्युंजय’ नाटकातून मांडण्याचा प्रयत्न - स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांचे नातू रणजित सावरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:32 IST

आताच्या पिढीला खरा इतिहास सांगण्याची गरज

जळगाव : क्रांतिकारक हे काही वेडे नव्हते. त्यांनी स्वातंत्र्यासाठी आखलेल्या योजना आणि स्वत:च्या प्राणाची दिलेली आहुती, हा दडपलेला इतिहास आता पुढे येऊ लागला आहे आणि विशेष म्हणजे देश आता व्यावहारिक होत आहे. ही एक समाधानकारक बाब आहे, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी केले.‘हे मृत्यूंजय’ या नाटकाच्या निमित्ताने ते बुधवारी जळगावात आले. दुपारी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील ‘लोकमत’च्या शहर कार्यालयाला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.क्रांतिकारकांच्या आयुष्यावर आणि त्यांनी घडवलेल्या क्रांतिकारी इतिहासावर ‘हे मृत्यूंजय’ हे नाटक आम्ही तयार केले आहे. खरा इतिहास हा आताच्या पिढीला शिकवला गेला पाहिजे, यासाठी हे नाटक आम्ही ठिकठिकाणी नव्या पिढीसमोर दाखवत आहोत. याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले. आताची पिढी बेजबाबदार आहे, असे म्हटले जाते. पण आताची पिढी उलट जास्त जबाबदारपणे वागत आहे. मात्र ती भरकटता कामा नये. त्यामुळे त्यांच्यासमोर खरा इतिहास आला पाहिजे, यासाठी ‘हे मृत्यूंजय’ हे नाटक आम्ही तरुणांपर्यंत पोहोचवत आहोत. सावरकरांचा इतिहास या नाटकातून मांडण्यात आला आहे. सावरकर यांना द्दष्टी होती, उंची होती. या नाटकातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने आपल्या आयुष्याची उंंची वाढवावी, असे आवाहन सावरकर यांनी केले. शासनाने येथील तरूण पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारा, खरा इतिहास अभ्यासक्रमात अंतर्भूत केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.आपल्याला स्वातंत्र्य मिळाले नाही तर आपण ते मिळवले आहे, हे तरूणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. भारतावर तुर्क, मुघल व नंतर ब्रिटीशांनी राज्य केले. त्यामुळे ७०० वर्षे भारतीय स्वातंत्र्यलढा चालला आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळाले. इतिहास हा बदलत नाही. पण त्याचे प्रकटीकरण केले जाते. त्यामुळेच दुर्लक्षित राहिलेला क्रांतिकारकांचा इतिहास आता नव्याने पुढे येत आहे. क्रांतिकारकांचा इतिहास हा आताच्या तरूणांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.यावेळी सावरकर यांच्यासोबत वृत्तनिवेदिका मंजिरी मराठे याही उपस्थित होत्या.सध्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्यासमोर असा धगधगता इतिहास मांडला तर त्यांना मनोबल मिळू शकेल. क्रांतिकारकांच्या इतिहासापासून त्यांना प्रेरणा मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे दैवत म्हणून न पाहता त्यांच्या योजनांकडे, त्यांच्या दूरद्दष्टीकडे पहावे, असे ते म्हणाले.हे मृत्यूंजय नाटकाचे जवाहरलाल नेहरु विद्यापीठात ३ आणि दिल्ली विद्यापीठात एक प्रयोग झाल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव