शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

दडपलेला इतिहास ‘हे मृत्युंजय’ नाटकातून मांडण्याचा प्रयत्न - स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांचे नातू रणजित सावरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:32 IST

आताच्या पिढीला खरा इतिहास सांगण्याची गरज

जळगाव : क्रांतिकारक हे काही वेडे नव्हते. त्यांनी स्वातंत्र्यासाठी आखलेल्या योजना आणि स्वत:च्या प्राणाची दिलेली आहुती, हा दडपलेला इतिहास आता पुढे येऊ लागला आहे आणि विशेष म्हणजे देश आता व्यावहारिक होत आहे. ही एक समाधानकारक बाब आहे, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी केले.‘हे मृत्यूंजय’ या नाटकाच्या निमित्ताने ते बुधवारी जळगावात आले. दुपारी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील ‘लोकमत’च्या शहर कार्यालयाला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.क्रांतिकारकांच्या आयुष्यावर आणि त्यांनी घडवलेल्या क्रांतिकारी इतिहासावर ‘हे मृत्यूंजय’ हे नाटक आम्ही तयार केले आहे. खरा इतिहास हा आताच्या पिढीला शिकवला गेला पाहिजे, यासाठी हे नाटक आम्ही ठिकठिकाणी नव्या पिढीसमोर दाखवत आहोत. याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले. आताची पिढी बेजबाबदार आहे, असे म्हटले जाते. पण आताची पिढी उलट जास्त जबाबदारपणे वागत आहे. मात्र ती भरकटता कामा नये. त्यामुळे त्यांच्यासमोर खरा इतिहास आला पाहिजे, यासाठी ‘हे मृत्यूंजय’ हे नाटक आम्ही तरुणांपर्यंत पोहोचवत आहोत. सावरकरांचा इतिहास या नाटकातून मांडण्यात आला आहे. सावरकर यांना द्दष्टी होती, उंची होती. या नाटकातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने आपल्या आयुष्याची उंंची वाढवावी, असे आवाहन सावरकर यांनी केले. शासनाने येथील तरूण पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारा, खरा इतिहास अभ्यासक्रमात अंतर्भूत केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.आपल्याला स्वातंत्र्य मिळाले नाही तर आपण ते मिळवले आहे, हे तरूणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. भारतावर तुर्क, मुघल व नंतर ब्रिटीशांनी राज्य केले. त्यामुळे ७०० वर्षे भारतीय स्वातंत्र्यलढा चालला आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळाले. इतिहास हा बदलत नाही. पण त्याचे प्रकटीकरण केले जाते. त्यामुळेच दुर्लक्षित राहिलेला क्रांतिकारकांचा इतिहास आता नव्याने पुढे येत आहे. क्रांतिकारकांचा इतिहास हा आताच्या तरूणांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.यावेळी सावरकर यांच्यासोबत वृत्तनिवेदिका मंजिरी मराठे याही उपस्थित होत्या.सध्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्यासमोर असा धगधगता इतिहास मांडला तर त्यांना मनोबल मिळू शकेल. क्रांतिकारकांच्या इतिहासापासून त्यांना प्रेरणा मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे दैवत म्हणून न पाहता त्यांच्या योजनांकडे, त्यांच्या दूरद्दष्टीकडे पहावे, असे ते म्हणाले.हे मृत्यूंजय नाटकाचे जवाहरलाल नेहरु विद्यापीठात ३ आणि दिल्ली विद्यापीठात एक प्रयोग झाल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव