शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या खाजगीकरणामागे गैरव्यवहाराचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:13 IST

शिवराम पाटील यांचा आरोप : निर्णय मागे घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांची घेतली भेट पत्रपरिषद: जिल्हा जागृत जनमंचचा आरोप ...

शिवराम पाटील यांचा आरोप : निर्णय मागे घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांची घेतली भेट

पत्रपरिषद: जिल्हा जागृत जनमंचचा आरोप

जळगाव : कोरोनामुळे आधीच एस.टी. महामंडळ तोट्यात गेले असतांना, त्यात राज्य परिवहन महामंडळाने नवीन ५०० बस भाडेतत्त्वावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महामंडळाच्या सरकारी बसेस व त्यावरील चालक कमी करून, मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे अध्यक्ष शिवराम पाटील यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. तसेच परिवहन मंत्र्यांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणावा, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुंबईत भेट घेऊन केली असल्याचेही शिवराम पाटील यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला जागृत जनमंचच्या सचिव डॉ. सरोज पाटील, अखिल भारतीय युवक महासंघाचे अध्यक्ष अजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते अनिल नाटेकर, सतीश वाघ उपस्थित होते.

शिवराम पाटील यांनी सांगितले की, सुरुवातीला ५०० बस भाड्याने घेतील आणि त्यानंतर पुन्हा टप्प्या-टप्प्याने भाडेतत्त्वावर बस घेऊन महामंडळाला खाजगीकरणाकडे घेऊन जातील. या निर्णयामुळे महामंडळाच्या सध्याच्या बसेस व त्यावरील चालक बेकार होऊन त्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्र्यांच्या या निर्णयाला कामगार संघटनांनीही विरोध दर्शविला असून, त्यांनी याबाबत आमच्या संघटनेला पाठिंब्याचे पत्रही दिले असल्याचे शिवराम पाटील यांनी सांगितले.

इन्फो :

नाना पटोले मुख्यमंत्र्यांना पत्र देणार

यावेळी शिवराम पाटील यांनी सांगितले की, परिवहन विभागाच्या चुकीच्या निर्णयाबाबत नाना पटोले यांची भेट घेतली. पटोले यांना बस भाडेतत्त्वावर घेण्यामागे गैरव्यवहार असल्याचे सांगितले. यावर पटोले यांनी या निर्णयाबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तसेच जर पंधरा दिवसांत हा निर्णय मागे घेतला नाही, तर आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.