शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या आड धर्म आणून सत्ता बळकट करण्याचा प्रयत्न- माजी न्यायमूर्ती बी.जे.कोळसे पाटील

By सुनील पाटील | Updated: July 2, 2023 20:38 IST

भारत जोडो अभियानातंर्गत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयजवळील विनूज वर्ल्ड येथे दोन दिवसीय कार्यकर्ता संमेलन झाले.

जळगाव : देश विकासासाठी विज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे. राजकारणात धर्म आल्यास विनाश अटळ आहे. अमेरिका, जर्मनी आदी पाश्चात्य देशांचा विकास विज्ञानाच्याच बळावर झालेला आहे. त्यांनी धर्म विकासाच्या आड येऊ दिला नाही. भारतात मात्र विकासाच्या आड धर्म आणून सत्ता बळकट करण्याचा प्रयत्न आजच्या सत्तेतील काही जण करीत असल्याची टिका उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जे.कोळसे पाटील यांनी रविवारी सायंकाळी भारत जोडो अभियानंतर्गत कार्यकर्ता संमेलनात केली.

भारत जोडो अभियानातंर्गत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयजवळील विनूज वर्ल्ड येथे दोन दिवसीय कार्यकर्ता संमेलन झाले. रविवारी त्याचा समारोप झाला. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात कोळसे पाटील बोलत होते. व्यासपीठावर नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, विचारवंत निरंजन टकले, जलजन जोडो अभियानाचे संजय सिंग, राष्ट्रीय सेवा दलाचे अध्यक्ष नितीन वैद्य, अजित झा, नूतन मालवी, राजू भिसे, अविनाश पाटील, धनाजी गुरव, सुभाष वारे, रफिक फारुखी, फिरोज मीठीबोरवाल, सुनीती सूर, ललीत बाबर, प्रतिभा शिंदे, मुकूंद सपकाळे व करीम सालार उपस्थित होते.  संकल्प वाचनाने समारोपाची सुरुवात झाली. मनिषा धांडे यांनी संकल्प वाचन केले. प्रतिभा शिंदे यांनी आभार मानले.

जाती,धर्माच्या नावाने हिंसा वाढल्या : मेधा पाटकरएकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना दुसरीकडे आपल्यासमोर मोठी आव्हाने आहेत. जाती, धर्माच्या नावाने हिंसा वाढू लागल्या आहेत. काही गोष्टी जाणीवपूर्वक थोपविल्या जात आहेत, त्याला विरोध केला पहिजे. महाराष्ट्रात तर आग लावण्याचे काम होत असल्याची टिका नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केली. सर्वांनी एकजुटीने विरोध करायचा असून जनतेत जागृती करण्याबाबत आवाहन केले.

महाराष्ट्रात ४८ पैकी ४२ जागा आपल्या विचाराच्या असाव्यातमोदी, शहा आजाराची लक्षणे आहेत. आपल्याला आजारावरच उपचार करायचे आहेत. आपला भय समोरच्याचा विजय आहे. त्यासाठी आपल्याला निर्भयपणे काम करायचे आहे. महाराष्ट्रात ४८ पैकी ४२ खासदार आपल्या विचाराचे निवडून येतील, यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन विचारवंत निरंजन टकले यांनी केले. २०१४ मध्ये पहिल्यांदाच नवीन १६ कोटी मतदार वाढले. याआधी ९ कोटी वाढले होते. संघाने ११ वी पासूनच्या विद्यार्थ्यांच्या मनातच आपला अजेंडा बिंबवण्याचे काम केले आहे.

लोकसभा, विधानसभेची रणनितीया संमेलनाच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्रातील २८८ विधानसभा व ४८ लोकसभा मतदार संघाची गट चर्चा करुन पुढची रणनिती ठरविण्यात आली. प्रत्येक प्रतिनिधीने मतदार संघानिहाय प्रेझेंटेशन केले. कोणत्या मतदार संघात कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय उमेदवार बघून घेतला जाणार आहे. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव