शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

विकासाच्या आड धर्म आणून सत्ता बळकट करण्याचा प्रयत्न- माजी न्यायमूर्ती बी.जे.कोळसे पाटील

By सुनील पाटील | Updated: July 2, 2023 20:38 IST

भारत जोडो अभियानातंर्गत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयजवळील विनूज वर्ल्ड येथे दोन दिवसीय कार्यकर्ता संमेलन झाले.

जळगाव : देश विकासासाठी विज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे. राजकारणात धर्म आल्यास विनाश अटळ आहे. अमेरिका, जर्मनी आदी पाश्चात्य देशांचा विकास विज्ञानाच्याच बळावर झालेला आहे. त्यांनी धर्म विकासाच्या आड येऊ दिला नाही. भारतात मात्र विकासाच्या आड धर्म आणून सत्ता बळकट करण्याचा प्रयत्न आजच्या सत्तेतील काही जण करीत असल्याची टिका उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जे.कोळसे पाटील यांनी रविवारी सायंकाळी भारत जोडो अभियानंतर्गत कार्यकर्ता संमेलनात केली.

भारत जोडो अभियानातंर्गत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयजवळील विनूज वर्ल्ड येथे दोन दिवसीय कार्यकर्ता संमेलन झाले. रविवारी त्याचा समारोप झाला. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात कोळसे पाटील बोलत होते. व्यासपीठावर नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, विचारवंत निरंजन टकले, जलजन जोडो अभियानाचे संजय सिंग, राष्ट्रीय सेवा दलाचे अध्यक्ष नितीन वैद्य, अजित झा, नूतन मालवी, राजू भिसे, अविनाश पाटील, धनाजी गुरव, सुभाष वारे, रफिक फारुखी, फिरोज मीठीबोरवाल, सुनीती सूर, ललीत बाबर, प्रतिभा शिंदे, मुकूंद सपकाळे व करीम सालार उपस्थित होते.  संकल्प वाचनाने समारोपाची सुरुवात झाली. मनिषा धांडे यांनी संकल्प वाचन केले. प्रतिभा शिंदे यांनी आभार मानले.

जाती,धर्माच्या नावाने हिंसा वाढल्या : मेधा पाटकरएकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना दुसरीकडे आपल्यासमोर मोठी आव्हाने आहेत. जाती, धर्माच्या नावाने हिंसा वाढू लागल्या आहेत. काही गोष्टी जाणीवपूर्वक थोपविल्या जात आहेत, त्याला विरोध केला पहिजे. महाराष्ट्रात तर आग लावण्याचे काम होत असल्याची टिका नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केली. सर्वांनी एकजुटीने विरोध करायचा असून जनतेत जागृती करण्याबाबत आवाहन केले.

महाराष्ट्रात ४८ पैकी ४२ जागा आपल्या विचाराच्या असाव्यातमोदी, शहा आजाराची लक्षणे आहेत. आपल्याला आजारावरच उपचार करायचे आहेत. आपला भय समोरच्याचा विजय आहे. त्यासाठी आपल्याला निर्भयपणे काम करायचे आहे. महाराष्ट्रात ४८ पैकी ४२ खासदार आपल्या विचाराचे निवडून येतील, यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन विचारवंत निरंजन टकले यांनी केले. २०१४ मध्ये पहिल्यांदाच नवीन १६ कोटी मतदार वाढले. याआधी ९ कोटी वाढले होते. संघाने ११ वी पासूनच्या विद्यार्थ्यांच्या मनातच आपला अजेंडा बिंबवण्याचे काम केले आहे.

लोकसभा, विधानसभेची रणनितीया संमेलनाच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्रातील २८८ विधानसभा व ४८ लोकसभा मतदार संघाची गट चर्चा करुन पुढची रणनिती ठरविण्यात आली. प्रत्येक प्रतिनिधीने मतदार संघानिहाय प्रेझेंटेशन केले. कोणत्या मतदार संघात कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय उमेदवार बघून घेतला जाणार आहे. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव