शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
5
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
6
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
7
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
8
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
9
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
10
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
11
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
12
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
13
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
14
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
15
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
16
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
17
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
18
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
19
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
20
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे उत्पादन करून शेतकरी आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : एकीकडे शेती परवडत नाही, कर्जबाजारी झाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असताना, तालुक्यातील हिंगोणे खुर्द ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : एकीकडे शेती परवडत नाही, कर्जबाजारी झाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असताना, तालुक्यातील हिंगोणे खुर्द प्रगणे जळोद या लहानशा गावातील पदवीधर राजश्री पाटील या महिलेने शेती व्यवसायात प्रगती करून विक्रमी उत्पन्न घेतले. या व्यतिरिक्त अनुकूल वातावरण नसतानाही अनेक बियाण्याचे वाणही तयार करून स्वतःची कंपनी स्थापन करून कृषी क्षेत्रात आपला आगळा वेगळा ठसा उमटविला आहे.

हिंगोणे खुर्द प्र. जळोद येथील राजश्री राजेश पाटील या पदवीधर असून, लग्नानंतर अवघ्या चार वर्षांत त्यांचे पती राजेश भाईदास पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला होता. वडिलोपार्जित ५५ एकर शेती होती. सासू शेती व्यवसाय बघायच्या. मात्र, स्वतःच्या दुःखातून सांभाळून मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था लावून राजश्री पाटील यांनी शेतीबाबत अनभिज्ञ असूनही २०१७ साली शेती करण्याचा निर्णय घेतला आणि विशेष म्हणजे, त्यांनी या व्यवसायात यशस्वी होण्याचा निश्चय करून, कृषीविषयी मासिके, कृषी प्रदर्शनमधून माहिती जाणून घेतली. त्यांनतर, त्यांनी १२ एकरवर ऊस लावला, २० एकरमध्ये सुबाभूळ लावला, तर उर्वरित जमिनीत कांदा, कपाशी, भाजीपाला घेणे सुरू केले.

आधी ऊसाचे उत्पन्न एकरी २० ते २१ टन यायचे, परंतु राजश्री पाटील यांनी कृषिभूषण संजीव माने यांच्या कार्यशाळेतून उत्पन्न वाढीव कसे घ्यावे, खत, पाणी व्यवस्थापन याचे मार्गदर्शन घेऊन, त्या पद्धतीने नियोजन केले व नंतर एकरी ४२ टन असे उत्पन्न घेऊ लागल्या. उसासाठी फारशी अनुकूल परिस्थिती नसताना उत्पन्न वाढवून एकरी ७० टन उत्पन्न घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

या व्यतिरिक्त त्या कांदा, दुधी भोपळा, वाल, कारले, मूग, भरीताचे वांगे असे उत्पादनही घेतात. जातीने लक्ष घालून आंतरमशागत, अभ्यासपूर्ण नियोजनामुळे पिकाची गुणवत्ता चांगली आली. त्यांनी शेतकऱ्यांना स्वस्तात उत्कृष्ट बियाणे देण्याचा निर्णय घेतला.

कांदा म्हटला की, लासलगाव, पिंपळगाव, उमराने, नाशिक या भागात भरघोस पीक आणि विविध प्रकारचे बियाणे मिळते. मात्र, राजश्री पाटील यांनी बियाणे निर्मिती सुरू केली. कांदा व लसूण संशोधन केंद्र, राजगुरूनगरच्या संकेतस्थळावर भेट देऊन कृषी मासिक येथून माहिती घेऊन राहुरी कृषी विद्यापीठ, जिल्हा बीज प्रमाणीकरणाकडे नोंदणी केली. फुले समर्थ व दमोता फुरसुंगी या उत्कृष्ट कांदा बियाण्याचे उत्पादन करून, परिसरातील शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढीसाठी स्वस्तात बियाणे उपलब्ध केले.

दमोता सिड्स कंपनी स्थापन करून, त्या माध्यमातून कांदा फुले समर्थ, गहू फुले समाधान, बाजरी धनशक्ती, भोपळा सम्राट, वाल फुले गौरी, कारले फुले ग्रीन गोल्ड यांच्या बियाण्यांचे उत्पादन केले व संशोधित भाजीपाला वाणाचे काम सुरू आहे. पाण्याचा नियोजनबद्ध वापर, जमिनीची सुपीकता टिकवून सेंद्रिय खतांचा वापर करून, महिला असूनही राजश्री पाटील शेती व्यवसायात यशस्वी झाल्या आहेत. शेतकऱ्यांना वाजवी भावात चांगली व उत्कृष्ट बियाणे मिळाल्यास उत्पन्न चांगले येते. परिणामी, शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी त्यांनी विविध वाणाचे बीजोत्पादन करून कृषी व्यवसायात यशस्वी होऊन महिलांपुढे आदर्श घालून दिला आहे.

शेती सांभाळून त्यांनी सरपंच म्हणून गावचा कारभारही सांभाळणे सुरू केले आहे. त्या आमदार अनिल पाटील यांच्या भावजयी आहेत.

===Photopath===

300621\30jal_1_30062021_12.jpg~300621\30jal_2_30062021_12.jpg

===Caption===

सुशिक्षित पदवीधर असूनही सासूच्या मार्गदर्शनाने स्वतः शेतीत राबून विविध बियाण्यांच्या उत्पादन करणाऱ्या राजश्री पाटील. (छाया :अंबिका फोटो)~सुशिक्षित पदवीधर असूनही सासूच्या मार्गदर्शनाने स्वतः शेतीत राबून विविध बियाण्यांच्या उत्पादन करणाऱ्या राजश्री पाटील. (छाया :अंबिका फोटो)