शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

बियाणे उत्पादन करून शेतकरी आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : एकीकडे शेती परवडत नाही, कर्जबाजारी झाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असताना, तालुक्यातील हिंगोणे खुर्द ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : एकीकडे शेती परवडत नाही, कर्जबाजारी झाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असताना, तालुक्यातील हिंगोणे खुर्द प्रगणे जळोद या लहानशा गावातील पदवीधर राजश्री पाटील या महिलेने शेती व्यवसायात प्रगती करून विक्रमी उत्पन्न घेतले. या व्यतिरिक्त अनुकूल वातावरण नसतानाही अनेक बियाण्याचे वाणही तयार करून स्वतःची कंपनी स्थापन करून कृषी क्षेत्रात आपला आगळा वेगळा ठसा उमटविला आहे.

हिंगोणे खुर्द प्र. जळोद येथील राजश्री राजेश पाटील या पदवीधर असून, लग्नानंतर अवघ्या चार वर्षांत त्यांचे पती राजेश भाईदास पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला होता. वडिलोपार्जित ५५ एकर शेती होती. सासू शेती व्यवसाय बघायच्या. मात्र, स्वतःच्या दुःखातून सांभाळून मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था लावून राजश्री पाटील यांनी शेतीबाबत अनभिज्ञ असूनही २०१७ साली शेती करण्याचा निर्णय घेतला आणि विशेष म्हणजे, त्यांनी या व्यवसायात यशस्वी होण्याचा निश्चय करून, कृषीविषयी मासिके, कृषी प्रदर्शनमधून माहिती जाणून घेतली. त्यांनतर, त्यांनी १२ एकरवर ऊस लावला, २० एकरमध्ये सुबाभूळ लावला, तर उर्वरित जमिनीत कांदा, कपाशी, भाजीपाला घेणे सुरू केले.

आधी ऊसाचे उत्पन्न एकरी २० ते २१ टन यायचे, परंतु राजश्री पाटील यांनी कृषिभूषण संजीव माने यांच्या कार्यशाळेतून उत्पन्न वाढीव कसे घ्यावे, खत, पाणी व्यवस्थापन याचे मार्गदर्शन घेऊन, त्या पद्धतीने नियोजन केले व नंतर एकरी ४२ टन असे उत्पन्न घेऊ लागल्या. उसासाठी फारशी अनुकूल परिस्थिती नसताना उत्पन्न वाढवून एकरी ७० टन उत्पन्न घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

या व्यतिरिक्त त्या कांदा, दुधी भोपळा, वाल, कारले, मूग, भरीताचे वांगे असे उत्पादनही घेतात. जातीने लक्ष घालून आंतरमशागत, अभ्यासपूर्ण नियोजनामुळे पिकाची गुणवत्ता चांगली आली. त्यांनी शेतकऱ्यांना स्वस्तात उत्कृष्ट बियाणे देण्याचा निर्णय घेतला.

कांदा म्हटला की, लासलगाव, पिंपळगाव, उमराने, नाशिक या भागात भरघोस पीक आणि विविध प्रकारचे बियाणे मिळते. मात्र, राजश्री पाटील यांनी बियाणे निर्मिती सुरू केली. कांदा व लसूण संशोधन केंद्र, राजगुरूनगरच्या संकेतस्थळावर भेट देऊन कृषी मासिक येथून माहिती घेऊन राहुरी कृषी विद्यापीठ, जिल्हा बीज प्रमाणीकरणाकडे नोंदणी केली. फुले समर्थ व दमोता फुरसुंगी या उत्कृष्ट कांदा बियाण्याचे उत्पादन करून, परिसरातील शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढीसाठी स्वस्तात बियाणे उपलब्ध केले.

दमोता सिड्स कंपनी स्थापन करून, त्या माध्यमातून कांदा फुले समर्थ, गहू फुले समाधान, बाजरी धनशक्ती, भोपळा सम्राट, वाल फुले गौरी, कारले फुले ग्रीन गोल्ड यांच्या बियाण्यांचे उत्पादन केले व संशोधित भाजीपाला वाणाचे काम सुरू आहे. पाण्याचा नियोजनबद्ध वापर, जमिनीची सुपीकता टिकवून सेंद्रिय खतांचा वापर करून, महिला असूनही राजश्री पाटील शेती व्यवसायात यशस्वी झाल्या आहेत. शेतकऱ्यांना वाजवी भावात चांगली व उत्कृष्ट बियाणे मिळाल्यास उत्पन्न चांगले येते. परिणामी, शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी त्यांनी विविध वाणाचे बीजोत्पादन करून कृषी व्यवसायात यशस्वी होऊन महिलांपुढे आदर्श घालून दिला आहे.

शेती सांभाळून त्यांनी सरपंच म्हणून गावचा कारभारही सांभाळणे सुरू केले आहे. त्या आमदार अनिल पाटील यांच्या भावजयी आहेत.

===Photopath===

300621\30jal_1_30062021_12.jpg~300621\30jal_2_30062021_12.jpg

===Caption===

सुशिक्षित पदवीधर असूनही सासूच्या मार्गदर्शनाने स्वतः शेतीत राबून विविध बियाण्यांच्या उत्पादन करणाऱ्या राजश्री पाटील. (छाया :अंबिका फोटो)~सुशिक्षित पदवीधर असूनही सासूच्या मार्गदर्शनाने स्वतः शेतीत राबून विविध बियाण्यांच्या उत्पादन करणाऱ्या राजश्री पाटील. (छाया :अंबिका फोटो)