शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

निर्ढावलेल्या लोकप्रतिनिधींकडून आश्वासनांची खैरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 14:27 IST

सुविधांची बोंबाबोंब : वर्षभरात शहराचा चेहराही तोच, समस्याही तीच, विकासाच्या स्वप्नांची राखरांगोळी ‘याची देही’ पाहण्याचे दुर्भाग्य

जळगाव : विकासाच्या नावावर मते मागत वर्षभरात जळगाव शहराचा चेहरा-मोहरा बदलवण्याची भाषा करणाऱ्यांनीही जळगावकरांची निराशा केली आहे. विकास तर दूरच आहे, परंतु पार शहराची दूरवस्था करुन टाकली आहे. रस्त्यांवर तयार झालेल्या खड्डयांमध्ये सर्वसामान्य निष्पाप जळगावकरांचा बळी जात असून देखील निर्ढावलेल्या लोकप्रतिनिधींकडून केवळ खोट्या आश्वासनांची खैरात केली जात आहे. विकासाच्या स्वप्नांची अक्षरश: राखरांगोळी नागरिक ‘याची देही याची डोळा’ पाहू लागले आहेत.वर्षभरापूर्वी झालेल्या मनपा निवडणुकीत शिवसेना व भाजपाच्या नेत्यांकडून केवळ विकासाच्या नावावर मते मागण्यात आली. जळगावकरांनीही विकासाच्या नावावर भाजपाला पहिल्यांदाच मनपाचे दार उघडून देत सत्तेच्या चाब्या दिल्या. आतापर्यंतच्या १० महिन्याचा काळात एकही ठोस काम सत्ताधाऱ्यांना करता आलेले नाही. रस्त्यांचा दुरावस्थेमुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीतच घेवून वाहने चालवावी लागत आहेत. आता केवळ महामार्गच नाही तर शहरातील एखादा चौक किंवा उपनगरातील रस्ताही वाहनधारकांच्या जीवावर उठलेला दिसून येत आहे.राखून ठेवला १०० कोटींचा निधी ?शहराच्या विकासासाठी १६ आॅगस्ट २०१८ रोजी शासनाने नगरोथ्थान अंतर्गत १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. निधी जाहीर होवून आता ११ महिन्यांचा काळ लोटला. पण हा निधी अजून प्रशासकीय प्रक्रियेतच अडकला आहे.अनिल बोरोले यांच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदार व अधिका-यांवर गुन्हे दाखल कराउद्योजक अनिल बोरोले यांचा शुक्रवारी सायंकाळी शहरातील खड्डयामुळे अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या अपघातास रस्ता तयार करणारे ठेकेदार व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे संबंधित अधिकारी यांना जबाबदार धरुन त्यांच्याविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी पोलीस अधीक्षकांकडे एका पत्राद्वारे केली आहे. गुप्ता यांनी पत्रात म्हटले आहे की, मुंबई पोलीस अधिनियमातील फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४९, १५० व १५१ नुसार पोलिसांनीच स्वत:हून अशा घटनांमध्ये पुढाकार घेऊन फिर्यादी होऊन गुन्हे दाखल करण्याचा नियम आहे. चित्रा चौकातील अपघात प्रकरणी अधिकारी व ठेकेदार यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची विनंती गुप्ता यांनी केली आहे.विश्वासाला मिळाले धूळ, चिखल अन् खड्डयांची भेटजळगावकरांनी दाखवलेल्या प्रेमाचा ‘विश्वासघात ’लोकप्रतिनिधींकडून करण्यात आला आहे. १० महिन्यात जळगावकरांच्या नशिबी धूळ, चिखल, कच-याचे ढीग अन् रस्त्यांमधील जीवघेणे खड्डे अशीच भेट या निर्ढावलेल्या लोकप्रतिनिधींनी दिली आहे. अमृत योजना नागरिकांसाठी फायद्याची असली तरी मक्तेदाराचे दुर्लक्ष व प्रशासनाच्या बेफीकरीमुळे ती जळगावकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. निविदेत निश्चित केल्यानुसार मक्तेदारानी खड्डे खोदल्यानंतर ते खड्डे डांबरने दुरुस्त करणे गरजेचे होते. मात्र, तसे होताना दिसून येत नसून मक्तेदारावर सत्ताधारी किंवा प्रशासनाचेही कुठलेही लक्ष दिसून येत नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव