शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पाच पट दंड माफ झाल्याने बिलांच्या मूल्यांकनाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:21 IST

बिलांची रक्कम कमी होऊन होणार वसुलीला सुरुवात : लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य शासनाने मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांवर ...

बिलांची रक्कम कमी होऊन होणार वसुलीला सुरुवात :

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्य शासनाने मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांवर मनपाने लावलेला पाच पट दंडाचा निर्णय रद्द केल्यानंतर आता मनपाकडून गाळे भाड्यात मूल्यांकनाचे काम सुरू केले आहे. पाच पट दंड रद्द झाल्याने गाळेधारकांच्या थकीत भाड्याच्या रकमेत काही प्रमाणात घट होणार आहे. मनपा प्रशासनाकडून सध्या या बिलांची रक्कम कमी करण्याचे काम सुरू असल्याने मनपाकडून वसुली मोहिमेला काही प्रमाणात ‘ब्रेक’ लागला आहे; मात्र हे काम संपल्यानंतर मनपाकडून थकीत भाडे वसुलीच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

गाळेधारकांकडे थकीत भाड्यापोटी एकूण ३०० ते ३२० कोटी रुपयांची थकबाकी होती. त्यात पाच पट दंडाची रक्कम कमी झाल्यानंतर ५० कोटींची घट झाली आहे. मनपाने गाळेधारकांना दिलेल्या बिलांच्या रकमेत आता शासनाच्या निर्णयामुळे घट होणार आहे. मनपाकडून गाळेधारकांकडील थकीत भाड्याची वसुलीसाठी सोमवारपासून मोहीम सुरू करण्यात येणार होती; मात्र भाड्यातील बिलांच्या मूल्यांकनाच्या कामामुळे ही मोहीम आता काही दिवसांनंतर सुरू करण्यात येणार आहे. त्यात राज्य शासनाच्या ३० आमदारांची अंदाज समिती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्यामुळे याबाबत महापालिकेत तयारी सुरू असल्याने महापालिकेने गाळे भाडे वसुलीला तूर्तास ब्रेक दिला आहे. मूल्यांकनाचे काम संपल्यानंतर पुढील आठवड्यात विशेष मोहीम सुरू केली जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.