शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

अस्सा उन्हाळा सुरेख बाई...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2017 13:46 IST

वीक एण्ड विशेषमध्ये नीता केसकर यांनी अवतीभवती या सदरात केलेले लिखाण.

 झालं ना मनासारखं. अहो, माङयावर किती राग? किती चिडचिड, किती संताप. केव्हा एकदाचा जातो, असंच झालंय ना तुम्हाला, चाललो बरं चाललो. आता परत आपली भेट एकदम पुढच्याच वर्षी. आला आता तुमचा लाडका मित्र. मी कोण तुमचा? तुमचं माझं काय नातं? अस्संच असतं. जो र्पयत माणसाला गरज असते तोवर आमचा लाडका मित्र असं म्हणायचं. आपला हेतू साध्य करायचा आणि मग.. जाऊ द्या. जगाची ही रितच न्यारी. अर्थात याला माझा स्वभाव. मी तरी काय करू माझा स्वभावच गरम आहे. 

 या ओळी वाचल्यावर तुम्हालाही जरा कोडचं पडलं असेल ना? अहो, हा सारा शब्दप्रपंच आत्ता आत्तार्पयत असलेल्या उन्हाळ्याबद्दल होता व आहे. त्याने त्याच्या मनीची भावना जशी व्यक्त केली तशीच भावना आपणदेखील व्यक्त केलीच असणार ना?
तसं म्हटलं तर उन्हाळा म्हणजे सुखद आठवणींचा काळ. उन्हाळा सगळ्यांशी दोस्ती करतो. महिला वर्ग तर वर्षभर लागणारे पापड, कुरड्रया, उपवासाचे विविध पदार्थ, तिखट, मसाला, हळद याच ऋतूत करतात. कडक उन्हाळ्यात वर्षभराचं धान्य वाळवून ठेवलं जातं आणि एकदाचं उन दाखवलं की महिलावर्ग खूष.
उन्हाळ्यात सुट्टय़ा असतात त्यामुळे आपल्या कुटुंबासोबत पर्यटनाला जाण्याचा बेत केला जातो. तो याच काळात. वार्षिक परीक्षा संपल्या की, बालमंडळी मामाच्या-मावशीच्या गावाला जाण्याची तयारी करतात. तिथं गेल्यावर खूप खेळणं, त्या - त्या गावाचं वैशिष्टय़ानुसार उपलब्ध असलेल्या पदार्थाचा आस्वाद घेतला जातो आणि मग परत आपल्या गावी आल्यावर त्या पदार्थाचं तोंडभरुन कौतूक केलं जातं. अरे तुला काय सांगू? माझा मामा ‘सुशीला’ खूप छान करतो. तू एकदा सोलापूरला जाऊन तर ये? या आणि इतर ब:याच गप्पांना रंगांना रंग चढत जातो आणि उन्हाळा सुसह्य होतो. इतकच काय तर पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टय़ांमध्ये परत या-रे मुलांनो असं आगाऊ आमंत्रण घेऊन येतात. आणि बालमंडळी खरंच पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टय़ांची वाट बघत बसतात.
महाविद्यालयातील मंडळी उन्हाळ्याच्या वर्गाना जाऊन विविध कोर्सेसचं शिक्षण घेतात. कथा, कादंब:या वाचनाला उत येतो. कोर्सेसचं शिक्षण ज्या संस्थेत घेतलं जातं तिथं भेटलेल्या मित्रमंडळींना ओळख ठेवण्याचं वचन दिले जातं.
उन्हाळ्याच्या सुट्टय़ा म्हणजे महिला वर्गाला पर्वणीचं असते. समर कॅम्प आयोजित केला जातो. यात खाद्यपदार्थ, मेहंदी, विणकाम, भरतकाम, या सा:या गोष्टी शिकवल्या जातात. आणि या समरकॅम्प मध्ये शिकलेली सरबतं मोठय़ा उत्साहात घरी करून बघितली जातात. आणि जेव्हा अरेùùùवाùù! फारच सुंदर! अशी पोच पावती मिळते तेव्हा ती गृहिणी देखील खूष होते आणि मी, आमच्या महिला मंडळाने आयोजित केलेल्या उन्हाळी वर्गात शिकले हे मोठय़ा अभिमानानं सांगते. आत्ता मला सांगा असं सारं चांगलं मिळवून देणारा उन्हाळा वाईट कसा? घरी आलेल्या पाहूण्याचं स्वागत केलं जाते ते आमरस, कुरड्रया, तळलेले पापड, भजी, आईस्क्रीम यांनी आणि मग काय वहिनी रस फारच सुंदर होता. कुठून आणले आंबे? माङया भावानं त्याच्या भाचांसाठी करंडी पाठविली होती. त्यातल्या आंब्यांचा हा रस, दर उन्हाळ्यात तो पाठवत असतो, असे सहज शब्द त्या माऊलीच्या मुखातून निघून जातात आणि आंब्याच्या रसाची चव मात्र पुढच्या उन्हाळ्यार्पयत तशीच राहते.
 असा आहे उन्हाळ्याचा महिमा. त्याच्याबद्दल जेवढं चांगलं लिहावं तेवढं थोडच आहे.  आता मात्र त्याच्याबद्दल एवढंचं परत भेटू येत्या उन्हाळ्यात एका वेगळ्या अनुभवांसोबत. आणि म्हणून आला उन्हाळा असं म्हणून कपाळावर आठय़ा न पाडता असा उन्हाळा सुरेख बाई असंच आपण म्हणू या! - नीना केसकर