शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

अस्सा उन्हाळा सुरेख बाई...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2017 13:46 IST

वीक एण्ड विशेषमध्ये नीता केसकर यांनी अवतीभवती या सदरात केलेले लिखाण.

 झालं ना मनासारखं. अहो, माङयावर किती राग? किती चिडचिड, किती संताप. केव्हा एकदाचा जातो, असंच झालंय ना तुम्हाला, चाललो बरं चाललो. आता परत आपली भेट एकदम पुढच्याच वर्षी. आला आता तुमचा लाडका मित्र. मी कोण तुमचा? तुमचं माझं काय नातं? अस्संच असतं. जो र्पयत माणसाला गरज असते तोवर आमचा लाडका मित्र असं म्हणायचं. आपला हेतू साध्य करायचा आणि मग.. जाऊ द्या. जगाची ही रितच न्यारी. अर्थात याला माझा स्वभाव. मी तरी काय करू माझा स्वभावच गरम आहे. 

 या ओळी वाचल्यावर तुम्हालाही जरा कोडचं पडलं असेल ना? अहो, हा सारा शब्दप्रपंच आत्ता आत्तार्पयत असलेल्या उन्हाळ्याबद्दल होता व आहे. त्याने त्याच्या मनीची भावना जशी व्यक्त केली तशीच भावना आपणदेखील व्यक्त केलीच असणार ना?
तसं म्हटलं तर उन्हाळा म्हणजे सुखद आठवणींचा काळ. उन्हाळा सगळ्यांशी दोस्ती करतो. महिला वर्ग तर वर्षभर लागणारे पापड, कुरड्रया, उपवासाचे विविध पदार्थ, तिखट, मसाला, हळद याच ऋतूत करतात. कडक उन्हाळ्यात वर्षभराचं धान्य वाळवून ठेवलं जातं आणि एकदाचं उन दाखवलं की महिलावर्ग खूष.
उन्हाळ्यात सुट्टय़ा असतात त्यामुळे आपल्या कुटुंबासोबत पर्यटनाला जाण्याचा बेत केला जातो. तो याच काळात. वार्षिक परीक्षा संपल्या की, बालमंडळी मामाच्या-मावशीच्या गावाला जाण्याची तयारी करतात. तिथं गेल्यावर खूप खेळणं, त्या - त्या गावाचं वैशिष्टय़ानुसार उपलब्ध असलेल्या पदार्थाचा आस्वाद घेतला जातो आणि मग परत आपल्या गावी आल्यावर त्या पदार्थाचं तोंडभरुन कौतूक केलं जातं. अरे तुला काय सांगू? माझा मामा ‘सुशीला’ खूप छान करतो. तू एकदा सोलापूरला जाऊन तर ये? या आणि इतर ब:याच गप्पांना रंगांना रंग चढत जातो आणि उन्हाळा सुसह्य होतो. इतकच काय तर पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टय़ांमध्ये परत या-रे मुलांनो असं आगाऊ आमंत्रण घेऊन येतात. आणि बालमंडळी खरंच पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टय़ांची वाट बघत बसतात.
महाविद्यालयातील मंडळी उन्हाळ्याच्या वर्गाना जाऊन विविध कोर्सेसचं शिक्षण घेतात. कथा, कादंब:या वाचनाला उत येतो. कोर्सेसचं शिक्षण ज्या संस्थेत घेतलं जातं तिथं भेटलेल्या मित्रमंडळींना ओळख ठेवण्याचं वचन दिले जातं.
उन्हाळ्याच्या सुट्टय़ा म्हणजे महिला वर्गाला पर्वणीचं असते. समर कॅम्प आयोजित केला जातो. यात खाद्यपदार्थ, मेहंदी, विणकाम, भरतकाम, या सा:या गोष्टी शिकवल्या जातात. आणि या समरकॅम्प मध्ये शिकलेली सरबतं मोठय़ा उत्साहात घरी करून बघितली जातात. आणि जेव्हा अरेùùùवाùù! फारच सुंदर! अशी पोच पावती मिळते तेव्हा ती गृहिणी देखील खूष होते आणि मी, आमच्या महिला मंडळाने आयोजित केलेल्या उन्हाळी वर्गात शिकले हे मोठय़ा अभिमानानं सांगते. आत्ता मला सांगा असं सारं चांगलं मिळवून देणारा उन्हाळा वाईट कसा? घरी आलेल्या पाहूण्याचं स्वागत केलं जाते ते आमरस, कुरड्रया, तळलेले पापड, भजी, आईस्क्रीम यांनी आणि मग काय वहिनी रस फारच सुंदर होता. कुठून आणले आंबे? माङया भावानं त्याच्या भाचांसाठी करंडी पाठविली होती. त्यातल्या आंब्यांचा हा रस, दर उन्हाळ्यात तो पाठवत असतो, असे सहज शब्द त्या माऊलीच्या मुखातून निघून जातात आणि आंब्याच्या रसाची चव मात्र पुढच्या उन्हाळ्यार्पयत तशीच राहते.
 असा आहे उन्हाळ्याचा महिमा. त्याच्याबद्दल जेवढं चांगलं लिहावं तेवढं थोडच आहे.  आता मात्र त्याच्याबद्दल एवढंचं परत भेटू येत्या उन्हाळ्यात एका वेगळ्या अनुभवांसोबत. आणि म्हणून आला उन्हाळा असं म्हणून कपाळावर आठय़ा न पाडता असा उन्हाळा सुरेख बाई असंच आपण म्हणू या! - नीना केसकर