शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

जळगाव जिल्ह्यात प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे कृत्रिम पाणीटंचाई : एकनाथराव खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 22:16 IST

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची भीषण स्थिती आहे. तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीसाठी तीन महिन्यांचा कालावधी जिल्हा प्रशासनाकडून लावला जात आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा गावात पाण्याअभावी निम्मे गाव स्थलांतरीत झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देलाल गोटा गावातील नागरिकांचे पाण्याअभावी स्थलांतरनिमखेड गावातील टंचाई प्रस्तावावर तीन महिने कार्यवाही नाहीजळगाव जिल्ह्यातील विकासाचा वेग मंदावला

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२३ : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची भीषण स्थिती आहे. तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीसाठी तीन महिन्यांचा कालावधी जिल्हा प्रशासनाकडून लावला जात आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा गावात पाण्याअभावी निम्मे गाव स्थलांतरीत झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.सध्या जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. मात्र या प्रकरणी जिल्हा प्रशासन गंभीर नाही. मुक्ताईनगर तालुक्यातील लाल गोटा गावात पाण्याची कोणतीही उपाययोजना केलेली नसल्याने गावातील निम्मे कुटुंब स्थलांतरीत झाले आहे. निमखेड गावातील पाणी टंचाई संदर्भात १४ मार्च रोजी तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेसाठी ५ लाख २२ हजारांचा प्रस्ताव दाखल केला होता. मात्र त्यामध्ये त्रुटी काढून हा प्रस्ताव परत पाठविण्यात आला. त्यानंतर जि.प.सीईओ यांनी आपल्याला पाच लाखांपर्यंतच्या मंजुरीचे अधिकार असल्याची त्रुटी काढली. त्यानंतर नव्याने तीन लाखांचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. त्यानंतर काल हा प्रस्ताव मंजुर करण्यात आला. एका प्रस्तावासाठी फाईल मंजुरीचा तीन महिन्यांचा प्रवास होत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा प्रशासनाकडून पाणी टंचाईबाबत काय उपाययोजना करण्यात आली याबाबत आपण माहिती मागविली असून त्यासंदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करणार आहोत. उन्हाळ्याची स्थिती असताना जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत किती आणि कोठे कामे सुरु आहे असा सवाल त्यांनी केला. लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याअभावी जळगाव जिल्ह्यातील विकासात शिथीलता आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेJalgaonजळगाव