शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात तयार झाले गुडघ्यावरील कृत्रिम आवरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 12:20 IST

रावेर तालुक्यातील तरुणीवर देशातील सातवी शस्त्रक्रिया

विजयकुमार सैतवालजळगाव : गुडघ्याची झिज होण्यासह त्यावरील आवरणास अथवा वाटीला काही इजा झाल्यास गुडघे बदल करणे हा एकमेव पर्याय असताना जळगावात नवीन संशोधनाचा अवलंब करीत गुडघ्यावरील कृत्रिम आवरण यशस्वीरित्या तयार करण्यात आले. विशेष म्हणजे चालू-फिरु शकत नसलेल्या तरुणीच्या गुडघ्यावर हे आवरण टाकण्यात आल्याने ही तरुणी आज व्यवस्थित चालण्यासह तिचा पायही वाकू लागला आहे. जळगावात झालेली ही देशातील सातवीच शस्त्रक्रिया असून या निमित्ताने जळगावातील वैद्यकीय क्षेत्राने देशात पुन्हा एकदा आपले नाव देशभरात पोहचविले आहे.वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन संशोधन मानवाला वरदान ठरत आहे. यात ह्रदय बदल करणेही या क्षेत्राने शक्य करून दाखविले आहे. असे असले तरी काही छोट्या-छोट्या वेदनांमुळे अनेक जण त्रस्त असतात. अशाच प्रकारे वयोमानानुसार गुडघे दुखी, त्यांची झीज होणे आणि आता तरुण वयातही चालता-फिरताना अथवा शेतात काम करताना पाय मुरगळ््यास त्यामुळे होणाऱ्या दुखापतींचे (स्पोर्ट इन्ज्युरी) प्रमाण वाढत आहे. यात पूर्वी थेट गुडघे बदल करावे लागत असे. कालांतराने यात बदल होत जाऊन गुडघ्याचा जेवढा भाग खराब झाला तेवढाच बदलविण्याचे संशोधन पुढे आले व त्यामुळे गुडघे दुखापतग्रस्तांना बराच दिलासा मिळाला. हे संशोधन झाले तरी गुडघ्यावरील कृत्रिम आवरण तयार करणे मात्र शक्य झालेले नाही. त्यामुळे आता देशात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत रुग्णाच्या अस्थिमज्जातून (बोनमॅरो) स्टेमसेल काढून त्यापासून गुडघ्यावरील आवरण तयार केले जात आहे. देशात सहा ठिकाणी अशा प्रकारचे आवरण तयार करण्यात येऊन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्या पाठोपाठ आता जळगावातही अशाच प्रकारे कृत्रिम आवरण तयार करण्यात येऊन एका तरुणीला पुन्हा चालते-फिरते केले आहे.तीन महिन्यात तरुणी चालू लागलीरावेर तालुक्यातील एक तरुणी घरातच अचानक पडली व तिच्या गुडघ्यातील आवरणाचा तुकडाच पडला. त्यामुळे तिला पाय वाकविताही येत नव्हता की चालता येत नव्हते. यामुळे तिचे महाविद्यालयात जाणेही अवघड झाले. त्यानंतर जळगावात तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. केवळ अठराव्या वर्षी गुडघा बदलणे शक्य नसल्याने आवरणाचा तुकडा पडलेल्या जागी पुन्हा दुसरे आवरण लावणेच योग्य ठरणार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार तरुणीच्या अस्थिमज्जातून स्टेमसेल काढण्यात आले व विदेशातून काही वस्तू मागवून जळगावात कृत्रिम आवरण तयार करण्यात येऊन त ेतिच्या गुडघ्यातील आवरणाच्या तुटलेल्या जागी टाकण्यात आले. त्यामुळे तीन महिन्यातच ही तरुणी पुन्हा व्यवस्थित चालत असल्याचे तिच्या पालकांनी सांगितले.गुडघ्यातील आवरण तयार करणे आतापर्यंत शक्य झालेले नाही. मात्र आता नवीन संशोधनानुसार रुग्णाच्या बोनमॅरोमधून स्टेमसेल काढून हे आवरण तयार केले जात आहे. देशात आतापर्यंत सात ठिकाणी अशा प्रकारचे आवरण तयार करण्यात येऊन शस्त्रक्रिया केल्या गेल्या. आता जळगावातही अशाप्रकारचे आवरण तयार केले. वैद्यकीय क्षेत्रातील हा एक अविष्कार आहे.- डॉ. मनीष चौधरी, सांधे प्रत्यारोपण तज्ज्ञ.

टॅग्स :Jalgaonजळगाव