शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:14 IST

जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी ७२३ ग्रामपंचायतींमध्ये ५ हजार १५४ जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीला गालबोट लागू नये यासाठी ...

जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी ७२३ ग्रामपंचायतींमध्ये ५ हजार १५४ जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडून तयारी पूर्ण झाली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी उपअधीक्षक व प्रभारी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडून पोलीस पाटलांची बैठक घेण्यात आली असून, रिंगणात असलेल्या उमेदवारांना कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलिसांमार्फत नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. सोमवारी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांची बैठक घेऊन खबरदारी घेण्याबाबत सूचना केल्या. दरम्यान, मतमोजणीलाही हाच बंदोबस्त कायम राहणार आहे.

कोट....

मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे. कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. शांततेत मतदान प्रक्रिया पार पडावी, तसेच कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. उमेदवारांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. मतदान व मजमोजणीला कडक बंदोबस्त राहणार आहे.

-चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक

...असा आहे बंदोबस्त

पोलीस उपअधीक्षक : ०८

पोलीस निरीक्षक : १९

सहायक निरीक्षक : ९१

कर्मचारी (पुरुष) : १,४९५

कर्मचारी (महिला) : १८१

होमगार्ड : १,६००

एसआरपी प्लाटून : ०५

दृष्टिक्षेपात

एकूण ग्रामपंचायती : ७२३

एकूण इमारती : १,३३३

एकूण जागा : ५,१५४

एकूण बूथ : २,४१५