शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
5
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
6
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
7
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
8
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
9
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
11
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
12
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
13
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
14
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
15
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
16
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
17
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
18
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
19
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
20
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली

मनात उत्साही विचार जागवा - शिवानी दीदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 12:12 IST

संकल्पाच्या शक्तीने सकारात्मक वातावरणाची निर्मिती शक्य

आपल्यातील नकारार्थीपणा काढून टाकणे, उत्साही विचार करायला हवा, यासाठी प्रत्येकाने आपल्यात असलेली शक्ती, गुणाकडे लक्ष पुरवावे. बिझी या शब्दामुळे आपल्यातील ऊर्जा निर्माण करण्याची शक्तीच कमी होते, त्यामुळे ‘बिझी’ हा शब्दच काढून टाका, असे प्रतिपादन ब्रम्हकुमारी शिवानी दिदी यांनी केले आहे. शिवानी दिदी सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत, त्यानिमित्त त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ताण- तणाव घालविण्यासाठी उपाययोजनाही सांगितल्या.प्रश्न : आपण नेहमी सांगतात.. स्वत:ला ओळखा म्हणजे नेमके काय?उत्तर : आपण आपल्यातील क्षमता, कमी, कमजोरी ओळखणे आणि त्या उदारपणे स्वीकारणे ही फार मोठी गोष्ट आहे. मी मोठा, माझ्यात काही कमी नाही किंवा मला गुणदोषासहीत स्वत: ला स्विकारणे महत्वाचे असते. खरंतर आपण स्वत:ला स्वीकारत नाही, आपल्यात काय क्षमता आहेत हे आपणासही ज्ञात नसते. परमेश्वराने आपणाला गुण, शक्ती दिलेल्या आहेत, मात्र आपण त्याकडे लक्षच देत नाहीत.प्रश्न : मग माणसामधील ‘स्व’त्व हे कसं वाढतं?उत्तर : आपणास कुणी दुसरे म्हणते की तुमच्यात हे कमी आहे तेव्हा आपणास त्याचा राग येतो कारण आपण मनाने त्या स्विकारलेल्या नसतात. जर आपण अगोदरच्या त्या स्विकारल्यात तर त्यात बदल करुन अर्थात कमजोरी दूर कण्यासाठी जाणवीपूर्वक प्रयत्न आपण करु. अर्थात त्या स्विकारुन त्या दूर केल्यास आपला सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. मी जो काही आहे गुणदोषा सकट मला मान्य आहे आणि जसे माझ्यात गुण आहेत तसेच दुगूर्ण, कमी सुद्धा असेल आणि ती मी दूर केली पाहिजे.प्रश्न : आपण बिझी आहोत, असं कधीच समजायचं नाही, पण त्यामुळे नेमकं काय होतं?उत्तर : आपण असं बोलण्यामुळे आपल्यात सकारात्मक विचार तयार होतात. आपली तब्येत बिघडली तरी आपण म्हणावं की, माझी तब्येत चांगली आहे. हा संकल्प, हा विचार आपल्यात औषधाचं काम करतो. जे दिसतंय, त्याचा विचार नाही करायचा, जे दिसत नाही त्याचा विचार करावा.प्रश्न : पण सकारात्मक विचार केल्याने आपल्यात बदल होतो हे खरं आहे?उत्तर : संकल्पात एक शक्ती असते. कुणीही हा प्रयोग करावा. संकल्पाच्या शक्तीने आपण सकारात्मक वातावरण बनवू शकतो. विचाराने जीवनपद्धती बदलते. त्याचा आरोग्य, नातेसंबंध, प्रकृतीवरही परिणाम जाणवतो.सध्या खूप धावपळीचे जग आहे. तणाव वाढत आहे..यावर उपाय सांगता येतील?आपल्या शब्दकोशात ‘बिझी’ हा शब्दप्रयोग तर नाही ना, हे पाहिले पाहिजे. या शब्दामुळे आपण आपल्यातील ऊर्जा निर्माण करण्याची शक्तीच कमी करतो. कधीपण असे म्हणू नका की मी व्यस्त आहे. माझ्याकडे खूप वेळ आहे असा विचार करा आणि तसेच बोला. जेवढे माझ्याकडे काम आहे, त्यापेक्षा खूप जास्त माझ्याकडे वेळ आहे. वेळेचा सन्मान करा.त्यामुळेच वेळेबरोबर आपलं एक छान नातं तयार होईल. आपला परिवार आणि प्रकृतीसाठी आपण वेळ काढला पाहिजे.शिवानीदीदी ह्या पुणे विद्यापीठाच्या इलेक्ट्रानिक्स इंजिनिअरिंगमध्ये गोल्ड मेडलीस्ट आहेत. २० पेक्षा अधिक वर्षे त्यांनी राजयोग मेडिटेशनमध्ये अभ्यास केला आहे. अध्यात्म हे आपल्या जीवनशैलीला जोडलेले असावे, यासाठी त्या प्रचार आणि प्रचार करीत असतात.माझी तब्येत चांगली आहे, हा संकल्प. हाच विचार आपल्यात औषधाचे काम करतो. जे दिसतयं त्याचा विचार करायचा नाही... - शिवानी दिदी

टॅग्स :Jalgaonजळगाव