शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

आगामी दोन दिवसात प्रभारी प्र-कुलगुरूची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : प्रा. पी. पी. पाटील यांनी कुलगुरूपदाचा राजीनामा दिल्यामुळे प्र-कुलगुरुपदसुध्दा संपुष्टात आले होते. आता नुकतीच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : प्रा. पी. पी. पाटील यांनी कुलगुरूपदाचा राजीनामा दिल्यामुळे प्र-कुलगुरुपदसुध्दा संपुष्टात आले होते. आता नुकतीच विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठातापदी आर. एस. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित प्रभारी अधिष्ठाता कायम आहेत. येत्या दोन दिवसात प्रभारी प्र-कुलगुरू यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. विद्यापीठाचा चांगला अभ्यास असणाऱ्या व्यक्तीकडेच हा पदभार देण्यात येईल, अशी माहिती कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू ई. वायुनंदन यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

सोमवार, ८ मार्च रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार प्रा. ई. वायुनंदन यांनी स्वीकारला. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.

प्रश्न : अर्थसंकल्पाची बैठक कशी घेणार?

ई. वायुनंदन : सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. विद्यापीठात शासनाच्या सूचनांचे परिपूर्ण पालन केले जाईल. येत्या २५ मार्चला अर्थसंकल्पावर सिनेटची सभा आहे. दरम्यान, ही सभा कशी घ्यावी, यासाठी सोमवारी सर्वांशी चर्चा केली जाईल. चर्चेअंती जो निर्णय घेण्यात येईल, तो सर्वांना कळविण्यात येईल.

प्रश्न : नॅक पुनर्मूल्यांकनासाठी प्रस्ताव पाठविला का?

ई. वायुनंदन : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नॅक पुनर्मूल्यांकनासाठी सज्ज आहे. नॅक संदर्भातील जबाबदारी ही प्रा.विजय माहेश्वरी यांच्याकडे सोपविली आहे. सध्या ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. एप्रिल महिन्यात नॅक संस्थेला पुनर्मूल्यांकनासाठीचा प्रस्ताव सादर केला जाईल. यंदा चांगले मूल्यांकन मिळावे, यासाठी सर्वांनी चांगले प्रयत्न केले आहे.

प्रश्न : कुलगुरू प्रक्रिया कधी होईल?

ई. वायुनंदन : कुलपती यांच्या निर्देशानुसार कुलगुरू शोध समिती नियुक्ती केली जाईल. ही पाच सदस्यीय समिती असेल. या समितीसाठी विद्यापीठाकडून दोन व्यक्तींची नावे पाठविण्यात येईल. ही नावे एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पाठविण्यात येईल. संपूर्ण प्रक्रियेसाठी विद्यापीठाकडून तत्काळ कार्यवाही केल्या जातील. दरम्यान, विद्यापीठातील कामकाज सुरळीत सुरू असून सर्वांना एकत्र व सोबत घेऊन काम केले जाईल.

सुरक्षा रक्षकांना मिळाले वेतन

विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांचे सुमारे तीन महिन्यांचे वेतन थकीत होते. प्रभारी कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुरक्षा रक्षकांचा वेतनाचा प्रश्न सोडविला असून त्यांना दोन महिन्यांचे वेतन अदा करण्यात आले आहे. येत्या सोमवार, मंगळवार पर्यंत उर्वरित एका महिन्याचे थकीत वेतनही अदा करण्याबाबत प्रयत्न केले जातील.

- ई. वायुनंदन, प्रभारी कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ