शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

रावेर तालुक्यातील टंचाई आराखड्यातील गावांखेरीज १९ गावांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 15:52 IST

रावेर तालुक्यातील टंचाई आराखड्यातील ११ गावांखेरीज आणखी १९ गावांची आराखड्याखेरीज पंचायत समिती भूजल तंत्रज्ञांकडे नोंद झाली आहे.

ठळक मुद्दे११ ग्रामपंचायतींकडून अद्यापही प्रस्ताव नसल्याची शोकांतिका ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावरील प्रशासन मात्र ढिम्मच कूपनलिका व इंधन विहिरींची योजना थंड बस्त्यात

रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील टंचाई आराखड्यातील ११ गावांखेरीज आणखी १९ गावांची आराखड्याखेरीज पंचायत समिती भूजल तंत्रज्ञांकडे नोंद झाली असून, त्या अतिरिक्त १९ गावांपैकी चक्क ११ ग्रामपंचायतकडून टंचाई आराखडा वा तातडीची टीपीडब्ल्यूएस योजनेकरिता अद्यापही प्रस्ताव सादर झाले नसल्याची शोकांतिका आहे.रावेर पंचायत समितीच्या प्रभारी कार्यकाळात ग्रामसेवक वा ग्रामविकास अधिकाऱ्यांची ग्रामीण स्तरावर पाणीटंचाईच्या ज्वलंत प्रश्नाबाबत असलेली उदासीनता व मनमानी कारभार यामुळे अधोरेखित होत असल्याची गंभीर टीका होत आहे.दरम्यान, ११ गावांकरीता मंजूर झालेल्या १४ योजनांमधील जुनोने व जानोरी येथील योजना पूर्णत्वास आल्या आहेत. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात मंजुरी मिळालेल्या अन्य ११ कूपनलिका व इंधन विहिरींची योजना थंड बस्त्यात असल्याने गटविकास अधिकाऱ्यांना पाणीटंचाईचे गांभीर्य नसल्याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे. सायबूपाड्या, सिंगनूर, गोलवाडे, खिरवड, रमजीपूर, ऐनपूर, भाटखेडा, रोझोदा, तिड्या, अंधारमळी, रसलपूर, भोर, वाघोड, मोरगाव खुर्द, निरूळ व नेहता या अतिरिक्त गावांचा टंचाई आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.दरम्यान, तामसवाडी येथील ग्राम पंचायतींचा विहीर अधिग्रहण करण्याबाबत प्रस्ताव दाखल झाला आहे. मस्कावद बुद्रूक ग्रामपंचायतने पाणीपुरवठा योजनेचा भूजलस्त्रोत हरपल्याने मस्कावद खुर्द येथील कूपनलिकेपर्यंत पाईपलाईन करण्यासाठी पाणी टंचाई निर्मूलनासाठी तातडीची पाणीपुरवठा योजनेकरीता आजच प्रस्ताव दाखल केल्याची माहिती सूुत्रांनी दिली. शासनस्तरावरून पाणीटंचाई निर्मुलनासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबवल्या जात असताना मात्र पंचायत समिती प्रशासन गंभीर नसल्याबाबत खंत व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRaverरावेर