शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

असाही फटका, ‘कोरोना’मुळे चीनला कापूस निर्यात ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 12:34 IST

३ लाख गाठी पडूनच, जिल्ह्यात सीसीआयने खरेदी थांबवली

अजय पाटील जळगाव : कोरोना व्हायरस पसरल्यामुळे चीन सरकारने कापसाची ८० टक्के आयात-निर्यात थांबवली आहे. त्यामुळे ३ लाख गाठी भारताकडे पडून आहेत. निर्यात थांबल्यामुळे सीसीआयने देखील जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र बंद केले आहेत. शासकीय खरेदी बंद झाल्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पुन्हा लूट सुरु झाली असून शेतकºयांनाही नाईलाजास्तव हमीभावापेक्षा ५०० रुपये कमी दराने कापूस विक्री करावा लागत आहे.दरवर्षी भारताकडून १२ ते १५ लाख गाठी चीनला निर्यात होतात. यंदा जानेवारीपर्यंत ६ लाख गाठींची निर्यात चीनमध्ये झाली आहे. मात्र, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रमाणामुळे भारतातून जाणारा माल देखील चीनने थांबवला आहे. भारताकडून चीनला पाठविण्यात येणाºया ३ लाख गाठी पडून आहेत. केंद्र बंद करण्याचा फतवासीसीआयचे केंद्र दरवर्षी मार्च-एप्रिलपर्यंत सुरु असतात. मात्र, ३० जानेवारी रोजी सीसीआयने तातडीने पत्र काढून ५ फेब्रुवारीपर्यंत कापूस खरेदी थांबविली. तसेच पुढील आदेश येईपर्यंत खरेदी सुरु करू नये असेही आदेश काढले आहेत. कापूस खरेदी थांबविण्याबाबतचे कोणतेही कारण सीसीआयने दिलेले नाही.हमीभावात १०० रुपयांची घटआंतरराष्टÑीय बाजारात पसरलेल्या मंदीचा परिणाम कापसाच्या भावावर देखील झाला लाखो गाठी भारताच्या बाजारातच पडून असल्याने आठवडाभरात हमीभावात १०० रुपयांची घट झाली आहे. शासनाने कापसाचा हमीभाव ५५५० इतका निश्चित केला होता. मात्र, सध्या ५४५० इतक्या भावाने कापसाची खरेदी होत आहे. सीसीआयने जरी खरेदी थांबवली असली तरी मात्र पणन महासंघाचे खरेदी केंद्र सुरु आहेत.शासकीय खरेदी थांबल्याने शेतकºयांची लुट सुरुहमीभावात १०० रुपयांची घटव्यापाºयांकडून हमीभावापेक्षा तब्बल ५०० रुपये कमी दराने होतेय खरेदीअद्याप ५० टक्के कापूस शेतकºयांच्या घरातचसीसीआयचे केंद्र बंद होताच व्यापारी-एजंट सक्रीय४आतापर्यंत जिनींग किंवा शासकीय खरेदी केंद्रावर १५ लाख क्ंिवटल कापसाची खरेदी झाली आहे. अद्याप ५० टक्के माल शेतकºयांच्या घरातच पडून आहे. त्यातच शासकीय खरेदी थांबल्यामुळे आता ती पुन्हा सुरु होईल की नाही ? याबाबत साशंकता आहे. त्यामुळे आता शेतकºयांना खासगी जिनींग व व्यापाºयांना माल देण्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीत व्यापाºयांकडून ४७०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल कापूस खरेदी केला जात आहे. यामुळे शेतकºयांचे तब्बल ५०० ते ६०० रुपयांचे नुकसान होत आहे.कोरोना व्हायरसमुळे चीनने बाहेरच्या देशातून मालाची आयात पुर्णपणे थांबवली आहे. त्यामुळे आंतरराष्टÑीय बाजारावर देखील त्याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे भावात देखील घट झाली आहे. ही परिस्थिती सुधारल्यास भविष्यात भाव वाढण्याची शक्यता राहिल. मात्र, सध्या तरी तसे चित्र नाही.-हर्षल नारखेडे, जिनर्स व कापूस बाजाराचे तज्ज्ञसीसीआयने खरेदी केंद्र बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, केंद्र बंद करण्याचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. दरम्यान, कापूस बाजारात प्रचंड मंदी आहे. जिनर्सकडेही शेतकºयांनी पाठ फिरवली आहे. चीनने निर्यात पुन्हा सुरु केली तर परिस्थिती सुधारू शकेल.-प्रदीप जैन, अध्यक्ष, खान्देश जिनींग असोसिएशन

टॅग्स :Jalgaonजळगाव