शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

असाही फटका, ‘कोरोना’मुळे चीनला कापूस निर्यात ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 12:34 IST

३ लाख गाठी पडूनच, जिल्ह्यात सीसीआयने खरेदी थांबवली

अजय पाटील जळगाव : कोरोना व्हायरस पसरल्यामुळे चीन सरकारने कापसाची ८० टक्के आयात-निर्यात थांबवली आहे. त्यामुळे ३ लाख गाठी भारताकडे पडून आहेत. निर्यात थांबल्यामुळे सीसीआयने देखील जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र बंद केले आहेत. शासकीय खरेदी बंद झाल्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पुन्हा लूट सुरु झाली असून शेतकºयांनाही नाईलाजास्तव हमीभावापेक्षा ५०० रुपये कमी दराने कापूस विक्री करावा लागत आहे.दरवर्षी भारताकडून १२ ते १५ लाख गाठी चीनला निर्यात होतात. यंदा जानेवारीपर्यंत ६ लाख गाठींची निर्यात चीनमध्ये झाली आहे. मात्र, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रमाणामुळे भारतातून जाणारा माल देखील चीनने थांबवला आहे. भारताकडून चीनला पाठविण्यात येणाºया ३ लाख गाठी पडून आहेत. केंद्र बंद करण्याचा फतवासीसीआयचे केंद्र दरवर्षी मार्च-एप्रिलपर्यंत सुरु असतात. मात्र, ३० जानेवारी रोजी सीसीआयने तातडीने पत्र काढून ५ फेब्रुवारीपर्यंत कापूस खरेदी थांबविली. तसेच पुढील आदेश येईपर्यंत खरेदी सुरु करू नये असेही आदेश काढले आहेत. कापूस खरेदी थांबविण्याबाबतचे कोणतेही कारण सीसीआयने दिलेले नाही.हमीभावात १०० रुपयांची घटआंतरराष्टÑीय बाजारात पसरलेल्या मंदीचा परिणाम कापसाच्या भावावर देखील झाला लाखो गाठी भारताच्या बाजारातच पडून असल्याने आठवडाभरात हमीभावात १०० रुपयांची घट झाली आहे. शासनाने कापसाचा हमीभाव ५५५० इतका निश्चित केला होता. मात्र, सध्या ५४५० इतक्या भावाने कापसाची खरेदी होत आहे. सीसीआयने जरी खरेदी थांबवली असली तरी मात्र पणन महासंघाचे खरेदी केंद्र सुरु आहेत.शासकीय खरेदी थांबल्याने शेतकºयांची लुट सुरुहमीभावात १०० रुपयांची घटव्यापाºयांकडून हमीभावापेक्षा तब्बल ५०० रुपये कमी दराने होतेय खरेदीअद्याप ५० टक्के कापूस शेतकºयांच्या घरातचसीसीआयचे केंद्र बंद होताच व्यापारी-एजंट सक्रीय४आतापर्यंत जिनींग किंवा शासकीय खरेदी केंद्रावर १५ लाख क्ंिवटल कापसाची खरेदी झाली आहे. अद्याप ५० टक्के माल शेतकºयांच्या घरातच पडून आहे. त्यातच शासकीय खरेदी थांबल्यामुळे आता ती पुन्हा सुरु होईल की नाही ? याबाबत साशंकता आहे. त्यामुळे आता शेतकºयांना खासगी जिनींग व व्यापाºयांना माल देण्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीत व्यापाºयांकडून ४७०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल कापूस खरेदी केला जात आहे. यामुळे शेतकºयांचे तब्बल ५०० ते ६०० रुपयांचे नुकसान होत आहे.कोरोना व्हायरसमुळे चीनने बाहेरच्या देशातून मालाची आयात पुर्णपणे थांबवली आहे. त्यामुळे आंतरराष्टÑीय बाजारावर देखील त्याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे भावात देखील घट झाली आहे. ही परिस्थिती सुधारल्यास भविष्यात भाव वाढण्याची शक्यता राहिल. मात्र, सध्या तरी तसे चित्र नाही.-हर्षल नारखेडे, जिनर्स व कापूस बाजाराचे तज्ज्ञसीसीआयने खरेदी केंद्र बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, केंद्र बंद करण्याचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. दरम्यान, कापूस बाजारात प्रचंड मंदी आहे. जिनर्सकडेही शेतकºयांनी पाठ फिरवली आहे. चीनने निर्यात पुन्हा सुरु केली तर परिस्थिती सुधारू शकेल.-प्रदीप जैन, अध्यक्ष, खान्देश जिनींग असोसिएशन

टॅग्स :Jalgaonजळगाव