शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

‘नीट’च्या उत्तरपत्रिका वाटपात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:05 IST

पालकांची तक्रार

जळगाव : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य नीट परीक्षेच्यावेळी त्रिमूर्ती इन्स्टीट्युट आॅफ टेक्नोलॉजी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राच्या ब्लॉक नं़ १० मध्ये उत्तरपत्रिका वाटपाचा घोळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़ याबाबत पालकांनी ह्यलोकमतह्ण कार्यालयात येऊन तक्रार दिली आहे़केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे देशभरातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर नीट ही सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येते़ त्यानुसार शहरातील ओरियन सीबीएनई स्कूल, मू़जे़ विवेकानंद भवन, सेंट जोसेफ स्कूल, त्रिमूर्ती इन्स्टीट्युट आॅफ टेक्नॉलॉजी यासह इतर केंद्रांवर नीट परीक्षा पार पडली़ पाच हजार विद्यार्थ्यांपैकी रविवारी साडेचार हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़गैरहजर विद्यार्थ्याचा पेपरदरम्यान, या परीक्षा केंद्रावरील ब्लॉक नं़ १० मध्ये ३६ विद्यार्थ्यांपैकी १ विद्यार्थी गैरहजर होता़ पर्यवेक्षकाने उत्तरपत्रिका वाटप करताना गैरहजर मुलाच्या पीक़्यू़आऱएस़प्रमाणे तो पेपर त्याच बेंचवर ठेवायला हवा होता़ तसे न करता त्या गैरहजर विद्यार्थ्यांचा पेपर पुढील विद्यार्थ्याला दिला़सर्व पेपर वाटप झाल्यानंतर एक पेपर शिल्लक राहिल्याचे पर्यवेक्षकाच्या लक्षात आले़ अन् उरलेला पेपर हा पर्यवेक्षकाने त्या रिकाम्या बेंचवर ठेवला़ या गोंधळामुळे पीक़्यू़आऱएस़प्रमाणे उत्तरपत्रिकांचे वाटप झाले नाही़ ज्यांना आर फोर उत्तरपत्रिका मिळायला हव्या होत्या़ त्यांना एस फोर उत्तरपित्रका मिळाली़ म्हणजेच उत्तरपत्रिका व विद्यार्थी कोड याप्रमाणे पीक्यूआरएस प्रमाणे उत्तरपत्रिकांचे वाटप झालेले नाही़ या वाटपात घोळ झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे़ हा संपूर्ण प्रकार पाल्यांनी घरी आल्यावर सांगितल्याचेही पालकांनी सांगितले़दरम्यान, या प्रकारामुळे पालक आणि पाल्य अशा दोघांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.मात्र जर उत्तरपत्रिकेवर प्रश्नपत्रिकेवरील सिरीज ही विद्यार्थ्याने योग्य लिहिलेली असेल तर त्या विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, असे समन्वयक सांगत असले तरी याबाबत पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे तो दूर करण्याचे काम करावे लागणार असल्याची चर्चा ऐकायला मिळाली.एनसीईरटी, नीटकडे पालक करणार तक्रार... राज्यभरातून या केंद्रावर विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली़ उत्तरपत्रिकांच्या वाटपाच्या घोळामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी पालक एनसीईआरटी व नीटकडे तक्रार करणार आहेत़ तक्रारीसाठी आॅनलाइन संकेतस्थळ अजून उघडले नसल्यामुळे एका पालकाने लोकमत कार्यालयात येऊन संपूर्ण हकीकत सांगत तक्रार अर्ज दिला.गोंधळामुळे नुकसान तर होणार नाही?गैरहजर विद्यार्थ्याची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका ही पुढील विद्यार्थ्याला मिळाली़ त्यामुळे गैरहजर विद्यार्थ्याच्या पुढील सर्व विद्यार्थ्याचे नुकसान तर होणार नाही, अशी भिती पालकांमध्ये निर्माण झाली आहे़ तसेच कुणी एनसीईआरटी तर कुणी नीटकडे तक्रार करण्यास सांगतात़ मात्र, नीटबाबतकुणीच नीटमार्गदर्शन करीत नसल्याचा आरोप एका पालकाने केला आहे़ याप्रकाराची शासनाने दखल घ्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे़पीक़्यू़आऱएस़ सिरीजपैकी ज्या सीरिजची प्रश्नपत्रिका असेल़ ती सीरिज जर विद्यार्थ्याने त्याच्या उत्तरपत्रिकावर लिहीलेली असेल तर विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही़ याची पालकांनी दक्षता घ्यावी़-अब्राहम मॅथ्यू, नीट, सिटी कॉर्डीनेटर

टॅग्स :Jalgaonजळगाव