शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
4
काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
6
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
7
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
8
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
9
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
10
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
11
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
12
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
13
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
14
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
15
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
16
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
17
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
19
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
20
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी

राष्ट्रीय जल पुरस्कारात आनोरे देशात दुसरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 20:53 IST

संजय पाटील अमळनेर , जि. जळगाव :  पाणी फौंडेशनच्या स्पर्धेत राज्यात तिसरे बक्षीस मिळवणाऱ्या आनोरे गावाला राष्ट्रीय जल पुरस्कार ...

ठळक मुद्दे१०० टक्के वॉटर हार्वेस्टिंग आणि शोषखड्डे करणारे गाव१२ महिने टँकर लागणारे गाव झाले समृद्धलॉकडाऊन काळात तालुक्याला भाजीपाला पुरवला

संजय पाटीलअमळनेर, जि. जळगाव : पाणी फौंडेशनच्या स्पर्धेत राज्यात तिसरे बक्षीस मिळवणाऱ्या आनोरे गावाला राष्ट्रीय जल पुरस्कार २०१९ चे देशात दुसरे बक्षीस मिळाले असल्याचा मेल पंचायत समितीला प्राप्त झाला आगव. ११ नोव्हेंबर रोजी दिल्ली मंत्रालयातून ऑनलाईन पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी दिली.      आनोरे गावाला सतत १२ महिने पाणीटंचाई असल्याने टँकर लागत होते. गावाने पाणी फाऊंडेशन च्या स्पर्धेत भाग घेतला आणि एकजुटीने संपूर्ण गाव कामाला लागले होते. गावाने प्रत्येक घराला सारखा रंग देऊन त्यावर पाणी बचाव, सामाजिक, राष्ट्रीय संदेश रेखाटले होते. प्रत्येक घरातील व्यक्तीने एकाच दिवशी शोष खड्डा खोदून एकाच दिवसात काम पूर्ण केले होते. प्रत्येक घराच्या धाब्यावरील पाणी जमिनीत जिरवण्यात आले होते. १०० टक्के वॉटर हार्वेस्टिंग करणारे महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे. गावाची एकजूट एव्हडी होती की शेताची बांध बंदिस्ती व शेततळी सामूहिक रित्या तर खोदले त्यातून मोठ्या प्रमाणात मृदा व जलसंधारण तर झाले. मात्र आधी श्रमदान करून सामूहिकरित्या एकाचवेळी मतदान करण्याचा विक्रमही आनोरे गावाने केला आहे. एक घर एक झाड हा उपक्रम राबवून गावाच्या प्रवेश वाटेवरदेखील झाडे लावण्यात आली होती.    दोन वर्षात गाव एव्हडे समृद्ध झाले की, एकेकाळी १२ महिने टँकर लागणारे गाव लॉकडाऊन काळात अमळनेर तालुक्याला भाजीपाला पुरवत होते. एव्हडे पाणी साचून बागायती व भाजीपाला उत्पन्न घेतले जात आहे. विहिरींची पाणी पातळी वाढली आहे.     जलमंत्रालयातर्फे देण्यात येणारा  राष्ट्रीय जल पुरस्कार  आनोरे गावाचा देशात दुसरा क्रमांक आला आहे. ११ नोव्हेंबर रोजी पुरस्कार वितरित होणार आहे.राष्ट्रीय जल पुरस्काराच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्रातून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील आनोरे व वाशीम जिल्ह्यातील बोरवा बुद्रुक  या दोनच गावांची निवड झाली होती. तेव्हा जलशक्ती मंत्रालयाच्या केंद्रीय भूमिजल बोर्डाच्या वैज्ञानिक आतीरा आर. यांनी प्रत्यक्ष आनोरे येथे येऊन पाहणी केली होती.

टॅग्स :WaterपाणीAmalnerअमळनेर