शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

६ वर्षांनंतर जळगावात पावसाने गाठली वार्षिक सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 12:01 IST

अवर्षणग्रस्त तालुक्यांमध्येही शंभरी पार : गिरणा ९० तर वाघूर धरणात ७१ टक्के जलसाठा

जळगाव : यंदा वरुण राजा जिल्ह्यात मनसोक्त बरसल्याने तब्बल सहा वर्षांनंतर पहिल्यांदाच पावसाने सरासरी गाठली आहे. याआधी २०१३ मध्ये जिल्ह्यात सरासरी १०२ टक्के पावसाची नोंद झाली होती. यंदा जिल्ह्यातील ९ तालुक्यांनी शंभरीची सरासरी पार केली आहे. यामध्ये अनेक वर्षांपासून अवर्षणाची मार झेलत असलेल्या अमळनेर, जामनेर या दोन तालुक्यांचाही समावेश आहे.काही वर्षांपासून पावसाने पाठ फिरविल्याने सरासरी इतक्या पावसाचीही नोंद होवू शकत नाही. यंदा सहा वर्षाचा विक्रम मोडीत काढत सप्टेंबर मध्यातच पावसाने शंभरी गाठल्याने मोठाच दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने मोठे, मध्यम व निम्न प्रकल्प देखील भरून गेले आहेत. त्यामुळे बळीराजा देखील सुखावला आहे. उन्हाळ्यात नेहमी पाणी टंचाईचा सामना करावा लागत असलेल्या गावांनाही यंदा दिलासा मिळणार आहे.प्रत्येक तालुका झाला पाणीदार२०१३ मध्ये पावसाने वार्षिक सरासरी पार केली होती. त्यावेळेस यावल, चोपडा व रावेर या तालुक्यांची सरासरी जास्त होती. मात्र, जामनेर व अमळनेर तालुक्यात देखील पावसाने देखील जबरदस्त हजेरी लावली आहे. जामनेर व अमळनेर तालुक्यात १०१ टक्के तर धरणगाव तालुक्यात ९१ टक्के पावसाने सरासरी गाठली आहे. रावेर तालुक्यात सर्वाधिक १२० टक्के पाऊस झाला आहे. तर सर्वात कमी ७७ टक्के पाऊस चाळीसगाव तालुक्यात झाला आहे.परतीचा पाऊस बाकीयंदा जिल्ह्यात उशिराने मान्सून दाखल झाला. त्यामुळे जून महिन्यात वरुणराजाच रुसला होता. यामुळे यंदा देखील गेल्या वर्षासारखाच दुष्काळ रहिल अशी भिती व्यक्त केली जात होती. मात्र, त्यानंतर जुलै व आॅगस्टमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे जून महिन्यातील तूट भरून काढली. दरम्यान, जिल्ह्यात होत असलेला पाऊस पश्चिमेकडून येणाऱ्या ढगांमुळेच होत असून, अजून परतीचा पाऊस शिल्लक असल्याने पावसाच्या टक्केवारीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. २०१८ मध्ये जिल्ह्यात सरासरी ६० तर २०१७ मध्ये सरासरी ८० टक्के पाऊस झाला होता.जळगावसह जामनेरचा पाण्याचा प्रश्न मिटलाजोरदार पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमधील जलसाठ्यांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. हतनूर धरणात ४९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गिरणा धरणात ९० टक्के जलसाठा झाल्याने धरणातून पाणी सोडावे लागणार आहे. गिरणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाघूर धरणात देखील ७१ टक्के जलसाठा झाल्यामुळे जळगाव व जामनेर शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मिटला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव