शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

घोषणेमुळे वाटला आधार, पुरेशा इष्टांकाअभावी गरजू निराधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:15 IST

रिॲलिटी चेक लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांमध्ये हाताला काम नसल्याने शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा ...

रिॲलिटी चेक

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांमध्ये हाताला काम नसल्याने शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा झाली खरी, मात्र घेणारे अधिक, इष्टांक कमी यामुळे अनेकांना रिकाम्या हातीच माघारी परतावे लागत आहे. भुकेल्या पोटी केंद्रावर येऊन हाती काहीच न लागल्याने अनेकांची निराशा होत आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग उद्भवला व अनेक व्यवहार बंद झाले. त्यावेळी शिवभोजन केंद्रावरून पाच रुपये थाळी याप्रमाणे आधार दिला गेला. यावर्षी पुन्हा कोरोना झपाट्याने वाढत असून, राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ लागू करत अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही‌. अशा परिस्थितीत रोजंदारी करणाऱ्या व हाताला काम नसलेल्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोफत शिवभ़ोजन देऊन आधार देण्याचा राज्य सरकारने प्रयत्न केला. या संदर्भात शहरातील शिवभोजन केंद्रांची स्थिती ‘लोकमत’ प्रतिनिधीने पाहिली असता, अनेक ठिकाणी घेणारे जास्त व थाळींचे प्रमाण कमी असेच चित्र पाहायला मिळाले.

‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत शिवभोजन केंद्रांवरील इष्टांक तत्काळ संपल्याने जेवढ्या थाळ्या मंजूर असतील जवळपास तेवढ्याच व्यक्ती माघारी गेल्या.

केंद्र बंद

कैलास कोल्ड्रिंक्स याठिकाणी असलेल्या शिव भोजन केंद्रासाठी ७५ थाळींचे इष्टांक आहे. याठिकाणी पाहणी केली असता, ११ वाजता शिवभोजन थाळीचे वाटप सुरू झाल्यानंतर साधारण बारा वाजेपर्यंत सर्व थाळी संपल्या होत्या. यावेळी पाहणी दरम्यान या केंद्राचा दरवाजा लावलेला होता. याठिकाणी असलेल्या व्यक्तींना विचारले असता, त्यांनी थाळी संपल्याचे सांगितले.

तासाभरात पूर्ण

मनोहर रेस्टारंट या शिवभोजन केंद्राच्या ठिकाणीही ७५ थाळी मंजूर आहेत. याठिकाणी पाहणी केली असता, वाटप सुरू झाल्यानंतर एक तासात संपूर्ण थाळींचे वाटप झाले होते. त्यानंतर आलेल्यांना माघारी परतावे लागले.

पोलीस विचारत असताना केंद्रावर मात्र हाती काहीच नाही

श्री व्यंकटेश झुणका-भाकर केंद्र याठिकाणी अनेकजण शिवभोजन थाळी घेण्यासाठी आले होते. मात्र, जेवढ्या थाळी आहेत, तेवढ्यांचे वाटप झाल्यानंतर अनेकांना रिकाम्या हातीच परतावे लागले. दरम्यान, बाहेर पडल्यानंतर पोलिसांकडून विचारणा होते, त्यांना उत्तर देत-देत अनेकजण केंद्रावर पोहोचले होते. मात्र, इष्टांक पूर्ण झाल्याने अनेकांना रिकाम्या हाती परतावे लागले.

जेवढ्या थाळ्या मंजूर आहेत तेवढ्याच ही केंद्र वाटप करू शकतात. सध्या हाताला काम नसल्याने अनेकजण पोटाची खळगी भरण्यासाठी शिवभोजन केंद्राचा आधार घेऊ इच्छितात. त्यामुळे अनेकजण ही थाळी घेण्यासाठी आले तरी त्यांना रिकाम्या हातानेच माघारी परतावे लागत असल्याचे चित्र आहे.

शहरातील केंद्र १६

मंजूर थाळ्या १,२५०

जिल्ह्यातील केंद्र ३८

मंजूर थाळ्या ३,५००

वाढीव थाळ्यांचे नियोजन

अनेकांच्या हाताला काम नसल्याने ते शिवभोजन केंद्राचा आधार घेत आहेत. मात्र, याठिकाणी मंजूर इष्टांक कमी पडत असल्याने थाळ्या वाढवून देण्याचे जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यानुसार आता प्रत्येक केंद्राच्या मंजुरी इष्टांकापैकी दीडपट इष्टांक मंजूर करण्यात आला आहे.