शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
4
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
5
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
6
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
7
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
8
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
9
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
10
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
11
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
12
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
13
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
14
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
15
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
16
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
17
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
18
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
19
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
20
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार केळी उत्पादकांच्या खात्यावर पडणार ३७८ कोटींची रक्कम!

By ajay.patil | Updated: November 3, 2023 19:09 IST

जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार केळी उत्पादकांच्या खात्यावर पडणार ३७८ कोटींची रक्कम!

जळगाव - हवामानावर आधारीत फळ पीक विम्याच्या दोन महिन्यांपासून प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. केळीच्या नुकसानभरपाईची वाट पाहत असलेल्या जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अखेर गोड होणार असून, आठवडाभरात जिल्ह्यातील ५३ हजार ९५१ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३७८ कोटी रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम पडणार असल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी दिली आहे.

हवामानावर आधारीत फळ पीक विम्याची रक्कम दर वर्षाला १५ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पडते. यावर्षी मात्र, विमा कंपनीने केळी उत्पादकांच्या केळी लागवड क्षेत्राच्या पडताळणीचा घाट घातल्यामुळे १५ सप्टेंबरची मुदत संपल्यावर देखील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरभाईची रक्कम पडलेली नव्हती. याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील यांचा पाठपुरावा सुरु होता. दिवाळीच्या आधी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर केळी पीक विम्याची रक्कम पडणार आहे.

५३ हजार शेतकऱ्यांना मिळणार ३७८ कोटींची भरपाई..जिल्ह्यातील ७७ हजार ८३२  केळी उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यापैकी कमी ५३ हजार ९५१ केळी उत्पादक शेतकरी केळी पीक विम्यासाठी पात्र आहेत. कमी व जास्त तापमानाच्या निकषात जिल्ह्यातील ८६ महसूल मंडळांपैकी ५५ महसूल मंडळं पात्र ठरली होती. गेल्या वर्षी लागवड झालेल्या केळीच्या लागवड क्षेत्राबाबत विमा कंपनीने आक्षेप घेतला होता. त्यानंतर जिल्ह्यातील केळी लागवड क्षेत्राची पडताळणी देखील करण्यात आली. पडताळणीनंतर जिल्ह्यातील ५३ हजार ९५१ केळी उत्पादक शेतकरी विम्यासाठी पात्र ठरले आहेत.

केळी पीक विम्याच्या प्रलंबित विषयाबाबत पाठपुरावा सुरु होता. गुरुवारी पुणे येथील कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिकी यांच्यासोबत चर्चा झाली. जिल्ह्यातील ५३ हजार ९५१ केळी उत्पादक पीक विम्यासाठी पात्र ठरले असून, आठवडाभरात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची ३७८ कोटी ३० लाखांची रक्कम पडणार आहे. यासाठी कोणतीही पडताळणी होणार नाही. तसेच प्रलंबित शेतकऱ्यांचाही प्रश्नाबाबत पाठपुरावा सुरु आहे.- उन्मेष पाटील, खासदार

टॅग्स :BananaकेळीJalgaonजळगाव