शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक समतेविषयी आंबेडकर चळवळीचा अग्रक्रम हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 15:11 IST

येत्या ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकर चळवळीची सध्याची स्थिती कशी आहे, याची जमेच्या आणि उणिवा चळवळीतील कार्यकर्ते जयसिंग वाघ यांनी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत मांडल्या आहेत.

लोकांमध्ये आंशिक अथवा पूर्णत: बदल घडवून आणण्यासाठी विशिष्ट विचार प्रणालीच्या आधारे वैयक्तिक अथवा सामूहिकरित्या केले जात असलेले प्रयत्न म्हणजे ‘चळवळ’ अशी चळवळीची व्याख्या करण्यात येते़ या आधारे आंबेडकरवादावर आधारित सामूहिक वा वैयक्तिक स्तरावर सुरू असलेले प्रयत्न म्हणजे आंबेडकरी चळवळ होय़‘आंबेडकरवाद’ म्हणजेच समता-स्वातंत्र्य-बंधूता- न्याय- शांतता- स्त्री-पुरुष समानता व एकूणच मानवतावादी विचार समाजात रुजवून समताधिष्ठित समाज व्यवस्थेची निर्मिती होय़आज आंबेडकरी चळवळ ही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक, धार्मिक, आर्थिक, औद्योगिक, मनोरंजन या व अन्य सर्वच पातळीवर कार्यरत आहे़ यात समाज घटकातील दलित, आदिवासी, ओबीसी़ अल्पसंख्य असे सर्वच जण कमी-अधिक प्रमाणात क्रियाशील आहेत व हे जरी खरे असले तरी या चळवळीची मुख्य धुरा चर्मकार व धर्मांतरीत बौद्धांच्याच हातात आहे, हेसुद्धा तेवढेच खरे आहे़डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर ही धुरा अन्य नेत्यांकडे जरूर आली, पण देशातील सर्वच प्रस्थापित व पुरोगामी नेत्यांनी बाबासाहेबांच्या नावाच्या कार्याचा व विचारधारेचा निव्वळ उदोउदो सुरू ठेवला व याच कारणाने आंबेडकरी चळवळ अधिकाधिक क्षीण होत गेली व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते भरकटत गेले़ हेही एक विदारक सत्य आहे़वरील व्यवस्थेचा परिणाम असाही झाला की, शहरातील झोपडपट्टी व ग्रामीण भागातील आंबेडकरी चळवळीचा आधारभूत समाजघटक हा शिक्षणात १० टक्के, नोकऱ्यांमध्ये तीन टक्के असल्याचे व दारू पिणे, जुगार खेळणे, अप्रतिष्ठित कामे करणे, कोणत्याही प्रकारचे काम न करणे यांचे प्रमाण ६२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे़ मात्र आंबेडकरी चळवळ या व्यवस्थेविरुद्ध लढताना मात्र कुठेच दिसत नाही.़ आंबेडकरी समाज शैक्षणिक, आर्थिक व अन्य पातळीवर सक्षम कसा करता येईल याबाबत या चळवळीत कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला जात नाही़भारतातील प्रामुख्याने दलित-आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारत सरकार सर्वसाधारणपणे दरवर्षी सरासरी १० हजार कोटी रुपये मंजूर करीत असते़ मात्र वास्तव हे आहे की, यातील जवळजवळ ७२ ते ८२ टक्के निधी हा परतच पाठविला जातो व उर्वरित रकमेचे वाटप ७०:३० प्रमाणात होते़ याचाच अर्थ फक्त सात टक्के निधी प्रत्यक्ष खर्च होतो़ या विषयाला या चळवळीने केंद्रस्थानी मानून १०० टक्के रक्कम खर्ची करण्यासाठी प्रयत्न केले तर ‘आर्थिक समता’ प्रस्थापित करण्याकरिता टाकलेले एक क्रांतिकारी पाऊल ठरेल़ आर्थिक समतेतून सामाजिक समतेचा मार्ग सुकर होत असल्याने बाबासाहेबांना अभिप्रेत आर्थिक व सामाजिक समताही प्रस्थापित होण्यास फार काळ वाट पाहावी लागणार नाही़स्वातंत्र्यानंतर प्रामुख्याने दलित-आदिवासी समाजास शैक्षणिक, नोकरीविषयक व राजकीय आरक्षण देण्यात आले़ राजकीय आरक्षण १०० टक्के अंमलात आले पण याआधारे निवडून आलेले प्रतिनिधीच या विषयावर किती गंभीर आहेत, हा एक संशोधनाचा विषय आहे़ त्यांच्या निष्क्रियतेमुळेच हा समाज शिक्षण व नोकरी यास मुकत चालला आहे़ तेव्हा आंबेडकरी चळवळीने याविषयाबाबतही आपले धोरण निश्चित केलेले नसल्याने हा समाज आंबेडकरवाद व आंबेडकरी चळवळ यापासून लांब राहत आहे़या चळवळीचे राजकीय अंग हे सत्तेभोवती व निवडणूक लढविण्यापुरते मर्यादित झालेले दिसते. यातही गमतीची बाब म्हणजे यातील बहुतांश उमेदवार अन्य पक्षांच्या निवडणूक चिन्हांवर लढतात, ही बाब पक्षास व विचारधारेस नक्कीच घातक ठरणारी आहे़ भारतीय नेत्यांना खरी भीती आंबेडकरवादाची आहे़ आंबेडकरी चळवळीची नाही, ही बाब या चळवळीने ओळखून आंबेडकरवाद प्रत्यक्षात आणण्याची चळवळ उभी केली तर संपूर्ण भारताचे राजकारण करण्याची संधी या चळवळीतील नेत्यांना मिळू शकेल़ एवढी ताकद आंबेडकरवादात आहे हे नक्कीच़आंबेडकरी चळवळीसमोर नव्याने उभ्या राहिलेल्या अस्मानी संकटाला समजून घेऊन आंबेडकरवाद्यांनी आपले सवते, सुभे, राजकीय सौदेबाजी बंद करून खरा आंबेडकरवाद आंबेडकरी समाजात रुजवून आंबेडकरी चळवळ गतिमान केली तर, बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला ‘आंबेडकर भारत’ उभारण्यात आपण नक्कीच विजयी होणाऱ-जयसिंग वाघ, जळगाव

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव