शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आर्थिक समतेविषयी आंबेडकर चळवळीचा अग्रक्रम हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 15:11 IST

येत्या ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकर चळवळीची सध्याची स्थिती कशी आहे, याची जमेच्या आणि उणिवा चळवळीतील कार्यकर्ते जयसिंग वाघ यांनी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत मांडल्या आहेत.

लोकांमध्ये आंशिक अथवा पूर्णत: बदल घडवून आणण्यासाठी विशिष्ट विचार प्रणालीच्या आधारे वैयक्तिक अथवा सामूहिकरित्या केले जात असलेले प्रयत्न म्हणजे ‘चळवळ’ अशी चळवळीची व्याख्या करण्यात येते़ या आधारे आंबेडकरवादावर आधारित सामूहिक वा वैयक्तिक स्तरावर सुरू असलेले प्रयत्न म्हणजे आंबेडकरी चळवळ होय़‘आंबेडकरवाद’ म्हणजेच समता-स्वातंत्र्य-बंधूता- न्याय- शांतता- स्त्री-पुरुष समानता व एकूणच मानवतावादी विचार समाजात रुजवून समताधिष्ठित समाज व्यवस्थेची निर्मिती होय़आज आंबेडकरी चळवळ ही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक, धार्मिक, आर्थिक, औद्योगिक, मनोरंजन या व अन्य सर्वच पातळीवर कार्यरत आहे़ यात समाज घटकातील दलित, आदिवासी, ओबीसी़ अल्पसंख्य असे सर्वच जण कमी-अधिक प्रमाणात क्रियाशील आहेत व हे जरी खरे असले तरी या चळवळीची मुख्य धुरा चर्मकार व धर्मांतरीत बौद्धांच्याच हातात आहे, हेसुद्धा तेवढेच खरे आहे़डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर ही धुरा अन्य नेत्यांकडे जरूर आली, पण देशातील सर्वच प्रस्थापित व पुरोगामी नेत्यांनी बाबासाहेबांच्या नावाच्या कार्याचा व विचारधारेचा निव्वळ उदोउदो सुरू ठेवला व याच कारणाने आंबेडकरी चळवळ अधिकाधिक क्षीण होत गेली व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते भरकटत गेले़ हेही एक विदारक सत्य आहे़वरील व्यवस्थेचा परिणाम असाही झाला की, शहरातील झोपडपट्टी व ग्रामीण भागातील आंबेडकरी चळवळीचा आधारभूत समाजघटक हा शिक्षणात १० टक्के, नोकऱ्यांमध्ये तीन टक्के असल्याचे व दारू पिणे, जुगार खेळणे, अप्रतिष्ठित कामे करणे, कोणत्याही प्रकारचे काम न करणे यांचे प्रमाण ६२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे़ मात्र आंबेडकरी चळवळ या व्यवस्थेविरुद्ध लढताना मात्र कुठेच दिसत नाही.़ आंबेडकरी समाज शैक्षणिक, आर्थिक व अन्य पातळीवर सक्षम कसा करता येईल याबाबत या चळवळीत कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला जात नाही़भारतातील प्रामुख्याने दलित-आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारत सरकार सर्वसाधारणपणे दरवर्षी सरासरी १० हजार कोटी रुपये मंजूर करीत असते़ मात्र वास्तव हे आहे की, यातील जवळजवळ ७२ ते ८२ टक्के निधी हा परतच पाठविला जातो व उर्वरित रकमेचे वाटप ७०:३० प्रमाणात होते़ याचाच अर्थ फक्त सात टक्के निधी प्रत्यक्ष खर्च होतो़ या विषयाला या चळवळीने केंद्रस्थानी मानून १०० टक्के रक्कम खर्ची करण्यासाठी प्रयत्न केले तर ‘आर्थिक समता’ प्रस्थापित करण्याकरिता टाकलेले एक क्रांतिकारी पाऊल ठरेल़ आर्थिक समतेतून सामाजिक समतेचा मार्ग सुकर होत असल्याने बाबासाहेबांना अभिप्रेत आर्थिक व सामाजिक समताही प्रस्थापित होण्यास फार काळ वाट पाहावी लागणार नाही़स्वातंत्र्यानंतर प्रामुख्याने दलित-आदिवासी समाजास शैक्षणिक, नोकरीविषयक व राजकीय आरक्षण देण्यात आले़ राजकीय आरक्षण १०० टक्के अंमलात आले पण याआधारे निवडून आलेले प्रतिनिधीच या विषयावर किती गंभीर आहेत, हा एक संशोधनाचा विषय आहे़ त्यांच्या निष्क्रियतेमुळेच हा समाज शिक्षण व नोकरी यास मुकत चालला आहे़ तेव्हा आंबेडकरी चळवळीने याविषयाबाबतही आपले धोरण निश्चित केलेले नसल्याने हा समाज आंबेडकरवाद व आंबेडकरी चळवळ यापासून लांब राहत आहे़या चळवळीचे राजकीय अंग हे सत्तेभोवती व निवडणूक लढविण्यापुरते मर्यादित झालेले दिसते. यातही गमतीची बाब म्हणजे यातील बहुतांश उमेदवार अन्य पक्षांच्या निवडणूक चिन्हांवर लढतात, ही बाब पक्षास व विचारधारेस नक्कीच घातक ठरणारी आहे़ भारतीय नेत्यांना खरी भीती आंबेडकरवादाची आहे़ आंबेडकरी चळवळीची नाही, ही बाब या चळवळीने ओळखून आंबेडकरवाद प्रत्यक्षात आणण्याची चळवळ उभी केली तर संपूर्ण भारताचे राजकारण करण्याची संधी या चळवळीतील नेत्यांना मिळू शकेल़ एवढी ताकद आंबेडकरवादात आहे हे नक्कीच़आंबेडकरी चळवळीसमोर नव्याने उभ्या राहिलेल्या अस्मानी संकटाला समजून घेऊन आंबेडकरवाद्यांनी आपले सवते, सुभे, राजकीय सौदेबाजी बंद करून खरा आंबेडकरवाद आंबेडकरी समाजात रुजवून आंबेडकरी चळवळ गतिमान केली तर, बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला ‘आंबेडकर भारत’ उभारण्यात आपण नक्कीच विजयी होणाऱ-जयसिंग वाघ, जळगाव

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव