शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अमळनेरात कोरोना शून्यावर.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 21:25 IST

अमळनेरात २५ रोजी कोरोनाचा आकडा शून्यावर आल्याने समाधान व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देनियमांची कठोर अमलबजावणी आणि जास्त चाचण्यांचे सकारात्मक परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : प्रशासनाची नाकाबंदी, बाजारपेठेत गस्त आणि कारवाई, आरोग्य विभागाच्या सर्वाधिक चाचण्या आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे २५ रोजी कोरोनाचा आकडा शून्यावर आल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र, यासोबत दक्षता घेण्याचे आवाहनदेखील प्रशासनाने केले आहे.

२५ रोजी ग्रामीण भागात २७५ चाचण्या तर शहरात ४६२ चाचण्या करण्यात आल्या. मात्र, दोन्ही ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्य आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. दुसऱ्या लाटेत २५ मे हा पहिला दिवस उजाडला आहे की, कोरोनाच्या रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत होणारी गर्दीमुळे प्रशासन हतबल झाले होते.

अखेर प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी लोकप्रतिनिधी आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, तसेच डीवायएसपी राकेश जाधव, तहसीलदार मिलींद वाघ, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे तसेच शासकीय डॉक्टरांची बैठक घेऊन ‘कोरोना हटाव’ मोहीम हाती घेण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आणि कठोर कारवाया सुरू झाल्या. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना दंड, मोटरसायकल चालकांवर गुन्हे, नियम मोडून वारंवार दुकाने सुरू ठेवणाऱ्यांची दुकाने सील करणे, मास्क नसलेल्याना दंड करणे, विविध भागात जाऊन अँटीजन चाचण्या करणे, बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांच्या भल्या पहाटे चाचण्या करणे, रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या चाचण्या करणे तसेच तातडीने उपचार करणे, नागरिकांतील कोरोनाची भीती दूर करून डॉक्टरांनाही योग्य उपचारांच्या सूचना देऊन कोरोना नियंत्रणात आला आहे. जास्तीत जास्त रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करता यावेत म्हणून लोकसहभाग देखील घेण्यात आला होता. त्यामुळे वेळीच उपचार होऊन संसर्ग रोखण्यात आला. रुग्ण संख्या शून्यावर आली असली तरी मास्क, सोशल डिस्टन्स आणि वारंवार हात धुणे या सूत्रीचा वापर करावाच, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरcorona virusकोरोना वायरस बातम्या