शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

अमळनेरला कृषी विभागाने केली स्वच्छ भारत अभियानाची ऐसी तैसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 18:27 IST

कृषी विभागाने कार्यालयाचे स्थलांतर करताना जुन्या साहित्याची योग्य विल्हेवाट न लावता, रस्त्यावरच फेकले आहे. यातूनच कृषी विभागाने स्वच्छ भारत अभियानाची चांगलीच ऐसी तैसी केली आहे.

अमळनेर, जि.जळगाव : येथील कृषी विभागाने कार्यालयाचे स्थलांतर करताना जुन्या साहित्याची योग्य विल्हेवाट न लावता, रस्त्यावरच फेकले आहे. यातूनच कृषी विभागाने स्वच्छ भारत अभियानाची चांगलीच ऐसी तैसी केली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.कृषी विभागाच्या एकूणच कार्यप्रणालीबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.येथील कृषी विभागाचे कार्यालय अनेक वर्षे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या न्यू प्लॉट भागातील डॉ.संदेश गुजराथी यांच्या रुग्णालयासमोरील इमारतीत होते. आता हे कार्यालय पटवारी कॉलनी भागातील अन्नपूर्णा मंगल कार्यालयाजवळ नुकतेच स्थलांतरित झाले आहे.स्थलांतर करताना कृषी विभागाने त्यांच्या जुन्या कार्यालयातील बी-बियाणे व खताच्या छोट्या अनेक पिशव्या, दस्तावेज, नियतकालिके, माहिती पत्रके आदींना कचरा कुंडीत न टाकता किंवा पालिकेच्या कचरा गाडीत न टाकता थेट रस्त्यावर टाकले. त्यास आग लावून निघून गेले. हा ढिगारा पूर्ण जळाला की नाही हे पाहण्याचाही त्रासही त्यांनी घेतला नाही. परिणामी या अर्धवट जळालेल्या ढिगाऱ्यातून अत्यंत घाणेरडा व आरोग्यासाठी हानिकारक असलेला वास आजूबाजूच्या नागरी वस्तीत पसरत आहे. येणाºया-जाणाऱ्यांनाही या दुर्गंधीचा त्रास होत आहे. ही बाब ११ रोजी सामाजिक कार्यकर्ते आशीष चौधरी यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत कृषी विभागाला कळविले. मात्र अजूनही हा दुर्गंधीयुक्त ढिगारा ‘जैसे थे’ आहे.बियाणे व खतांची पाकिटे गरजू शेतकºयांना वाटण्याऐवजी त्यांना अशा पद्धतीने नष्ट का करण्यात आले? माहिती पत्रके व नियतकालिकांचे पुरेसे वाटप का झाले नाही? अनेकांच्या सह्या असलेले दस्तावेज अशाप्रकारे का नष्ट केले? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीAmalnerअमळनेर