शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरला कृषी विभागाने केली स्वच्छ भारत अभियानाची ऐसी तैसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 18:27 IST

कृषी विभागाने कार्यालयाचे स्थलांतर करताना जुन्या साहित्याची योग्य विल्हेवाट न लावता, रस्त्यावरच फेकले आहे. यातूनच कृषी विभागाने स्वच्छ भारत अभियानाची चांगलीच ऐसी तैसी केली आहे.

अमळनेर, जि.जळगाव : येथील कृषी विभागाने कार्यालयाचे स्थलांतर करताना जुन्या साहित्याची योग्य विल्हेवाट न लावता, रस्त्यावरच फेकले आहे. यातूनच कृषी विभागाने स्वच्छ भारत अभियानाची चांगलीच ऐसी तैसी केली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.कृषी विभागाच्या एकूणच कार्यप्रणालीबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.येथील कृषी विभागाचे कार्यालय अनेक वर्षे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या न्यू प्लॉट भागातील डॉ.संदेश गुजराथी यांच्या रुग्णालयासमोरील इमारतीत होते. आता हे कार्यालय पटवारी कॉलनी भागातील अन्नपूर्णा मंगल कार्यालयाजवळ नुकतेच स्थलांतरित झाले आहे.स्थलांतर करताना कृषी विभागाने त्यांच्या जुन्या कार्यालयातील बी-बियाणे व खताच्या छोट्या अनेक पिशव्या, दस्तावेज, नियतकालिके, माहिती पत्रके आदींना कचरा कुंडीत न टाकता किंवा पालिकेच्या कचरा गाडीत न टाकता थेट रस्त्यावर टाकले. त्यास आग लावून निघून गेले. हा ढिगारा पूर्ण जळाला की नाही हे पाहण्याचाही त्रासही त्यांनी घेतला नाही. परिणामी या अर्धवट जळालेल्या ढिगाऱ्यातून अत्यंत घाणेरडा व आरोग्यासाठी हानिकारक असलेला वास आजूबाजूच्या नागरी वस्तीत पसरत आहे. येणाºया-जाणाऱ्यांनाही या दुर्गंधीचा त्रास होत आहे. ही बाब ११ रोजी सामाजिक कार्यकर्ते आशीष चौधरी यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत कृषी विभागाला कळविले. मात्र अजूनही हा दुर्गंधीयुक्त ढिगारा ‘जैसे थे’ आहे.बियाणे व खतांची पाकिटे गरजू शेतकºयांना वाटण्याऐवजी त्यांना अशा पद्धतीने नष्ट का करण्यात आले? माहिती पत्रके व नियतकालिकांचे पुरेसे वाटप का झाले नाही? अनेकांच्या सह्या असलेले दस्तावेज अशाप्रकारे का नष्ट केले? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीAmalnerअमळनेर