शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर तालुका दुष्काळी जाहीर होत नाही, तोपर्यंत पुढाऱ्यांना  गावबंदी !

By संजय पाटील | Updated: November 3, 2023 10:57 IST

जानवे ग्रामस्थांनी गावात लावला फलक 

संजय पाटील, अमळनेर जि.जळगाव : शासनाने दुष्काळी तालुक्याची यादी जाहीर केली.   त्यात अमळनेर तालुक्याचा समावेश नाही. तालुका दुष्काळी जाहीर होत नाही, तोपर्यंत पुढाऱ्यांना  गावबंदी करण्याचा निर्णय जानवे ता.अमळनेर येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.

या आशयाचे निवेदन तहसीलदाराना देण्यात आले. अमळनेर तालुक्यात सुरुवातीला सलग ४२ दिवस पाऊस पडलेला नाही.  पाण्याअभावी पिके करपली. शेतकऱ्यांना उत्पन्न आलेले नाही. कापूस, मका ,ज्वारी,उडीद मुग पिकांचे नुकसान झाले आहे. पीक विमा मिळाला नाही. तरीही शासनाने जाहीर केलेल्या यादीत अमळनेर तालुक्याचा समावेश नाही.

जोपर्यंत अमळनेर तालुक्याचे नाव दुष्काळी यादीत येत नाही,  तोपर्यंत राजकीय पक्षाच्या नेत्याला गावात येण्यास बंदी करण्यात येत आहे. कोणी प्रवेश केला तर अपमान करण्यात येईल, असा इशारा देणारे निवेदन जिल्हाधिकारी ,तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे. याबाबत गावात फलक लावण्यात आला आहे. 

निवेदनावर कल्पेश पाटील, शिवाजी पाटील, अशोक बोरसे, समाधान पाटील, शरद पाटील, ललिता पाटील, सरलाबाई पाटील, विजय पाटील , मधुकर पाटील, दगडू पाटील, ईश्वर पाटील ,भुपेश पाटील, प्रकाश पाटील ,  यांच्यासह १०८ शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

टॅग्स :Amalnerअमळनेर