शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

२०पासून तीन दिवस अमळनेर कडकडीत बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 16:49 IST

२० आणि २१ मार्च रोजी अमळनेर शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश इंसिडन्ट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देइंसिडन्ट कमांडर सीमा मोरे यांचा आदेश, भाजीपाला, किराणा दुकानही बंद

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्याने २० आणि २१ मार्च रोजी अमळनेर शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश इंसिडन्ट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी दिले आहेत तर २२ रोजी पालिकेने जनता कर्फ्यू आणि ‘नो व्हेईकल डे’चे आदेश दिल्याने सतत तीन दिवस अमळनेर बंद राहणार आहे.

दररोज शहराच्या विविध भागात अँटीजन चाचण्या केल्या जात असताना बाजारात अधिक प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने साखळी तोडण्यासाठी सीमा अहिरे यांनी हा निर्णय घेतला आहे. निर्णयाच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांची असणार आहे.

काय राहील बंद!

२० व २१ रोजी सर्व बाजारपेठ, किराणा दुकान, किरकोळ भाजीपाला खरेदी विक्री, शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, खाजगी कार्यालये, धार्मिक स्थळे, सभा, कार्यक्रम, मेळावे, बैठक, शॉपिंग मॉल, सलून, पानटपरी, हातगाड्या, हॉटेल, बगीचा, व्यायामशाळा, नाट्यगृह लिकर शॉप्स, सर्व काही बंद राहणार आहे.

आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५च्या कलम ५१ ते ६०नुसार, भादंवि १८६०च्या ४५ कलम १८८प्रमाणे व फौजदारी संहिता १९७३च्या तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

काय सुरू राहील

खाद्य पार्सल सेवा, दूध विक्री, अम्ब्युलन्स सेवा, औषधी दुकाने, दवाखाने, आपत्ती व्यवस्थापन घटक आदी सेवा सुरू राहणार आहेत.

दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सोमवारी २२ रोजी आठवडे बाजार तर पालिकेच्या उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्या आदेशाने जनता कर्फ्यूचे व ‘नो व्हेईकल डे’चे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे तिसऱ्या दिवशी २२ मार्च रोजी दूध, कृषी व्यवसाय आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीही तीन दिवस बंद

शनिवार रविवारी दोन दिवस कडकडीत बंद असल्याने व सोमवारी जनता कर्फ्यु असल्याने तीन दिवस प्रशासनाला सहकार्य करत बाजार समितीतील खरेदी बंद ठेवण्यात येणार आहे. मंगळवारी नियमितपणे बाजार समिती सुरू होईल, अशी माहिती सहसचिव बाळासाहेब शिसोदे यांनी दिली.

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरcorona virusकोरोना वायरस बातम्याAgriculture Sectorशेती क्षेत्र