शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

अमळनेर येथील विवाहात दिव्यांगांना आहेर देऊन दु:खावर घातली फुंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 15:43 IST

शरीराच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे लग्न समारंभात जाऊ न शकणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना लग्नात सन्मानाने बोलावून त्यांना आहेर देऊन त्यांच्या मनाला आनंद देण्याचे काम प्रा.जयश्री साळुंखे यांनी आपल्या कन्येच्या लग्नाच्या निमित्ताने केले आहे.

ठळक मुद्देदिव्यांगांना आहेरअक्षताऐवजी फुलेप्रथमच आदिवासी मंगलाष्टके देवतांऐवजी थोरपुरुषांच्या प्रतिमा रूढींना फाटा देऊन आगळ्या वेगळ्या विवाहाने समाज बदलण्याचा प्रयत्नलग्न समारंभात दिव्यांग व्यक्तींचा असाही सन्मानअमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या जयश्री निकम यांचा असाही उपक्रमप्रेरणादायी उपक्रमाची समाजात दखल

संजय पाटीलअमळनेर, जि. जळगाव : सर्वसाधारणपणे शरीराच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे लग्न समारंभात जाऊ न शकणाऱ्या दिव्यांग अशा १०० व्यक्तींना लग्नात सन्मानाने बोलावून त्यांना आहेर देऊन त्यांच्या मनाला आनंद देण्याचे काम सामाजिक कार्यकर्त्या आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्षा प्रा.जयश्री साळुंखे यांनी आपल्या कन्येच्या लग्नाच्या निमित्ताने केले आहे. आदिवासी मंगलाष्टके प्रथमच म्हणण्यात आले.प्रा.जयश्री साळुंखे यांची कन्या तनया हिच्या विवाहानिमित्ताने त्यांनी समाजातील सर्व क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रित करण्यासोबतच अशा आनंददायी सोहळ्याच्या आनंदापासून वंचित राहणाºया दिव्यांग व्यक्तींनाही आमंत्रित करून त्यांना आहेरचेदेखील वाटप केले. ममता मतिमंद विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांना तसेच शहरातील ५० अपंग व्यक्तींना कपडे, डबे अशा वस्तू भेट स्वरूपात देण्यात आले. या विवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे हळदीच्या वेळीदेखील डीजेला फाटा देत साध्या पद्धतीने नृत्य ठेवण्यात आले होते.प्रत्येक विवाहात पूजेसाठी गणपती ठेवला जातो. मात्र या विवाहाच्या माध्यमातून समाजसुधारक थोरपुरुषांची आणि त्यांच्या कार्याची ओळख सामान्य जनतेला व्हावी म्हणून जिजामाता, शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, शाहू महाराज, मदर तेरेसा, झाशीची राणी, बिरसा मुंडा, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सानेगुरुजी, बहिणाबाई, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, तुकाराम महाराज अशा अनेक थोरपुरुषांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या.मंगलाष्टकेदेखील आदिवासी सादर करण्यात आली. प्रथमच आदिवासी मंगलाष्टके तयार करून त्यांचा उपयोग या विवाहात करण्यात आला. वरातीतदेखील आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. अक्षता टाकल्याने कितीतरी तांदळाचे नुकसान होते म्हणून त्याऐवजी फुलांच्या पाकळ्या अक्षता म्हणून टाकण्यात आल्या. अशाप्रकारे विवाह समारंभातून सामाजिक कार्य आणि पारंपरिक अनावश्यक खर्चाला आळा घालून अन्नधान्याचीही नासाडी थांबवण्याची गरज असल्याचे या विवाह सोहळयात बोलून दाखवले. समाजाची दिशा बदलणारा, प्रेरणा देणारा हा विवाह सोहळा होता.

टॅग्स :SocialसामाजिकAmalnerअमळनेर