शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

अमळनेर बाजार समितीत १५ हजार क्विंटल धान्याची विक्रमी आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 17:57 IST

१० दिवसांनंतर बाजार समितीने धान्य खरेदी सुरू करताच पहिल्याच दिवशी सुमारे १५ हजार क्विंटलची प्रचंड आवक झाली.

ठळक मुद्दे८०० वाहने शिस्तीत व कोरोना नियम पाळत खरेदीरोखीने पेमेंट मिळाल्याने शेतकरी समाधानी

संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : तब्बल १० दिवसांनंतर बाजार समितीने धान्य खरेदी सुरू करताच पहिल्याच दिवशी सुमारे १५ हजार क्विंटलची प्रचंड आवक झाली. जळगाव जिल्ह्यासह अनेक तालुक्यातून शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीस आणला होता. डिस्टन्सची काळजी घेत शिस्तीत मालाचा लिलाव करण्यात आला.शेतकऱ्यांचा रब्बी माल काढून घरात ठेवला होता. मात्र लॉकडाऊनमुळे पैसा नसल्याने शेतकरी हैराण झाले होते. अनधिकृत व्यापाºयांनी खेड्यांमध्ये जाऊन शेतकºयांचा गहू १२०० रुपये क्विंटल भावाने खरेदी करून लूट करीत होते म्हणून शेतकºयांनी बाजार समिती सुरू करण्याची मागणी केली होती. सकाळी साडेसात वाजेपासून बाजार समिती बाहेर बसंस्थानकपर्यंत एक कि.मी.ची रांग लागली होती. सभापती प्रफुल पाटील स्वत: प्रवेशद्वारावर थांबून एक वाहन सोबत चालक व्यतिरिक्त एकाच शेतकºयाला प्रवेश देत होते. बाजार समिती आवार फुल झाल्यानंतर शेतकी संघ जिनमध्ये वाहनांची सोय करण्यात आली. लोकडाऊनमुळे शेतकºयांच्या मालाची सुमारे ७०० ते ८०० वाहनांची गर्दी झाली होती.एरव्ही ११ वाजेला सुरू होणारा लिलाव व्यापारी, हमाल, मापाडी, गुमास्ता यांनी नऊला लिलाव सुरू केला. आवारात चार ठिकाणी हात धुवायला साबण व पाण्याच्या बादल्या ठेवल्या होत्या, तर कर्मचारी व व्यापारी यांच्याजवळ सॅनिटायझर उपलब्ध होते.क्विंटलमागे एक किलो कटती कापणे रद्द केल्यानंतर प्रथमच १५ हजार क्विंटल मालाची आवक झाली. गव्हाला १६०० ते १९००, हरभºयाला ४३०० ते ५५००, दादरला ३२०० ते ४१००, मक्याला १५०० ते १६०० व बाजरीला २२०० ते २५०० रुपये भाव मिळाल्याने व रोखीने पैसा मिळाल्याने शेतकरी आनंदी होते . एकाच दिवसात सुमारे साडेतीन कोटींची उलाढाल झाली.सभापती प्रफुल पाटील, संचालक पराग पाटील, विश्वास पाटील, भगवान कोळी, हरी वाणी, शंकर बितराई समक्ष थांबून गर्दी करणाºयांना बाहेर जाण्याविषयी सांगत होते. आमदार स्मिता वाघ, प्रांताधिकारी सीमा अहिरे, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी भेट देऊन नियमांचे पालन व सोशल डिस्टन्सचे पालन होते की नाही याची पाहणी केली. कोरोनामुळे बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदा शिस्तीत व वेळेत खरेदी झाल्याची प्रतिक्रिया व्यापाºयानी व्यक्त केली.भादली, तरसोद, धरणगाव, पाचोरा, चोपडा, एरंडोल, पारोळा, भडगाव, शिरपूर, शिंदखेडा, यावल, नरडाणा, बेटावद, धुळे आदी तालुके व परिसरातील शेतकºयांनी आपला माल विक्रीस आणला होता.शेतकºयांची लूट थांबून वेळीच त्यांचा माल विक्री होऊन त्यांच्या हातात लॉकडाऊनमध्ये देखील पैसा उपलब्ध व्हावा म्हणून परवानाधारक व्यापाºयांच्या बाजार समिती सुरू सहकार्याने करून रोखीने मोबदला देण्यात आला व कटती कापलेली नाही.-प्रफुल पाटील, सभापती बाजार समिती, अमळनेरबाजार समिती सुरू झाल्याने गावात १२०० रुपयाने विकला जाणारा गहू १७५५ रुपये क्विंटलने विकला गेला व रोख पैसे मिळाले.-महेश पाटील, शेतकरी 

टॅग्स :MarketबाजारAmalnerअमळनेर