शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

सन्मार्ग आणि सन्मतीलाभो सदा सत्संगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 12:43 IST

ईश्वराने हे विश्व निर्माण केले आहे. मानव ही त्याची एक अद्भुत अशी निर्मिती आहे. ईश्वर म्हणजे परमात्मा हाच जिवात्मा ...

ईश्वराने हे विश्व निर्माण केले आहे. मानव ही त्याची एक अद्भुत अशी निर्मिती आहे. ईश्वर म्हणजे परमात्मा हाच जिवात्मा बनून मनुष्य रुप धारण करतो आणि वेळ आली की तो जिवात्मा पुन्हा त्या परमात्म्यामध्ये विलीन होतो हा जन्म मरणाचा फेरा सतत चालत असतो. मानवी जीवनाला ईश्वराची अंतरिक ओढ असते. कितीही नास्तिक असला तरी कुठे तरी मनात या गुढ शक्तीची जाणीव ही असतेच. या कलीयुगामध्ये आले जीवन कसे असावे हे आपल्या विचारावर अवलंबून आहे. आपल्याला ईश्वराची आवड किती आहे, आपण त्याची उपासना करण्यास पात्र आहोत अथवा नाही हे ज्यावेळी आपल्याला जाणवते तेव्हा सद्गुरूचे पाय धरावे तेव्हा सद्गुरूची कृपा होऊन आपण परमार्थाच्या मार्गावर येऊ शकतो. मनाच्या आत असलेले दोष ईश्वराच्या नामस्मरणाने धुतले जातात.हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय ...पवित्रची होय देह त्याचा ।।या माऊली ज्ञानोबांच्या ओळी हेच सांगून जातात. नामस्मरणाने दोष धुतले गेले की मन आणि विचाराला एक अद्भत अशी शक्ती प्राप्त होते. ज्यावेळी मन शक्तीवान होईल तेव्हा बुद्धी विचार करायला लागून आपण आपोआप ईश्वरीय शक्तीकडे ओढले जातो. ईश्वरीय शक्तीची एकदा जाणीव झाली की तिचा उपयोग करून या जिवाला कल्याणाचा मार्ग सापडतो. जिवाचे कल्याण होते. कारण गुरू हे ईश्वरी अनुभव घेतलेले जिवात्मे असतात. गुरू म्हणजे एखादी व्यक्ती नसून ती एक ईश्वरीय शक्ती आहे.त्यांच्या मार्गदर्शनाने परमार्थाचा मार्ग कसा चालावाा हे आपल्याला कळून येते. आपण एखाद्या गुरूचे शिष्यत्व पत्करले असेल तर त्या गुरूला भक्तीने शरण जा. आपली जर नितांत श्रद्धा असेल तर ईश्वरी शक्तीचा आदेश होऊन, शक्ती आपल्याला अनुभवता येते. परमेवर शक्ती जिवंत आहे. ती आपल्याला योग्य वेळी मार्ग दाखविते. मार्ग दाखविते याचाच अर्थ आपल्याला ज्ञान प्राप्त होते. आणि ज्ञान प्राप्त झाले म्हणजे ईश्वरी शक्ती अनुभवाला आलीच पाहिजे आणि हे फक्त हा जिवात्मा जिवंत आहे तेव्हाच शक्य आहे.श्रद्धा ठेवा कारण श्रद्धा म्हणजे काय तर आपल्याला गुरूंनी घालून दिलेला परमार्थाचा पारंपारिक मार्ग. तो मार्ग आपण सातत्याने श्रद्धापूर्वक आचरावयाचा आहे. सदाचरण करावे. अपशब्द न बोलता गुरूवाक्य गुरूनाम पुन्हा - पुन्हा आठवत जावे तरच तुम्हाला परमेश्वराचे सहाय्य होईल.- नाना महाराज कुलकर्णी, पिंप्राळा.

टॅग्स :Jalgaonजळगाव