शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

रक्तदान चळवळ वाढवण्यासाठी सोशल मीडियाचा असाही वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 00:53 IST

सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून त्यातून मोठी रक्तदान चळवळ उभारून मनोज शिंगाणे या अमळनेरच्या युवकाने आतापर्यंत अति गरजू सुमारे ३५० रुग्णांना रक्त उपलब्ध करून त्यांचे प्राण वाचवले आहेत.

ठळक मुद्देअमळनेर येथील मनोज शिंगाणे या युवकाचा युवादिनानिमित्त संकल्पआतापर्यंत साडेतीनशेवर गरजू रुग्णांना उपलब्ध करून दिलेआवश्यक रक्त, चळवळ संपूर्ण महाराष्टÑात उभारणार

संजय पाटील ।अमळनेर, जि.जळगाव : सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून त्यातून मोठी रक्तदान चळवळ उभारून मनोज शिंगाणे या अमळनेरच्या युवकाने आतापर्यंत अति गरजू सुमारे ३५० रुग्णांना रक्त उपलब्ध करून त्यांचे प्राण वाचवले आहेत.साधारणत: दीड वर्षांपूर्वी एका लहान मुलीला तातडीने रक्ताची गरज होती. पालक केविलवाण्या स्वरूपात फिरत असताना मनोज शिंगाणे यांनी सोशल मीडियावर संदेश टाकला आणि काही वेळात रक्त उपलब्ध झाले. त्या दिवसापासून शिंगाणे यांनी सोशल मीडियाचा सकारात्मक वापर होऊ शकते हे ओळखून युवकांचा ग्रुप तयार केला. त्यांच्या रक्तगटाची माहिती ठेवली आणि हळूहळू तिनशेवर युवक जोडले गेले. शहरातील खासगी अथवा सरकारी दवाखान्यात गंभीर रुग्ण आला की तातडीने मनोज शिंगाणे याना फोन येतो. तत्काळ सोशल मीडियावर संदेश जाताच अवघ्या १० ते १५ मिनिटात रक्त देणारी व्यक्ती पतपेढीत पोहचते. अगदी मृत्यूच्या दाराशी पोहचलेल्या व्यक्तींना वेळेवर रक्त मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.या चळवळीचे कार्य शिरपूर, चाळीसगाव, धुळे, चोपडा आदी परिसरात पोहचले आणि त्या ठिकाणी असलेल्या रक्तपेढ्या व युवक जोडले गेले. अमळनेरचे गंभीर रुग्ण धुळ्याला पाठवले जातात. त्यांना रक्त लागल्यास शिंगाणे सोशल मीडियावर संदेश पाठवून धुळ्यातच रक्त उपलब्ध करून देतात. मुंबई, पुणे येथे गेलेल्या रुग्णांनादेखील त्यांनी तेथील खान्देशी व्यक्तींकडून ऐनवेळी रक्त उपलब्ध केले आहे.भरकटलेल्या तरुणाईला मार्गदर्शकओ निगेटिव्ह, बी निगेटिव्ह यासारखे दुर्मीळ ग्रुपचे रक्त मिळणे अवघड असते. मात्र पर्यायी रक्तदाता उपलब्ध करून त्या गटाची पिशवी लगेचच मिळवून देतात. त्यामुळे रुग्णावर उपचार अथवा शस्रक्रिया करण्यास अडचण येत नाही. भरकटलेल्या तरुणाईला सोशल मीडियाचा सकारात्मक वापर कसा करावा, हे मनोज शिंगाणे उत्तम उदाहरण म्हणावे लागणार आहे.रुग्णाला वेळीच उपचार मिळतात आणि अशा बिकटप्रसंगी नातेवाईकांची ससेहोलपट होऊ न देता, त्यांची होणारी धावपळ व हाल थांबतात; यातच समाधान आहे. तीन-चार तालुक्यांच्या ग्रुपशी जोडलो गेलो आहे. चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर उभारण्याचा संकल्प आहे.-मनोज शिंगाणे, अमळनेर

टॅग्स :SocialसामाजिकAmalnerअमळनेर