शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

निवेदन देण्यासाठी ‘हम पॉंच’ला मुभा! शासकीय कार्यालयात घोषणाबाजीला बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2023 15:36 IST

आंदोलनकर्त्यांना शासकीय कार्यालयात घोषणाबाजी करायलाही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विविध कार्यालय प्रमुखांना निवेदन देण्यासाठी होणाऱ्या गर्दीला आता लगाम बसणार आहे.

- कुंदन पाटील

जळगाव : जिल्ह्यातील आंदोलनकर्त्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. त्यानुसार निवेदन देण्यासाठी आता पाच जणांनाच परवानगी असणार आहे. तसेच आंदोलनकर्त्यांना शासकीय कार्यालयात घोषणाबाजी करायलाही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विविध कार्यालय प्रमुखांना निवेदन देण्यासाठी होणाऱ्या गर्दीला आता लगाम बसणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयात अनेक जण, राजकीय संघटना, अराजकीय संघटना, मोर्चा काढून निवेदन देण्यासाठी येतात. कार्यालयासह परिसरात घोषणाबाजी करुन कार्यालयातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी अमन मित्तल यांनी एक परिपत्रक काढले असून याद्वारे निवेदन देण्याबाबत मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार संबंधित सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांना सूचना करण्यात आल्या आहेत.

अशी आहे संहिता१) निवेदन देण्यापूर्वी एक दिवस आधी संबंधित पोलीस स्टेशन आणि संबंधित कार्यालयाच्या प्रमुखाला एक दिवस आधी कळवावे लागणार आहे.२) निवेदन देतांना मोर्च्यामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षात घेऊन पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरविण्याची जबाबदारी संबंधित पोलीस निरीक्षकाची असणार आहे.३) मोर्चामधील केवळ ५ व्यक्तींना निवेदन देण्याची मुभा राहील. मोर्चा काढून निवेदन देतांना शासकीय कार्यालयात शांतता ठेवणे आवश्यक राहील. ४) कार्यालयातील कर्मचाऱ्यांना, कार्यालयात उपस्थित नागरिकांना घोषणाबाजीमुळे त्रास होणार नाही, याबाबत संबंधितांना पूर्व यासंदर्भात सूचना द्यावी. तरीही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संघटनांवर संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सूचित केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव