शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

‘आमदारकी’साठी युतीमध्येच चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 13:05 IST

‘आमचं ठरलंय’ म्हणत असले तरी तिढा सोडविताना होणार दमछाक; मात्र तुटण्याइतके ताणले जाणार नाही, काँग्रेस-राष्टÑवादीकडे इच्छुक आहेत; परंतु पक्षश्रेष्ठींची निवडपध्दती आणि पाठबळावर समीकरण अवलंबून

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर भाजपा-शिवसेना युती जोमात आहे. परस्परांवर टीकेची झोड उठविण्याची एकही संधी न सोडणारे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते आता गळ्यात गळा घालून फिरताना दिसत आहे. नाराजी असली तरी ती उघडपणे बोलणे टाळले जात आहे. लोकसभा निवडणुकीत कोणी कुणाचं काम केलं हे जगजाहीर असताना ‘झाकली मूठ सव्वालाखाची’ ठेवण्याकडे सगळ्यांचा कल आहे. वातावरण चांगले असल्याने युतीचे नेते प्रयोग करण्याची दाट शक्यता असल्याने विद्यमान आमदारांना धाकधूक आहेच.उत्तर महाराष्टÑातील ८ जागा जिंकून भाजप-सेनेचे एकमुखी नेतृत्व हाती घेतलेल्या गिरीश महाजन यांच्याकडेच विधानसभा निवडणुकीची धुरा असेल हे निश्चित झालेले आहे. महाजन यांचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले चांगले संबंध लक्षात घेता, भाजपसोबतच सेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सेनेचे दोन्ही मंत्री गुलाबराव पाटील व दादा भुसे यांच्याशी महाजन यांचा स्रेह आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर अडचण येणार नाही.गेल्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्याने भाजप-शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. सेनेच्या पारंपरिक जागांवर भाजपने विजय मिळविला होता. उदाहरणार्थ जळगाव, धुळे, भुसावळ याठिकाणी भाजप प्रथमच लढला आणि विजयी झाला. सेनेला असे यश मिळाले नाही. भाजपने तब्बल १० जागा खान्देशातील तिन्ही जिल्ह्यात जिंकल्या. काँग्रेसने ५ तर राष्टÑवादीने एक जागा जिंकली. सेनेला तीन जागा मिळाल्या तर अमळनेरला अपक्ष उमेदवार विजयी झाला.युतीमधील मोठ्या भावाची भूमिका भाजपने स्वीकारल्याने आता युतीमध्ये ताणतणाव राहणार नाही. जळगाव जिल्ह्यातील ११ जागांपैकी ६ जागा भाजपने जिंकल्या तर सेनेने ३ जागा जिंकल्या आहेत. जागावाटपात त्या तशाच राहतील. पाचोरा, चोपडा आणि जळगाव ग्रामीणमध्ये आताही भाजपकडे समर्थ उमेदवार नाही. पारोळ्याची जागा पारंपरिकपणे सेनेकडे आहे. चिमणराव पाटील, डॉ.हर्षल माने हे तुल्यबळ उमेदवार सेनेकडे आहेत, तसे भाजपकडे नगराध्यक्ष करण पवार, मच्छिंद्र पाटील हे सक्षम उमेदवार आहेत. अमळनेरात अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्विकारले असल्याने त्यांचा उमेदवारीचा दावा प्रबळ राहील. मात्र माजी आमदार साहेबराव पाटील, आमदार स्मिता वाघ या स्पर्धेत आहेच.धुळे शहर वगळता धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात सेनेचा फार वरचष्मा नाही. धुळ्यात गेल्यावेळी भाजपने अनिल गोटे यांना उमेदवारी देऊन या मतदारसंघावर कब्जा मिळविला. आता त्यांच्याकडे डझनाहून अधिक इच्छुक आहेत. सेनेत प्रा.शरद पाटील, सतीश महाले यांच्यासह अर्धा डझन नेते इच्छुक आहेत. शिरपूर, साक्री, धुळे ग्रामीण, धडगाव, नवापूर हे काँग्रेसचे मतदारसंघ टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान काँग्रेसपुढे आहे. राष्टÑवादीचे आव्हान फारसे नाहीच. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस अशीच लढत राहील. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता भाजप यंदा अधिक जोर लावेल आणि त्यासाठी मातब्बरांबरोबरच उच्चशिक्षित, स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार देण्याची शक्यता नाकारता येत नाही.काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत मातब्बर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले होते. त्यांनी लढतदेखील चांगली दिली. अनपेक्षित निकालामुळे उमेदवार, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज होणे स्वाभाविक आहे. एक चांगले झाले, की पराभवाचे खापर फोडण्यासाठी आरोप-प्रत्यारोप फारसे झाले नाही. तिकीट मागणाऱ्यांची संख्या कमी असेल, पण स्पर्धा नाही, असे अजिबात राहणार नाही. योग्य उमेदवाराची निवड ही युतीपुढे आव्हान ठरु शकते.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव