शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 18:04 IST

चाळीसगाव दाैऱ्यावर आलेल्या माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ‘लोकमत’ला दिलेली खास मुलाखत...

ठळक मुद्दे सदाभाऊ खोत : मराठा समाजाला आरक्षण मिळूच नये, हीच सरकारची भूमिका

जिजाबराव वाघ

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : समाजातील सर्वच घटक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. कोरोना महामारीत रोजगार बुडाले आहेत. खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हाती पैसा नाही. बँका कर्ज देण्यासाठी नकारघंटा वाजवत आहेत. तथापि, राज्य सरकार सर्वच घटकांसोबत शेतकऱ्यांनादेखील वाऱ्यावर सोडून वसुली करण्यात मात्र गुंग आहे, असा आरोप माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केला.

बुधवारी ते चाळीसगावी रयत क्रांती संघटना आयोजित शेतकरी मेळाव्यासाठी येथे आले होते, त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी बातचीत केली. यावेळी आमदार मंगेश चव्हाण उपस्थित होते.

प्रश्न : शेतकऱ्यांविषयी या सरकारची भूमिका कशी? तुमचे निरीक्षण काय?

सदाभाऊ : शेतकऱ्यांबाबत एकूणच राज्यातील विद्यमान महाविकास आघाडी सरकारची भूमिका निराशाजनक आहे. सद्य:स्थितीत शेतकऱ्यांची चौफेर कोंडी झाली आहे. खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांकडे पैसा नाही. बँका त्यांना दारात उभे करायला तयार नाही. या सरकारकडे शेतकऱ्यांना सावरण्यासाठी आणि मदत करण्यासाठी कोणताही ठोस कृती कार्यक्रम नाही. ज्यांनी नियमित कर्जफेड केली, त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने अद्यापही अनुदान दिलेले नाही.

प्रश्न : तुम्ही राज्यभर दौरा करीत आहात, शेतकऱ्यांची स्थिती काय?

सदाभाऊ : कोरोना महामारीत शेती व्यवसायही अनंत अडचणीत सापडला आहे. अनेकांचा रोजगार बुडाला आहे. समाजातील बहुतांशी घटक यात भरडले जात आहेत. काही भागांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाच्या एसआरपीची रक्कम मिळालेली नाही. अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही भरपाईची प्रतीक्षाच आहे. शेतकरी हतबल आणि हवालदिल झाले आहेत. राज्य सरकारचे मात्र दुर्लक्ष झाले आहे.

प्रश्न : पीक विम्याबाबत काय स्थिती आहे?

सदाभाऊ : पीक विम्याच्या रकमेबाबतही राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कपाळी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी पाच हजार दोनशे कोटी रुपये भरले. त्यांच्या हाती फक्त ९५० कोटी पडले आहेत. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करू, असे आश्वासन याच सरकारने दिले होते. मात्र, वीज बिल माफ तर झालेच नाही. याउलट वसुली मोहीम राबवली जात आहे. हे शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे.

प्रश्न : मराठा आरक्षणाविषयी काय सांगाल?

सदाभाऊ : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठोस व प्रामाणिक भूमिकेमुळेच महायुतीच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळाले. ते उच्च न्यायालयातही टिकले. विद्यमान राज्य सरकार मात्र सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाची बाजू ठोसपणे मांडू शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारने माहितीपूर्ण भूमिका घेणे गरजेचे होते. तसे मात्र झाले नाही. या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही, हे खरे आहे.

प्रश्न : मराठा आरक्षणाविषयी विशेषतः तुम्ही कोणाला जबाबदार धरणार?

सदाभाऊ : मराठा आरक्षणाची लढाई ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापित मराठा समाजबांधव आहेत. ही लढाई जशी देशस्तरावर आहे, तशीच ती राज्यातही आहे. सरकार जसे आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक नाही, तसेच प्रस्थापित राजकारणीदेखील यात मताचे आहेत. प्रस्थापित राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारणी विस्थापित व गरीब मराठा समाजाला आरक्षण देऊच शकत नाहीत. त्यांची आजवरची भूमिका अशीच राहिली आहे.

प्रश्न : ओबीसी आरक्षणाचा प्रश्नही तापला आहे. त्याविषयी काय सांगाल?

सदाभाऊ : हेही राज्य सरकारचेच अपयश आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले. त्यांची जनगणना होऊ शकलेली नाही. यामुळेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर वरवंटा आला आहे. एकूणच समाजातील सर्वच घटकांची राज्य सरकारकडून निराशा होत आहे. मात्र, सरकारला याचे कोणतेही सोयरसुतक नाही.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावSadabhau Khotसदाभाउ खोत interviewमुलाखत