शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

'इंडिया'चा गवगवा करणाऱ्यांनाच आता इंडियाची ॲलर्जी! उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

By सुनील पाटील | Updated: September 10, 2023 15:36 IST

मनपात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण

सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: आतापर्यंत ज्यांनी इंडियाचा गवगवा केला, आता त्यांनाच इंडियाची ॲलर्जी होऊ लागली. खाज सुटायला लागली अशी टिका माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख (ठाकरे गट) उध्दव ठाकरे यांनी रविवारी भाजपवर केली. महापालिकेच्या आवारात साकारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण ठाकरे यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर खासदार संजय राऊत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, संपर्क प्रमुख संजय सावंत, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन आदी उपस्थित होते. जयश्री महाजन, सुनील महाजन व कुलभूषण पाटील यांच्याहस्ते सव्वा किलो चांदीची तलवार ठाकरे यांना भेट देऊन सत्कार करण्यात आला. ११.३७ वाजता ठाकरे यांचे महापालिका आवारात आगमन झाले. प्रारंभी पुतळ्याचे अनावरण त्यांच्याहस्ते करण्यात आले.

कामाची उंची कधी गाठणार?

महापालिका आवारात उभारण्यात आलेला पुतळा किती फुटाचा व जगातील सर्वात उंच पुतळा कुठे आहे हे सांगायची गरज नाही. पुतळ्याची उंची ठिक आहे, पण कामाची उंची कधी गाठणार असा सवाल त्यांनी मोंदीना त्यांचे नाव न घेता केला. सरदार पटेल दूरदृष्टीचे होते. त्यांनी त्या काळात आरएसएसवर बंदी आणली होती. त्या व्यक्तीला स्वातंत्र्य प्रेम म्हणजे काय, देशप्रेम काय हे पक्क कळत होतं. १७ सप्टेबर रोजीच त्यांनी मराठवाडा स्वतंत्र केला. याच दिवशी जिनांचं निधन झालं होतं. तरी देखील पटेलांनी त्या दिवशी कारवाई केली. जशी मराठवाड्यात कारवाई झाली तशी मणिपुरात कारवाई करण्याची हिमंत यांची होत नाही.हे कसले आले पोलादी पुरुष, हे तर तकलादू पुरुष आहेत, अशी टिका ठाकरे यांनी केली.

निष्ठेच्या परीक्षेत शिवसैनिक पास!

पटेल यांचा पुतळा अनावारणावरुन जो काही प्रकार घडला, त्याला जळगावातील शिवसैनिक पोलादी मनाचे, पोलादी ताकदीचे आहेत. ते निष्ठेचे परिक्षेत पास झालेत अशा शब्दात ठाकरे यांनी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील व स्थानिक शिवसैनिकांचे कौतूक केले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे