शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

सुरक्षेचे किट उपलब्ध असताना वापर न झाल्याने गेला तिघांचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:14 IST

ऑन द स्पाॅट रिपोर्ट सुनील पाटील जळगाव : समृद्धी केमिकल्स या रासायनिक खतनिर्मिती करणाऱ्या कंपनीत मळ पंप, हेल्मेट, सुरक्षा ...

ऑन द स्पाॅट रिपोर्ट

सुनील पाटील

जळगाव : समृद्धी केमिकल्स या रासायनिक खतनिर्मिती करणाऱ्या कंपनीत मळ पंप, हेल्मेट, सुरक्षा किट व मास्क आदी सुरक्षेविषयी साहित्य उपलब्ध होते, मात्र तरी देखील कामगारांना ते पुरविण्यात आले नाहीत. ही सामग्री पुरविली असती तर कदाचित तिघांचा जीव वाचला असता. दरम्यान,मयूर विजय सोनार व त्याचे मेहुणे दिलीप अर्जुन सोनार या दोघांचा कंपनीने दहा लाख रुपयांचा विमा काढलेला आहे. ती भरपाई मिळवून देण्याची जबाबदारी कंपनीने घेतली आहे तर दुसरे मयत कंत्राटदार रवींद्र कोळी यांनाही कंपनीमार्फत मदत दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सांडपाणी व वेस्टेज केमिकल्स साठविण्याची टाकी स्वच्छ करीत असताना त्यात बुडून रवींद्र उर्फ गोटू झगडू कोळी (३२,रा. चिंचोली, ता.यावल), मयूर विजय सोनार (३५, रा. कांचन नगर) व दिलीप अर्जुन सोनार (५४, रा. कांचन नगर, मूळ रा.पाल, ता.रावेर) या तिघांचा एका पाठोपाठ मृत्यू झाल्याची घटना एमआयडीसीतील समृद्धी केमिकल्स या कंपनीत शनिवारी दुपारी साडेबारा वाजता घडली होती.

दरम्यान, या घटनेप्रकरणी कंपनी मालक सुबोध सुधाकर चौधरी, हिरा सुबोध चौधरी, अपर्णा सुयोग चौधरी, सुनील सुधाकर चौधरी व सुयोग सुधाकर चौधरी या पाच जणांविरुद्ध सदोष मनुष्यवध कलम ३०४ अन्वये एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील हे सरकार कडून फिर्यादी झालेले आहेत. दरम्यान सुबोध, सुनील व सुधाकर या तिघे भावंडांना रविवारी सायंकाळी अटक करण्यात आलेली आहे.

तीस वर्षांपासून सुरू आहे कंपनी

जुन्या एमआयडीसीतील समृद्धी केमिकल्स ही कंपनी तीस वर्षांपासून सुरू आहे. शेतीसाठी लागणारे रासायनिक खत निर्मिती या कंपनीतून केली जाते. महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेर खतपुरवठा या कंपनीतून केला जातो. रासायनिक खतांची निर्मिती होत असल्याने तेथे रसायनाचा वापर येतोच, त्यामुळे कंपनीसाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक परवानगी घेण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती कंपनी मालकांचे नातेवाईक अमोल चौधरी व सौंदर्या चौधरी यांनी 'लोकमत' जवळ दिली. कामगारांना आवश्यक त्या सुविधा व सुरक्षेविषयी साहित्यदेखील उपलब्ध करून देण्यात आले नाही. कामगारांनी या साहित्याचा वापर केला नाही की मालकांनी त्यांना साहित्य दिले नाही हा चौकशीचा भाग असला तरी कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच तिघांचा मृत्यू झालेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. औद्योगिक सुरक्षा विभागाकडून देखील कंपनीची तपासणी झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मळ पंपाद्वारे टाकी स्वच्छ करणे अपेक्षित

ज्या टाकीत पडून तिघांचा मृत्यू झाला त्या टाकीला लागून मळ पंप आहे. तर त्याला लागून आणखी एक दुसरी लोखंडी टाकी तेथे आहे. मळ पंप जमिनीतील टाकीत टाकून त्याद्वारे दुसऱ्या टाकीत ही घाण काढणे अपेक्षित आहे. टाकीत उतरण्याची आवश्यकताच नसते, असे असतानाही मालकांनी कामगारांना टाकीत उतरवून ती साफ करण्याचे सांगितले होते, असे देखील समोर आलेले आहे.

शालक व मेव्हुण्याची काही मिनिटांच्या फरकाने अंत्ययात्रा

शनिवारी रात्री साडेनऊ वाजता मयूर सोनार यांची कांचन नगरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर थोड्याच वेळाने मेहुणे दिलीप सोनार यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. काही मिनिटांच्या फरकाने शालक व मेहुणे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा प्रसंग पाहून संपूर्ण कांचन नगरात हळहळ व्यक्त केली जात होती. रवींद्र कोळी यांचा मृतदेह मूळ गावी नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मुलगा व जावई यांचा एकाच वेळी असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मयूरच्या आईने प्रचंड आक्रोश केला होता.

मदतीसाठी घेतली बैठक

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मृत झालेल्या कामगार व कंत्राटदाराला कंपनीकडून अर्थसहाय्य मिळावे यासाठी मृताचे नातेवाईक व कंपनी मालक यांच्यात बैठक झाली. त्यात मयूर व दिलीप सोनार या दोघांचा कंपनीने दहा लाख रुपयांचा विमा काढलेला आहे. ही रक्कम मिळवून देण्याची जबाबदारी कंपनीने घेतली तर कंत्राटदारांना काही रक्कम कंपनीकडून दिली जाणार आहे.

कंपनीत फक्त एक व्यक्ती हजर

लोकमत प्रतिनिधीने रविवारी दुपारी कंपनीत जाऊन पाहणी केली असता तेथे प्रवेशद्वाराजवळ फक्त एक व्यक्ती बसलेला होता सुरक्षारक्षकांच्या कॅबिनमध्ये कुणीही नव्हते. कंपनीचे उत्पादन थांबविण्यात आले होते. पत्रकार आल्याची माहिती मिळाल्यानंतर सुमोल चौधरी व सौंदर्या चौधरी हे कंपनीत दाखल झाले. कंपनीतील इतर विभाग बंद होते. इथे बाहेरील व्यक्तीस येण्यास पोलिसांनी मनाई केली आहे असे सांगण्यात आले. कंपनी सिल केल्याची चर्चा होती, मात्र तसा प्रकार नव्हता.