शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

सुरक्षेचे किट उपलब्ध असताना वापर न झाल्याने गेला तिघांचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:14 IST

ऑन द स्पाॅट रिपोर्ट सुनील पाटील जळगाव : समृद्धी केमिकल्स या रासायनिक खतनिर्मिती करणाऱ्या कंपनीत मळ पंप, हेल्मेट, सुरक्षा ...

ऑन द स्पाॅट रिपोर्ट

सुनील पाटील

जळगाव : समृद्धी केमिकल्स या रासायनिक खतनिर्मिती करणाऱ्या कंपनीत मळ पंप, हेल्मेट, सुरक्षा किट व मास्क आदी सुरक्षेविषयी साहित्य उपलब्ध होते, मात्र तरी देखील कामगारांना ते पुरविण्यात आले नाहीत. ही सामग्री पुरविली असती तर कदाचित तिघांचा जीव वाचला असता. दरम्यान,मयूर विजय सोनार व त्याचे मेहुणे दिलीप अर्जुन सोनार या दोघांचा कंपनीने दहा लाख रुपयांचा विमा काढलेला आहे. ती भरपाई मिळवून देण्याची जबाबदारी कंपनीने घेतली आहे तर दुसरे मयत कंत्राटदार रवींद्र कोळी यांनाही कंपनीमार्फत मदत दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सांडपाणी व वेस्टेज केमिकल्स साठविण्याची टाकी स्वच्छ करीत असताना त्यात बुडून रवींद्र उर्फ गोटू झगडू कोळी (३२,रा. चिंचोली, ता.यावल), मयूर विजय सोनार (३५, रा. कांचन नगर) व दिलीप अर्जुन सोनार (५४, रा. कांचन नगर, मूळ रा.पाल, ता.रावेर) या तिघांचा एका पाठोपाठ मृत्यू झाल्याची घटना एमआयडीसीतील समृद्धी केमिकल्स या कंपनीत शनिवारी दुपारी साडेबारा वाजता घडली होती.

दरम्यान, या घटनेप्रकरणी कंपनी मालक सुबोध सुधाकर चौधरी, हिरा सुबोध चौधरी, अपर्णा सुयोग चौधरी, सुनील सुधाकर चौधरी व सुयोग सुधाकर चौधरी या पाच जणांविरुद्ध सदोष मनुष्यवध कलम ३०४ अन्वये एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील हे सरकार कडून फिर्यादी झालेले आहेत. दरम्यान सुबोध, सुनील व सुधाकर या तिघे भावंडांना रविवारी सायंकाळी अटक करण्यात आलेली आहे.

तीस वर्षांपासून सुरू आहे कंपनी

जुन्या एमआयडीसीतील समृद्धी केमिकल्स ही कंपनी तीस वर्षांपासून सुरू आहे. शेतीसाठी लागणारे रासायनिक खत निर्मिती या कंपनीतून केली जाते. महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेर खतपुरवठा या कंपनीतून केला जातो. रासायनिक खतांची निर्मिती होत असल्याने तेथे रसायनाचा वापर येतोच, त्यामुळे कंपनीसाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक परवानगी घेण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती कंपनी मालकांचे नातेवाईक अमोल चौधरी व सौंदर्या चौधरी यांनी 'लोकमत' जवळ दिली. कामगारांना आवश्यक त्या सुविधा व सुरक्षेविषयी साहित्यदेखील उपलब्ध करून देण्यात आले नाही. कामगारांनी या साहित्याचा वापर केला नाही की मालकांनी त्यांना साहित्य दिले नाही हा चौकशीचा भाग असला तरी कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच तिघांचा मृत्यू झालेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. औद्योगिक सुरक्षा विभागाकडून देखील कंपनीची तपासणी झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मळ पंपाद्वारे टाकी स्वच्छ करणे अपेक्षित

ज्या टाकीत पडून तिघांचा मृत्यू झाला त्या टाकीला लागून मळ पंप आहे. तर त्याला लागून आणखी एक दुसरी लोखंडी टाकी तेथे आहे. मळ पंप जमिनीतील टाकीत टाकून त्याद्वारे दुसऱ्या टाकीत ही घाण काढणे अपेक्षित आहे. टाकीत उतरण्याची आवश्यकताच नसते, असे असतानाही मालकांनी कामगारांना टाकीत उतरवून ती साफ करण्याचे सांगितले होते, असे देखील समोर आलेले आहे.

शालक व मेव्हुण्याची काही मिनिटांच्या फरकाने अंत्ययात्रा

शनिवारी रात्री साडेनऊ वाजता मयूर सोनार यांची कांचन नगरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर थोड्याच वेळाने मेहुणे दिलीप सोनार यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. काही मिनिटांच्या फरकाने शालक व मेहुणे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा प्रसंग पाहून संपूर्ण कांचन नगरात हळहळ व्यक्त केली जात होती. रवींद्र कोळी यांचा मृतदेह मूळ गावी नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मुलगा व जावई यांचा एकाच वेळी असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मयूरच्या आईने प्रचंड आक्रोश केला होता.

मदतीसाठी घेतली बैठक

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मृत झालेल्या कामगार व कंत्राटदाराला कंपनीकडून अर्थसहाय्य मिळावे यासाठी मृताचे नातेवाईक व कंपनी मालक यांच्यात बैठक झाली. त्यात मयूर व दिलीप सोनार या दोघांचा कंपनीने दहा लाख रुपयांचा विमा काढलेला आहे. ही रक्कम मिळवून देण्याची जबाबदारी कंपनीने घेतली तर कंत्राटदारांना काही रक्कम कंपनीकडून दिली जाणार आहे.

कंपनीत फक्त एक व्यक्ती हजर

लोकमत प्रतिनिधीने रविवारी दुपारी कंपनीत जाऊन पाहणी केली असता तेथे प्रवेशद्वाराजवळ फक्त एक व्यक्ती बसलेला होता सुरक्षारक्षकांच्या कॅबिनमध्ये कुणीही नव्हते. कंपनीचे उत्पादन थांबविण्यात आले होते. पत्रकार आल्याची माहिती मिळाल्यानंतर सुमोल चौधरी व सौंदर्या चौधरी हे कंपनीत दाखल झाले. कंपनीतील इतर विभाग बंद होते. इथे बाहेरील व्यक्तीस येण्यास पोलिसांनी मनाई केली आहे असे सांगण्यात आले. कंपनी सिल केल्याची चर्चा होती, मात्र तसा प्रकार नव्हता.