शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील तीनही सर्कल ठरताहेत अपघाताचे नवे ‘स्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 10:11 IST

Accidents : जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण हे जळगावकरांसाठी चांगलेच अडचणीचे ठरत आहे.

जळगाव : अजिंठा चौफुली आणि इच्छादेवी चौक या चौकांमध्ये याआधीच गंभीर अपघात झाले आहेत. त्यापाठोपाठ आता मंगळवारी आकाशवाणी चौकात अपघात झाला आहे. त्यामुळे हे तीनही सर्कल अपघाताचे नवे स्पॉट ठरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजिंठा चौफुलीला सर्कल बांधले गेल्यावर तेथे अपघात झाला होता. त्यानंतर इच्छादेवी चौकाच्या कामादरम्यानच तेथे अपघात झाला. या सर्व चौकांच्या बाजूने पुरेसा रुंद वळण रस्ता बांधला न गेल्याने हे अपघात होत असल्याचे बोलले जात आहे.

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण हे जळगावकरांसाठी चांगलेच अडचणीचे ठरत आहे. पाळधी ते तरसोद हे सलग एकाच टप्प्यात केले जाऊ शकणारे काम वेगवेगळ्या कारणास्तव दोन टप्प्यांत करण्यात येत आहे. यातील दुसऱ्या टप्प्याला फक्त तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. पहिला टप्पा पूर्ण होत नाही तोच त्यातील अनेक चुका समोर येऊ लागल्या आहेत. यात आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक आणि अजिंठा चौक येथे तयार करण्यात आलेले रोटरी सर्कल हे जळगावकरांसाठी मोठी डोकेदुखी ठरले आहेत. इच्छादेवी चौकात तयार झालेले सर्कल हे १० मीटर व्यासाचे आहेत आणि त्याच्या बाजूने रस्त्याची रुंदी त्याच्या दीडपट हवी असते. तेवढी पुरेशी रुंदी आणि समांतर रस्ते नसल्याने हे सर्कल अडचणीचे ठरले आहेत. आकाशवाणी चौकातही सर्कल हे तर प्रभात चौकातून येणाऱ्या पुलाच्या उतारापासून ५० मीटर अंतरावरच आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात होऊ शकतात, अशी शक्यता वर्तविली जात होती. याआधीही या चौकात किरकोळ अपघात झालेले आहेत.

काय आहेत चौकात समस्या

या चौकात समांतर रस्त्यावर तापी पाटबंधारे महामंडळाची सात मीटरवर लांब भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे हा रस्ता तेवढा अरुंद होतो आणि चौकात वळण घेण्यास कमी जागा मिळते. त्यामुळे या ठिकाणी लहान-मोठे अपघात होतच असतात, तसेच या चौकाच्या आधी असलेल्या प्रभात चौकात अंडरपासवरील पूल नेमका आकाशवाणी चौकाच्या ५० मीटर आधीच संपतो. त्यामुळे उतार असल्याने वाहनांना वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. चौकात तीन बाजूंनी वाहने लावून ठेवलेली असतात, तसेच प्रवासी वाहतूक करणारेदेखील वाहने रस्त्यावर उभी करतात. त्यामुळे चौक अरुंद होतो. याबाबत काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकात वाहने उभी राहू न देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, तरीदेखील चौकात प्रवासी वाहने उभी राहतात.

टॅग्स :Accidentअपघात