जळगाव : जिल्हा परिषदेतील अनागोंदी कारभाराची माहिती घेण्यात येईल व सर्व विभागाची 'सर्जरी' करून पारदर्शक काम करण्यात येईल. प्रशासन व जनता यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी सोशल साईटस्चा वापर करण्यात येईल. जेणे करुन जनतेच्या तक्रारींचा तत्काळ निपटारा होऊन त्यांना न्याय मिळेल. शिक्षण आणि आरोग्य या दोन विषयांवर आपले विशेष लक्ष असेल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.लोकाभिमुख कामे करणारबुधवारी दुपारी तीन वाजता पांडेय यांनी डी. एम. मुगळीकर यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की संविधानात काम करण्याची एक पद्धत आहे. त्यानुसार पडद्याआड राहून काम करण्याला प्राधान्य राहणार आहे. जिल्हा परिषदेतील सर्व विभागात समन्वय घडवून आणून लोकाभिमुख कामे केले जातील. दरम्यान, पदभार स्वीकारल्यानंतर सीईओ पांडेय यांनी सर्व विभाग प्रमुखांची ओळख करून घेतली. यानंतर संपूर्ण नवीन इमारतीची पाहणी त्यांनी केली. गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्याकडे लक्ष शिक्षणाच्या बाबतीत जळगाव जिल्हा नकाशावर झळकण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्याच्या तक्रारी सोडविण्याकडे विशेष लक्ष देणार असल्याचे पांडेय यांनी सांगितले. जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाला याबाबत सूचना देऊन गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविण्याचेदेखील नियोजन असल्याचे ते म्हणाले. जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांचे स्वागत करताना डी.एम.मुगळीकर. 'ई-धोरण' प्रणाली जिल्हा परिषदेत अनेक नागरिक त्यांची गार्हाणी घेऊन दररोज येतात. मात्र, कामाचा ताण अधिकार्यांवर अधिक असल्यामुळे नागरिकांच्या समस्यांचे निरसन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे शासनाची 'ई प्रशासन' व 'ई-धोरण' ही प्रणाली जिल्हा परिषदेत राबविण्यात येणार आहे. नागरिक व प्रशासन यांच्यात समन्वय राहण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईटसचा वापर केला जाईल.
सर्व विभागाची 'सर्जरी' करणार
By admin | Updated: January 15, 2015 15:05 IST