शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

डेल्टा प्लसने संक्रमित सातही रुग्ण ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्यभरात डेल्टा प्लसने संक्रमित २१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील सात जण हे जळगाव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्यभरात डेल्टा प्लसने संक्रमित २१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील सात जण हे जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. या सातही जणांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आलेली नव्हती. तसेच त्यांना कोणत्याही विशेष उपचारांची गरज भासली नाही. हे सर्व रुग्ण एकाच ग्रामीण क्षेत्रातील आहेत, या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा अजून सविस्तर अभ्यास सुरू असल्याने त्याच्या घातकतेवर आताच काही सांगता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले की,‘डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे राज्यात रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील सात जळगाव जिल्ह्यातील आहेत. या सविस्तर तपासणीसाठी १०० नमुने जिल्ह्यातून मे महिन्यात पाठवण्यात आले होते. त्यातील हे सात जण आहेत. तसेच ज्या भागातून हे रुग्ण आढळून आले आहेत. त्याच भागातील पॉझिटिव्हिटी दरदेखील १.२१ एवढाच सामान्य आहे. या सर्वांच्या जवळच्या हाय रिस्क आणि लो रिस्क कॉन्टॅक्टदेखील तपासण्यात आले आहेत. हा एक वेगळा व्हेरिएंट असला तरी हे सातही जण ठणठणीत आहेत. तसेच त्यांना कोणत्याही विशेष औषधोपचाराची गरज भासलेली नाही. असे असले तरी आता या भागातील चाचण्यांची संख्या आणखी वाढवणार आहे. तसेच सविस्तर तपासणी आणि अभ्यासासाठी आणखी जास्त नमुने पाठवणार आहोत.’

‘त्या’ सातही जणांनी लस घेतलेली नव्हती

राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील जे सात जण कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने संक्रमित झाले आहेत. त्या सातही जणांनी ही कोरोनाची लस घेतलेली नव्हती, अशी माहितीदेखील जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यावेळी दिली.

या भागातील परिस्थितीही सामान्यच

डेल्टा प्लस व्हेरिएंटने जे सात जण संक्रमित झाल्याचे आढळून आले आहेत. ते सातही जण एकाच क्लस्टरमधील आहे. मात्र या भागात कोरोनाची परिस्थिती जिल्ह्याच्या इतर भागांप्रमाणे सामान्यच आहे. या भागाचा पॉझिटिव्हिटी रेट हा १.२१ टक्के एवढाच आहे. तसेच येथे रुग्णसंख्यादेखील जिल्ह्यातील इतर भागांप्रमाणेच आहे, असेही राऊत यांनी सांगितले.

नियम पाळण्याचे आवाहन

कोरोनाचा कोणताही व्हेरिएंट असला तरी हा आजाराच घातक आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या बचावासाठी मास्क वापरणे, पुरेसे अंतर राखणे, सॅनिटाईज करणे हे तीन नियम पाळणे गरजेचे असल्याचेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.