शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

पुन्हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला, लॉकडाऊनमुळे लग्न सोहळे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:16 IST

कोरोनाचा परिणाम : मंगल कार्यालयचालकांना फटका, आर्थिक गणित बिघडले लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कोरोना संसर्गाच्या ...

कोरोनाचा परिणाम : मंगल कार्यालयचालकांना फटका, आर्थिक गणित बिघडले

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. लग्न सोहळे व धार्मिक सोहळे साजरे करण्यावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. विशेषतः मे महिन्यातील अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक जण लग्न सोहळे करत असतात; मात्र गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही लॉकडाऊनमुळे नागरिकांचा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला आहे. कोरोनामुळे लग्न सोहळे रद्द होत असल्याने, याचा परिणाम शहरातील मंगल कार्यालय व्यावसायिकांवरही झाला आहे. उत्पन्नाचा स्रोत बंद असल्यामुळे आर्थिक गणित कोलमडले आहे.

दरवर्षी सर्वाधिक लग्न सोहळे हे मे महिन्यात, विशेषतः अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लागत असतात. त्यानुसार यंदाही मे महिन्यात विविध तारखांना लग्न सोहळ्याचे मुहूर्त होते. त्यानुसार अनेकांनी तयारीही केली होती; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात पूर्णतः लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांच्या विवाह सोहळ्यांवर विरजण पडले आहे. परिणामी, नागरिकांनी धूम-धडाक्यात लग्न न लावता साध्या पद्धतीने लग्न लावताना दिसून येत आहेत.

नियमांचा अडसर

शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांना साध्या पद्धतीने फक्त २५ जणांच्या उपस्थितीत लग्न सोहळे करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच यासाठी संबंधित तालुका अथवा जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. विना परवानगी लग्न सोहळे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच गेल्या आठवड्यात २५ पेक्षा जास्त लोकांना आमंत्रित केल्याबद्दल अनेक ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आल्यामुळे नागरिक स्वतःहून लग्न सोहळे रद्द करत आहेत.

मे महिन्यातील मुहूर्त

यंदा मे महिन्यात २०, २१, २२, २४, २६, २८, ३० व ३१ मे हे मुहूर्त आहेत. या सर्व मुहूर्तांवर लग्न सोहळे करता येणार आहेत; मात्र कोरोनामुळे अनेक निर्बंध आल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मंगल कार्यालयांचे गणित बिघडले

- जळगाव शहरात लहान व मोठी मिळून जवळपास ३५ ते ४० मंगल कार्यालये आहेत.

- मे महिन्यात ही सर्व मंगल कार्यालये बुकिंग झालेली असतात; परंतु यंदाही गेल्या वर्षाप्रमाणे कोरोनाची दुसरी लाट आल्याने या कार्यालयांचे बुकिंग झालेले नाही.

- कोरोनामुळे मंगल कार्यालयात लग्न सराई होत नसल्याने ऐन लग्न सराईत लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे.

- एकीकडे उत्पन्न बंद असताना, दुसरीकडे कार्यालयाची सफाई, सुरक्षा व लाईट बिलावर दर महिन्याला ठराविक खर्च येत असल्याने, हा खर्च मंगल कार्यालयचालकांना घरून करावा लागत आहे. त्यामुळे मंगल कार्यालयचालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

यंदा कर्तव्य नाही..

कोरोनामुळे यंदाही शासनाने २५ लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा मुलाचे लग्न धूमधडाक्यात करणार होतो; मात्र नियमांचे पालन करून मुलाचे लग्न करणार आहे.

- डोंगर पाटील, वर पिता.

-----------------

गेल्या वर्षी कोरोनामुळे मुलीचे लग्न केले नाही; मात्र यंदाही तीच परिस्थिती असल्याने साध्या पद्धतीनेच लग्न करावे लागणार आहे. कोरोनामुळे लग्नातील आनंद काहीसा कमी होणार आहे.

- संजय सोनजे, वधू पिता.