शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

जळगाव जिल्ह्यातील खतांचा मुद्दा विधानसेभत, चौकशीचे कृषीमंत्र्यांचे आदेश

By सुनील पाटील | Updated: July 17, 2023 16:29 IST

समिती गठित करणार.

जळगाव : तालुक्यातील वडली येथे रासायनिक खताच्या वापरामुळे कापूस पिकावर दुष्परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा मुद्दा सोमवारी विधानसभेत उपस्थित झाला. जळगाव जिल्ह्यात वापरात आलेले खत तसेच बियाणे यांचा दर्जा तपासण्यात येणार असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. यासाठी समिती गठीत करण्यात येणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्यासंदर्भात कायदा करण्यात येणार असल्याचेही मुंडे यांनी जाहिर केले.

कापूस पिकात रासायनिक खत टाकल्यानंतर त्याचा पिकावर दुष्परिणाम दिसून आल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त होत असल्याचा मुद्दा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळ बैठकीसह सभागृहात मांडला. जळगाव जिल्ह्यातील जामनेर, बोदवड व जळगाव तालुक्यात वडली येथे कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. बियाणे व खते बनावट असल्याचे समोर येत आहे.

यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुंडे यांनी सांगितले. बनावट खते व बियाण्यांमुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे मंत्री महाजन व पाटील यांनी सांगितले. बियाण्यांच्या संदर्भात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात कायदा केला जाणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले.