शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जळगाव जिल्ह्यातील खतांचा मुद्दा विधानसेभत, चौकशीचे कृषीमंत्र्यांचे आदेश

By सुनील पाटील | Updated: July 17, 2023 16:29 IST

समिती गठित करणार.

जळगाव : तालुक्यातील वडली येथे रासायनिक खताच्या वापरामुळे कापूस पिकावर दुष्परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा मुद्दा सोमवारी विधानसभेत उपस्थित झाला. जळगाव जिल्ह्यात वापरात आलेले खत तसेच बियाणे यांचा दर्जा तपासण्यात येणार असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. यासाठी समिती गठीत करण्यात येणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्यासंदर्भात कायदा करण्यात येणार असल्याचेही मुंडे यांनी जाहिर केले.

कापूस पिकात रासायनिक खत टाकल्यानंतर त्याचा पिकावर दुष्परिणाम दिसून आल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त होत असल्याचा मुद्दा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळ बैठकीसह सभागृहात मांडला. जळगाव जिल्ह्यातील जामनेर, बोदवड व जळगाव तालुक्यात वडली येथे कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. बियाणे व खते बनावट असल्याचे समोर येत आहे.

यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुंडे यांनी सांगितले. बनावट खते व बियाण्यांमुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे मंत्री महाजन व पाटील यांनी सांगितले. बियाण्यांच्या संदर्भात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात कायदा केला जाणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले.