शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

जळगाव जिल्ह्यात तब्बल सहा वर्षांनंतर पावसाची सरासरी १२० टक्के पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 11:57 IST

२०१३ मध्ये झाला होता १२६ टक्के पाऊस : २००६ मध्ये १३६ टक्के पावसाचा विक्रम

अजय पाटील जळगाव : राज्यासह जिल्ह्यात यंदा पावसाने उच्चांक गाठला आहे. तब्बल सहा वर्षांनंतर जिल्ह्यात सरासरी पावसाने १२० टक्के पार केले आहेत. सहा वर्षांपुर्वीच म्हणजेच २०१३ मध्ये जिल्ह्यात १२६ टक्के पाऊस झाला होता. ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १२२ टक्के पाऊस झाला असून, अजून परतीचा प्रवास शिल्लक असल्याने या सरासरीत वाढ होण्याची शक्यता आहे.कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १२२ टक्के पावसाची सरासरी गाठली आहे. जबरदस्त पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रकल्पांसह लहान व मध्यम प्रकल्पामध्ये देखील जलसाठा फुल्ल झाल्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील पाण्याची समस्या मिटली आहे. २०१३ पासून जिल्ह्यात पावसाने शंभरी देखील गाठली नव्हती. २०१५, २०१७ व २०१८ मध्ये जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण झाली होती. तसेच शेकडो गावांमध्ये टॅँकरव्दारे पाणी पुरवठा करावा लागला होता.सर्वच तालुक्यांमध्ये आबादानी२०१३ मध्ये जिल्ह्यात १२६ टक्के पावसाची नोंद झाली असली तरी तेव्हाही अमळनेर, जामनेर, धरणगाव या तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाला होता.त्यानंतर सहा वर्ष या तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती पहायला मिळाली. यंदा मात्र, जिल्ह्यातील सर्वच पंधरा तालुक्यांमध्ये सरासरीने शंभरी गाठली आहे. नद्या-नाल्यांना पुर आल्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र आबादानी असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.विक्रमी पावसाची नोंद होण्याची शक्यता३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १२२ टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात परतीचा पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार २० आॅक्टोबरपर्यंत मान्सून सक्रीय राहणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात पावसाने हजेरी लावल्यास पावसाच्या सरासरीत वाढ होण्याची शक्यता आहे. २०१३ च्या सरासरीचा विक्रम आगामी काही दिवसातच मोडण्याची शक्यता आहे. दरम्यान, २००६ मध्ये जिल्ह्यात सर्वाधिक १३६ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे परतीचा पाऊसही जोरदार झाला. तर तब्बल १३ वर्षांपुर्वीचा पावसाचा विक्रम यंदा मोडला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही तज्ज्ञांच्या मते जिल्ह्यात सहा ते सात वर्षाच्या फरकातच अशाप्रकारचा पाऊस होत असल्याचे सांगण्यात आले.दोन दिवस पावसाचा अंदाजसध्या, गुजरातवरील डिप्रेशन ईशान्य दिशेने वाटचाल करीत आहे आणि त्यामुळे येत्या २४ तासांत जळगाव आणि नाशिक यासारख्या ठिकाणी आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर, पाऊस कमी होईल आणि त्यानंतरच्या चार ते पाच दिवसांपर्यंत पावसाचा जोरदार फारच कमी राहण्याची शक्यता स्कायमेट या खासगी संकेतस्थळाकडून वर्तविण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव