शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात तब्बल सहा वर्षांनंतर पावसाची सरासरी १२० टक्के पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 11:57 IST

२०१३ मध्ये झाला होता १२६ टक्के पाऊस : २००६ मध्ये १३६ टक्के पावसाचा विक्रम

अजय पाटील जळगाव : राज्यासह जिल्ह्यात यंदा पावसाने उच्चांक गाठला आहे. तब्बल सहा वर्षांनंतर जिल्ह्यात सरासरी पावसाने १२० टक्के पार केले आहेत. सहा वर्षांपुर्वीच म्हणजेच २०१३ मध्ये जिल्ह्यात १२६ टक्के पाऊस झाला होता. ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १२२ टक्के पाऊस झाला असून, अजून परतीचा प्रवास शिल्लक असल्याने या सरासरीत वाढ होण्याची शक्यता आहे.कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १२२ टक्के पावसाची सरासरी गाठली आहे. जबरदस्त पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रकल्पांसह लहान व मध्यम प्रकल्पामध्ये देखील जलसाठा फुल्ल झाल्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील पाण्याची समस्या मिटली आहे. २०१३ पासून जिल्ह्यात पावसाने शंभरी देखील गाठली नव्हती. २०१५, २०१७ व २०१८ मध्ये जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण झाली होती. तसेच शेकडो गावांमध्ये टॅँकरव्दारे पाणी पुरवठा करावा लागला होता.सर्वच तालुक्यांमध्ये आबादानी२०१३ मध्ये जिल्ह्यात १२६ टक्के पावसाची नोंद झाली असली तरी तेव्हाही अमळनेर, जामनेर, धरणगाव या तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाला होता.त्यानंतर सहा वर्ष या तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती पहायला मिळाली. यंदा मात्र, जिल्ह्यातील सर्वच पंधरा तालुक्यांमध्ये सरासरीने शंभरी गाठली आहे. नद्या-नाल्यांना पुर आल्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र आबादानी असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.विक्रमी पावसाची नोंद होण्याची शक्यता३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १२२ टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात परतीचा पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार २० आॅक्टोबरपर्यंत मान्सून सक्रीय राहणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात पावसाने हजेरी लावल्यास पावसाच्या सरासरीत वाढ होण्याची शक्यता आहे. २०१३ च्या सरासरीचा विक्रम आगामी काही दिवसातच मोडण्याची शक्यता आहे. दरम्यान, २००६ मध्ये जिल्ह्यात सर्वाधिक १३६ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे परतीचा पाऊसही जोरदार झाला. तर तब्बल १३ वर्षांपुर्वीचा पावसाचा विक्रम यंदा मोडला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही तज्ज्ञांच्या मते जिल्ह्यात सहा ते सात वर्षाच्या फरकातच अशाप्रकारचा पाऊस होत असल्याचे सांगण्यात आले.दोन दिवस पावसाचा अंदाजसध्या, गुजरातवरील डिप्रेशन ईशान्य दिशेने वाटचाल करीत आहे आणि त्यामुळे येत्या २४ तासांत जळगाव आणि नाशिक यासारख्या ठिकाणी आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर, पाऊस कमी होईल आणि त्यानंतरच्या चार ते पाच दिवसांपर्यंत पावसाचा जोरदार फारच कमी राहण्याची शक्यता स्कायमेट या खासगी संकेतस्थळाकडून वर्तविण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव