शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

जळगाव जिल्ह्यात तब्बल सहा वर्षांनंतर पावसाची सरासरी १२० टक्के पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 11:57 IST

२०१३ मध्ये झाला होता १२६ टक्के पाऊस : २००६ मध्ये १३६ टक्के पावसाचा विक्रम

अजय पाटील जळगाव : राज्यासह जिल्ह्यात यंदा पावसाने उच्चांक गाठला आहे. तब्बल सहा वर्षांनंतर जिल्ह्यात सरासरी पावसाने १२० टक्के पार केले आहेत. सहा वर्षांपुर्वीच म्हणजेच २०१३ मध्ये जिल्ह्यात १२६ टक्के पाऊस झाला होता. ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १२२ टक्के पाऊस झाला असून, अजून परतीचा प्रवास शिल्लक असल्याने या सरासरीत वाढ होण्याची शक्यता आहे.कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १२२ टक्के पावसाची सरासरी गाठली आहे. जबरदस्त पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रकल्पांसह लहान व मध्यम प्रकल्पामध्ये देखील जलसाठा फुल्ल झाल्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील पाण्याची समस्या मिटली आहे. २०१३ पासून जिल्ह्यात पावसाने शंभरी देखील गाठली नव्हती. २०१५, २०१७ व २०१८ मध्ये जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण झाली होती. तसेच शेकडो गावांमध्ये टॅँकरव्दारे पाणी पुरवठा करावा लागला होता.सर्वच तालुक्यांमध्ये आबादानी२०१३ मध्ये जिल्ह्यात १२६ टक्के पावसाची नोंद झाली असली तरी तेव्हाही अमळनेर, जामनेर, धरणगाव या तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाला होता.त्यानंतर सहा वर्ष या तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती पहायला मिळाली. यंदा मात्र, जिल्ह्यातील सर्वच पंधरा तालुक्यांमध्ये सरासरीने शंभरी गाठली आहे. नद्या-नाल्यांना पुर आल्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र आबादानी असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.विक्रमी पावसाची नोंद होण्याची शक्यता३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १२२ टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात परतीचा पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार २० आॅक्टोबरपर्यंत मान्सून सक्रीय राहणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात पावसाने हजेरी लावल्यास पावसाच्या सरासरीत वाढ होण्याची शक्यता आहे. २०१३ च्या सरासरीचा विक्रम आगामी काही दिवसातच मोडण्याची शक्यता आहे. दरम्यान, २००६ मध्ये जिल्ह्यात सर्वाधिक १३६ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे परतीचा पाऊसही जोरदार झाला. तर तब्बल १३ वर्षांपुर्वीचा पावसाचा विक्रम यंदा मोडला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही तज्ज्ञांच्या मते जिल्ह्यात सहा ते सात वर्षाच्या फरकातच अशाप्रकारचा पाऊस होत असल्याचे सांगण्यात आले.दोन दिवस पावसाचा अंदाजसध्या, गुजरातवरील डिप्रेशन ईशान्य दिशेने वाटचाल करीत आहे आणि त्यामुळे येत्या २४ तासांत जळगाव आणि नाशिक यासारख्या ठिकाणी आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर, पाऊस कमी होईल आणि त्यानंतरच्या चार ते पाच दिवसांपर्यंत पावसाचा जोरदार फारच कमी राहण्याची शक्यता स्कायमेट या खासगी संकेतस्थळाकडून वर्तविण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव