शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडविल्याची शंका
2
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
5
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
6
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
7
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
8
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
9
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
10
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
11
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
12
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
13
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
14
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
15
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
16
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
17
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
18
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
19
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
20
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...

जळगावात स्मशानभूमीतील लाकडे संपल्याने दोन तास अंत्यसंस्कार रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 13:01 IST

मरणानंतरही स्मशानात ‘यातना’

ठळक मुद्देनातेवाईकांचा संतापलाकडाची वाहतूक बंद केल्याने तुटवडा

जळगाव : जिवंतपणी असलेल्या यातनांचा शेवट हा मरणानेच होतो, असे म्हटले जाते मात्र मृत्यूनंतरही असुविधेच्या यातना अंत्यसंस्कार प्रसंगी भोगाव्या लागल्याची घटना येथे घडली. लाकडांअभावी दोन जणांचे अंत्यसंस्कार दोन तास रेंगाळले. हा प्रकार बुधवारी नेरीनाक्या जवळील स्मशानभुमीत घडला.या ठिकाणचा लाकडांचा साठा संपल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांना स्मशानभूमीत ताटकळत बसावे लागले. शेवटी नातलगांनी बाहेरुन लाकडे आणुन अंत्यसंस्कार केले. दरम्यान या प्रकारामुळे नागरिकांनी मनपा प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.काही वर्षापासून महापालिकेने अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे मोफत पुरविण्याची सेवा बंद केल्यानंतर नागरिक बाहेरुन लाकडे आणून अंत्यसंस्कार करत होते. बाहेरुन लाकडे आणतांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असे व वेळही वाया जात होता. याकरिता आमदार सुरेश भोळे यांनी काही दिवसांपासून नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील वखार मालकांना सांगून स्मशनभूमीत लाकडे उपलब्ध करुन दिली आहेत. यामुळे नागरिकांना अंत्यविधीसाठी बाहेरुन लाकडे आणण्याचा त्रास वाचला आहे.नागरिकांना लाकडे देण्यासाठी आमदार भोळे यांनी या ठिकाणी दोन व्यक्तींची नेमणुकही केली आहे. मात्र, बुधवारी स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लाकडे संपल्याने नागरिकांना बाहेरील वखारीतून लाकडे आणावी लागली. यात बराच वेळ गेल्याने अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांनाही मनस्ताप झाला.लाकडाची वाहतूक बंद केल्याने तुटवडानेरी नाका स्मशानभूमीत दर दोन ते तीन दिवसानंतर बाहेरुन लाकडांचा ट्रक येत असतो. तर कधी जळगावातील वखारीतून लाकडे येत असतात. बुधवारी स्मशानभूमीतील लाकडे संपल्यामुळे येथे काम करणाऱ्या राजू कोळी व मजीद जहागिरदार यांनी वनविभागाने बाहेरुन शहरात येणारी लाकडाची वाहतूक बंद केल्याने लाकडांचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे सांगितले. तसेच शहरातील वखार मालकानांही वनविभागाने स्मशानभूमीला लाकडे देण्याची परवानगी नाकारली असल्याने, अजुन एक आठवडा लाकडांची टंचाई भासणार असल्याचे सांगितले.दोन अंत्यसंस्कारांना झाला विलंबनेरी नाक्याजवळीलच रहिवासी शंकर कोळी यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी परिसरातील नागरिकांनी शंकर कोळी यांचे पार्थिव सकाळी १० वाजता नेरी नाका स्मशानभूमीत आणले होते. या ठिकाणी लाकडे उपलब्ध करुन देणाºयांनी अंत्यविधीसाठी लाकडे नसल्याचे सांगुन थोड्या वेळाने लाकडे येण्याची शक्यता असल्याचे सांगितले. मात्र, तासभर उलटुनही लाकडे न आल्याने नातेवाईकांनी कोळी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी वनविभागातर्फे लाकूड व्यापाºयांच्या गाड्या अडविण्यात येत असल्यामुळे लाकडे येणार नसल्याचे सांगितले. यामुळे नागरिकांनी शेजारीच असलेल्या वखारीतून लाकडे खरेदी करुन दुपारी १२ वाजता कोळी यांच्यावर अंत्यसंस्कार केले. तसेच दादावाडी येथील एका वयोवृद्ध महिलेचे सकाळी साडेअकरा वाजता पार्थिव आल्यावर त्यांनाही येथे लाकडे न मिळाल्याने बाहेरुन लाकडे आणून दुपारी दीड वाजता अंत्यसंस्कार करावे लागले.वनविभागाने बाहेरुन शहरात होणाºया लाकडांच्या वाहतूकीवर बंदी घातली आहे. यामुळे शहरातील सॉ मिलला लाकडांची आवक कमी होत आहे. यामुळे त्यांच्याकडेच लाकडे नसल्याने त्यांनी स्मशानभूमीला लाकडे दिले नसतील. या संदर्भात गुरुवारी मुंबईहुन जळगावला आल्यावर, वनविभागाचे अधिकारी व स्मशानभूमीला लाकडे पुरविणाºया व्यापाºयांशी चर्चा करुन, लाकडांचा प्रश्न सोडवतो.-सुरेश भोेळे, आमदार

टॅग्स :Jalgaonजळगाव