शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर वारसांना करावा लागतो तांत्रिक अडचणीचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:36 IST

रेल्वे कर्मचाºयांच्या वारसांना रेल्वेतर्फे प्रवासासाठी देण्यात येणाºया पास सवलतमध्येही अनंत अडचणींचा सामना करावा लागतो.

भुसावळ : शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणाºया जुन्या पेन्शनधारकांना सातव्या वेतन आयोगातून बहुतांश समस्या सुटलेल्या आहेत, मात्र पेन्शनधारकाच्या विधवा महिलेची किंवा अविवाहित मुलींना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. या त्रुटी दूर झाल्यास वृद्धापकाळात बँकेचे फेरे मारावे लागणार नाहीत.जुन्या सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाने २००५ पूर्वी असलेली जुनी पेन्शन लागू आहे व यानंतर पेन्शन योजनेत बदल करण्यात आले आहेत. मात्र जुन्या पेन्शनधारकांना अंशत: समस्यांचा सामना करावा लागत आहे. सेवानिवृत्तीनंतर पेन्शनधारक सदस्याच्या मृत्यूनंतर विधवा महिला किंवा अविवाहित मुलीला पेन्शन शासनाला देयक असते. यासाठी किचकट प्रक्रियेनंतर पेन्शन वारस महिला, मुलीच्या नावावर होते अर्थातच जे वारस असतात त्यांच्या नावावर पेन्शन करण्यासाठी अनेक प्रक्रियेतून जावे लागते. यामध्ये मात्र वयोवृद्ध महिला व अविवाहित किंवा मतिमंद मुलींना फार त्रास सहन करावा लागतो. यासाठी शासनाने साधे सरळ नियम करून पेन्शन संबंधित कर्मचाºयांच्या वारसांच्या नावावर करणे अपेक्षित आहे व तशी अपेक्षा करण्यात येत आहे. तसेच रेल्वे कर्मचाºयांच्या वारसांना रेल्वेतर्फे प्रवासासाठी देण्यात येणाºया पास सवलतमध्येही अनंत अडचणींचा सामना करावा लागतो.जुन्या शासकीय पेन्शनधारक कर्मचाºयाच्या मृत्यूनंतर त्यांच्या पेन्शन वारसांनी जन्मतारखेसह इतर शासकीय माहिती वेळोवेळी रेल्वेला अपडेट करावी. जेणेकरून वाढीव पेन्शनचा त्यांना लाभ घेता येईल.-पुंडलिक जावडे, अध्यक्ष, आॅल इंडिया सेवानिवृत्त रेल्वे पेन्शनर्स असोसिएशन, भुसावळजुन्या पेन्शन योजनेंतर्गत सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून ९० टक्के समस्यांचे निराकरण झाले आहे. मात्र पेन्शनधारकांच्या मृत्यूपश्चात वारसदारांना पीपीओ लवकर मिळावे, रेल्वे पासमध्ये किचकट प्रक्रिया न करता त्वरित उपलब्ध करून द्यावी.-एन.आर.सरोदे, खजिनदार, आॅल इंडिया सेवानिवृत्त रेल्वे पेन्शनधारक असोसिएशन, भुसावळअविवाहित कर्मचारी सेवेत असताना त्याच्या पश्चात त्यांची अविवाहित बहीण किंवा घटस्फोट झालेली बहीण असेल तर त्यांनाही पेन्शनमध्ये वारस म्हणून मान्यता मिळावी. ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक वेळा चर्चासुद्धा झालेले आहे. त्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी.-राजेंद्र झा, अध्यक्ष, आॅडनस फॅक्टरी कामगार युनियन, भुसावळजुने पेन्शनधारक ज्यांचे वय सत्तरपेक्षा अधिक आहे त्यांच्या बोटाचे ठसे नीट उमटत नाहीत. त्यामुळे जुन्या रेकॉर्डशी जुळत नाहीत. त्यांना पेन्शन नाकारले जाते किंवा अर्ज करून विलंब लागतो. काही असाध्य आजारांनी ग्रस्त आहेत त्यांनाही बँकेत येण्याची सक्ती केली जाते. पेंशन खाते दोघांच्या संयुक्त नावे नसते. त्यामुळे मृत्यनंतर वारसाला त्रास होतो. हयातीचा दाखला दिल्यावरही हयातीचा दाखला मागतात.-प्र.ह.दलाल, ज्येष्ठ नेते, शिक्षक संघटना, भुसावळ

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकBhusawalभुसावळ