शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर वारसांना करावा लागतो तांत्रिक अडचणीचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:36 IST

रेल्वे कर्मचाºयांच्या वारसांना रेल्वेतर्फे प्रवासासाठी देण्यात येणाºया पास सवलतमध्येही अनंत अडचणींचा सामना करावा लागतो.

भुसावळ : शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणाºया जुन्या पेन्शनधारकांना सातव्या वेतन आयोगातून बहुतांश समस्या सुटलेल्या आहेत, मात्र पेन्शनधारकाच्या विधवा महिलेची किंवा अविवाहित मुलींना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. या त्रुटी दूर झाल्यास वृद्धापकाळात बँकेचे फेरे मारावे लागणार नाहीत.जुन्या सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाने २००५ पूर्वी असलेली जुनी पेन्शन लागू आहे व यानंतर पेन्शन योजनेत बदल करण्यात आले आहेत. मात्र जुन्या पेन्शनधारकांना अंशत: समस्यांचा सामना करावा लागत आहे. सेवानिवृत्तीनंतर पेन्शनधारक सदस्याच्या मृत्यूनंतर विधवा महिला किंवा अविवाहित मुलीला पेन्शन शासनाला देयक असते. यासाठी किचकट प्रक्रियेनंतर पेन्शन वारस महिला, मुलीच्या नावावर होते अर्थातच जे वारस असतात त्यांच्या नावावर पेन्शन करण्यासाठी अनेक प्रक्रियेतून जावे लागते. यामध्ये मात्र वयोवृद्ध महिला व अविवाहित किंवा मतिमंद मुलींना फार त्रास सहन करावा लागतो. यासाठी शासनाने साधे सरळ नियम करून पेन्शन संबंधित कर्मचाºयांच्या वारसांच्या नावावर करणे अपेक्षित आहे व तशी अपेक्षा करण्यात येत आहे. तसेच रेल्वे कर्मचाºयांच्या वारसांना रेल्वेतर्फे प्रवासासाठी देण्यात येणाºया पास सवलतमध्येही अनंत अडचणींचा सामना करावा लागतो.जुन्या शासकीय पेन्शनधारक कर्मचाºयाच्या मृत्यूनंतर त्यांच्या पेन्शन वारसांनी जन्मतारखेसह इतर शासकीय माहिती वेळोवेळी रेल्वेला अपडेट करावी. जेणेकरून वाढीव पेन्शनचा त्यांना लाभ घेता येईल.-पुंडलिक जावडे, अध्यक्ष, आॅल इंडिया सेवानिवृत्त रेल्वे पेन्शनर्स असोसिएशन, भुसावळजुन्या पेन्शन योजनेंतर्गत सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून ९० टक्के समस्यांचे निराकरण झाले आहे. मात्र पेन्शनधारकांच्या मृत्यूपश्चात वारसदारांना पीपीओ लवकर मिळावे, रेल्वे पासमध्ये किचकट प्रक्रिया न करता त्वरित उपलब्ध करून द्यावी.-एन.आर.सरोदे, खजिनदार, आॅल इंडिया सेवानिवृत्त रेल्वे पेन्शनधारक असोसिएशन, भुसावळअविवाहित कर्मचारी सेवेत असताना त्याच्या पश्चात त्यांची अविवाहित बहीण किंवा घटस्फोट झालेली बहीण असेल तर त्यांनाही पेन्शनमध्ये वारस म्हणून मान्यता मिळावी. ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक वेळा चर्चासुद्धा झालेले आहे. त्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी.-राजेंद्र झा, अध्यक्ष, आॅडनस फॅक्टरी कामगार युनियन, भुसावळजुने पेन्शनधारक ज्यांचे वय सत्तरपेक्षा अधिक आहे त्यांच्या बोटाचे ठसे नीट उमटत नाहीत. त्यामुळे जुन्या रेकॉर्डशी जुळत नाहीत. त्यांना पेन्शन नाकारले जाते किंवा अर्ज करून विलंब लागतो. काही असाध्य आजारांनी ग्रस्त आहेत त्यांनाही बँकेत येण्याची सक्ती केली जाते. पेंशन खाते दोघांच्या संयुक्त नावे नसते. त्यामुळे मृत्यनंतर वारसाला त्रास होतो. हयातीचा दाखला दिल्यावरही हयातीचा दाखला मागतात.-प्र.ह.दलाल, ज्येष्ठ नेते, शिक्षक संघटना, भुसावळ

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकBhusawalभुसावळ