शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

३० वर्षांनी खडसेंविना नियोजन समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 12:54 IST

जळगाव : जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मात्र तब्बल ३० वर्षांच्या कालखंडानंतर ...

जळगाव : जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मात्र तब्बल ३० वर्षांच्या कालखंडानंतर प्रथमच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा नियोजन समितीत नसल्याने त्यांची उणीव जाणवणार आहे. गेली पाच वर्ष व्यासपीठावर बसणारे माजी मंत्री गिरीश महाजन विरोधात बसलेले दिसणार आहेत. मात्र सोमवारच्या सभेत पालकमंत्र्यांनी महाजन यांनाही आग्रहाने व्यासपीठावर बोलावून घेतले. त्यामुळे खडसेंच्या अनुपस्थितीत महाजन त्यांची जागा भरून काढतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.नवीन समिती नवीन चेहरेया नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण, आमदार शिरीष चौधरी हे नवीन चेहरेही दिसून आले. नियोजन समितीच्या बैठकीत २ आमदार केवळ सदस्य असून उर्वरीत आमदार निमंत्रीत सदस्य आहेत. नवीन सदस्यांमधील आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्यातील प्रश्न मांडले. तर जुन्याच सदस्यांपैकी आमदार किशोर पाटील, संजय सावकारे, आमदार स्मिता वाघ व अन्य काही सदस्यांनी विषय मांडले. तर माजी मंत्री गिरीश महाजन हे व्यासपीठावर असल्याने त्यांनी स्वत:हून काही विषय मांडणे टाळले. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाचा विषय मांडणाऱ्या वक्त्याचा अभाव बैठकीत जाणवला. मात्र खासदार रक्षा खडसे यांनी पीकविम्याचा तर खासदार उन्मेष पाटील यांनी टेक्सटाईल पार्कचा विषय मांडत ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला.वाढीव निधीसाठी आग्रही रहा-खडसेएकनाथराव खडसे हे तब्बल ३० वर्ष जिल्हा नियोजन समितीचे सदस्य होते. त्यामुळे त्यांना या समितीच्या कामकाजाचा पूर्ण अंदाज आलेला होता. याबाबत खडसे यांनी सांगितले की, जिल्ह्याचा नियोजनचा निधी हा कमी पडतो. त्या तुलनेत मागण्या अधिक असतात. त्यामुळे अधिकचा निधी शासनाकडून आणण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. ती जबाबदारी पालकमंत्र्यांची असते. दरवर्षी तसा १०-२० कोटींचा वाढीव निधी मिळविला जातो. मात्र खडसे, गुलाबराव देवकर किंवा सावकारे पालकमंत्री असतानाच्या काळात सुमारे १००-१०० कोटींचा वाढीव निधी मिळविला गेला. त्यासाठी आग्रह धरला पाहिजे. तसेच दिलेले पैसे वेळेत खर्च झाले पाहिजे. ९० टक्क्यांच्यावर निधी खर्च झाला तर नियोजन समितीचे काम प्रभावी आहे, असे मानले जाते. हे काम प्रभावी होण्यासाठी पालकमंत्र्यांनी सगळ्या विभागांना कामाला लावणे गरजेचे आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव