शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
3
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
5
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
6
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
7
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
8
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
9
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
10
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
11
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
12
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
13
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
14
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
15
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
16
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
17
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
18
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
19
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
20
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?

३० वर्षांनी खडसेंविना नियोजन समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 12:54 IST

जळगाव : जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मात्र तब्बल ३० वर्षांच्या कालखंडानंतर ...

जळगाव : जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मात्र तब्बल ३० वर्षांच्या कालखंडानंतर प्रथमच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा नियोजन समितीत नसल्याने त्यांची उणीव जाणवणार आहे. गेली पाच वर्ष व्यासपीठावर बसणारे माजी मंत्री गिरीश महाजन विरोधात बसलेले दिसणार आहेत. मात्र सोमवारच्या सभेत पालकमंत्र्यांनी महाजन यांनाही आग्रहाने व्यासपीठावर बोलावून घेतले. त्यामुळे खडसेंच्या अनुपस्थितीत महाजन त्यांची जागा भरून काढतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.नवीन समिती नवीन चेहरेया नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण, आमदार शिरीष चौधरी हे नवीन चेहरेही दिसून आले. नियोजन समितीच्या बैठकीत २ आमदार केवळ सदस्य असून उर्वरीत आमदार निमंत्रीत सदस्य आहेत. नवीन सदस्यांमधील आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्यातील प्रश्न मांडले. तर जुन्याच सदस्यांपैकी आमदार किशोर पाटील, संजय सावकारे, आमदार स्मिता वाघ व अन्य काही सदस्यांनी विषय मांडले. तर माजी मंत्री गिरीश महाजन हे व्यासपीठावर असल्याने त्यांनी स्वत:हून काही विषय मांडणे टाळले. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाचा विषय मांडणाऱ्या वक्त्याचा अभाव बैठकीत जाणवला. मात्र खासदार रक्षा खडसे यांनी पीकविम्याचा तर खासदार उन्मेष पाटील यांनी टेक्सटाईल पार्कचा विषय मांडत ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला.वाढीव निधीसाठी आग्रही रहा-खडसेएकनाथराव खडसे हे तब्बल ३० वर्ष जिल्हा नियोजन समितीचे सदस्य होते. त्यामुळे त्यांना या समितीच्या कामकाजाचा पूर्ण अंदाज आलेला होता. याबाबत खडसे यांनी सांगितले की, जिल्ह्याचा नियोजनचा निधी हा कमी पडतो. त्या तुलनेत मागण्या अधिक असतात. त्यामुळे अधिकचा निधी शासनाकडून आणण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. ती जबाबदारी पालकमंत्र्यांची असते. दरवर्षी तसा १०-२० कोटींचा वाढीव निधी मिळविला जातो. मात्र खडसे, गुलाबराव देवकर किंवा सावकारे पालकमंत्री असतानाच्या काळात सुमारे १००-१०० कोटींचा वाढीव निधी मिळविला गेला. त्यासाठी आग्रह धरला पाहिजे. तसेच दिलेले पैसे वेळेत खर्च झाले पाहिजे. ९० टक्क्यांच्यावर निधी खर्च झाला तर नियोजन समितीचे काम प्रभावी आहे, असे मानले जाते. हे काम प्रभावी होण्यासाठी पालकमंत्र्यांनी सगळ्या विभागांना कामाला लावणे गरजेचे आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव