शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

१९ तासांनंतर कोकण रेल्वे सुरू

By admin | Updated: May 6, 2014 00:10 IST

दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातानंतर तब्बल १९ तासांनंतर सोमवारी पहाटे कोकण रेल्वे सुरू झाली.

मृतांची संख्या २२ मुंबई : दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातानंतर तब्बल १९ तासांनंतर सोमवारी पहाटे कोकण रेल्वे सुरू झाली. तर, जखमींपैकी आणखी तिघांचा सोमवारी मृत्यू झाल्याने या भीषण अपघातातील मृतांची संख्या आता २२ झाली आहे.ॲक्सिडंट रिलीफ ट्रेन, ॲक्सिडंट रिलीफ मेडिकल व्हॅन, पोकलेन, डीप लॉरी, क्रेन अशा साहित्यांसह तब्बल १०० पेक्षा जास्त कर्मचारी आणि कामगार रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे काम करत होते. १९ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रेल्वे ट्रॅक सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र तसेच या मार्गावरून सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर पहाटे साडेपाचच्या सुमारास लोकमान्य टिळक टर्मिनसच्या दिशेने येणारी मालगाडी धावली आणि ती सुरक्षितरित्या ट्रॅकवरुन गेल्याचे दिसताच सगळ्या रेल्वे कर्मचार्‍यांनी सुटकेचा निश्वास टाकला. सकाळी नऊच्या सुमारास रत्नागिरी-दादर पॅसेंजर आणि इतर एक्स्प्रेस गाड्या गेल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या अपघातातील तिघांचा सोमवारी मृत्यू झाला. त्यापैकी दोघांची ओळख पटली आहे. गणेश नारायण चव्हाण (३२, ठाणे) आणि अतुल अशोक करविले (२६, पनवेल) अशी या मृतांची नावे आहेत. (प्रतिनिधी)