शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनातील गतीमानता हरपतेय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 18:29 IST

जिल्हाधिकारी-ग्रामसेवकांमधील वादातून शेतकऱ्यांसाठीच्या शासकीय योजनांमधील झारीचे शुक्राचार्य अधोरेखित, निंबोलचा दरोडा, भादलीतील हत्याकांड, रोजच्या चोºया, खाकी वर्दीवरील डाग या घटनांमुळे जातोय चुकीचा संदेश

मिलिंद कुलकर्णीकेंद्र आणि राज्य सरकारने जनतेसाठी राबविलेल्या महत्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी करण्यात प्रशासन कमी पडत असल्याचा सार्वत्रिक अनुभव सध्या येत आहे. वरिष्ठ अधिकारी तालुका पातळीवर जाऊन आढावा, पाठपुरावा करीत असताना प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी यंत्रणा, घटक मात्र निरुत्साही, उदासीन आणि परिणामी निष्क्रिय दिसून येत आहे. केवळ या यंत्रणेवर ठपका ठेवण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद आणि समन्वय साधून त्यांच्या मागण्या, अपेक्षादेखील समजून घ्यायला हव्यात. असे घडले तर जिल्हाधिकारी-ग्रामसेवकांमधील वादासारखे प्रसंग घडणार नाहीत.सरकार आणि प्रशासन ही राज्य सत्तेच्या रथाची दोन चाके आहेत. दोघांनी हातात हात घेऊन समन्वयाने आणि संवादाने काम केल्यास सुरळीत आणि सुव्यवस्थित कारभार चालतो. कुठे तरी अडचणी निर्माण झाल्यास कुरबुरी वाढतात. खडखडाट, गडगडाट होऊ लागतो.गतिमान प्रशासन ही प्रत्येक सरकारची आवडती घोषणा असते. ही आदर्श संकल्पना आहे. प्रत्यक्षात तसे असतेच असे नाही. दोन जुने प्रसंग यानिमित्ताने आठवले. गेल्यावेळेच्या काँग्रेस आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारावर राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती. सरकारला ‘धोरणलकवा’ झाल्याचा शब्दप्रयोग त्यांनी केला होता. चव्हाण हे निर्णय घेताना अतीशय सावधपणे वागत असत. उथळ आणि लोकप्रिय घोषणांपेक्षा वास्तवदर्शी व पारदर्शी कारभारावर त्यांचा भर होता. पण पवार यांनी राजकीय अंगाने ही टीका केली होती. त्याच्या कारणांच्या खोलात आता जाऊ नये. परंतु, स्वकीय नेत्याने सरकारच्या कारभारावर केलेली टीका म्हणून ती इतिहासात नोंदवली गेलीच.दुसरे उदाहरण : भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या वेळकाढू आणि संथ पध्दतीवर टीका केली होती. प्रशासनाचा प्रमुख अशी टीका करतो, याची गंभीर दखल जशी घेतली गेली, त्यासोबतच प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यात मुख्यमंत्री आणि सरकार अपयशी ठरत असल्याची टीका देखील झाली.देश आणि राज्यातील भाजप सरकारने जनतेसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली. एका दशकानंतर सत्तेवर आलेल्या भाजप सरकारकडे प्रचंड उत्साह असल्याने या घोषणा झाल्या, पण अंमलबजावणी करणाºया यंत्रणेची क्षमता, शक्ती, आवाका यांचा पुरेसा अभ्यास न करता हे घडल्याने योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला नसल्याची ओरड झाली. विविध शासकीय योजनांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय झाला. परंतु, बहुसंख्य राष्टÑीयकृत बँकांमध्ये अपुरे मनुष्यबळ, संगणक आणि इंटरनेटची कमकुवत सुविधा अशा पायाभूत सुविधा अभावी खाते उघडण्यासाठी मोठा कालावधी लागू लागला. तीच पीक कर्जाची स्थिती आहे. एकीकडे बँकांना थकबाकीसाठी रिझर्व्ह बँकेचे निकष पाळायचे बंधन असताना दुसरीकडे पीक कर्ज वाटपाचा रेटा लावला जातो, ही दुटप्पी नीती बँका कशा स्विकारणार? लोकप्रिय घोषणा आणि अंमलबजावणीतील वास्तव यात अंतर निर्माण झाल्याने परिस्थिती बिकट झाली.गुन्हेगारीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अनेक गुन्ह्यांची उकल होत नाही. खाकी वर्दीवर गुन्हे दाखल होत आहे. हे सगळे आश्चर्यजनक आहे. महसूल, बांधकाम, सिंचन, वन, दळणवळण असा सगळ्याच विभागात गतिमानता हरपली आहे. मंत्री आणि लोकप्रतिनिधींचा प्रशासनाशी संवाद आणि समन्वय नाही. त्याचा परिणाम जनतेला भोगावा लागत आहे.कृषीप्रधान देश असल्याने शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, वादळ, रोगराई अशा संकटांचा फटका बसलेल्या शेतकºयाला नुकसानभरपाई, मदतीचा हात देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. परंतु, पंचनाम्यापासूनच नकारघंटा सुरु होते ती प्रत्यक्ष अनुदान बँक खात्यात जमा होईपर्यंत कायम राहते. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी हे सगळे भूमिपूत्र, शेतकऱ्यांची मुले असताना शेतकºयाला मदतीच्यावेळी हात आखडता का घेतला जातो, या प्रश्नाचे कोडे उलगडलेले नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव