शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
2
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
3
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
4
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
5
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
8
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
9
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
10
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
11
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
12
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
13
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
14
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
15
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
16
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
17
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
18
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
19
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
20
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!

चाळीसगाव तालुक्यात कोरोनाची लाट रोखण्यात प्रशासनाला अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:12 IST

कोरोनाची दुसरी लाट प्रशासनाने खऱ्या अर्थाने गांभीर्याने घेतली होती काय? असती तर ही परिस्थिती ओढवली गेली नसती. असे ...

कोरोनाची दुसरी लाट प्रशासनाने खऱ्या अर्थाने गांभीर्याने घेतली होती काय? असती तर ही परिस्थिती ओढवली गेली नसती. असे संख्येवरून जाणवू लागले आहे. चाळीसगाव तालुक्यात आतापर्यंत एकूण ९ हजार ३७३ कोरोनाबाधित रुग्ण होते. त्यापैकी १२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर आठशेपेक्षा जास्त रुग्ण कोरोनाशी रुग्णालयात लढा देत आहेत, अशी भयावह परिस्थिती आहे. दररोज ही संख्या वाढतच आहे, त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे.

लोक उशिराने उपचारासाठी येतात, असे बोलले जात असले तरी दुसरीकडे मात्र चाचणी अहवाल उशिराने मिळणे, खाटा उपलब्ध नसणे, ऑक्सिजनची कमतरता, औषधी न मिळणे अशी अनेक कारणे आहेत. ज्यामुळे रुग्णांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

सद्यस्थितीत प्रशासनाकडून कुठलीही प्रभावी यंत्रणा न राबविता केवळ लॉकडाऊनचे नियम व संचारबंदी अशा पर्यायांवर काम केले जात आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात जी प्रभावी यंत्रणा राबवली होती, ती यंत्रणा या टप्प्यात राबविताना दिसून येत नाही. फवारणी तसेच रुग्ण शोधमोहीम देखील केवळ नावालाच ठरत आहे. रुग्णांच्या संपर्कातील आलेल्या नागरिकांचा शोध घेणे, प्रतिबंधित क्षेत्रात अधिक लक्ष घालून तो परिसर सील करणे, अशी प्रभावी यंत्रणा कुठेही राबविताना दिसत नाही. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना याबाबत खबरदारी घेतली जात नसल्याचे पाहावयास मिळत आहे. पहिल्या टप्प्यात गल्लोगल्लीमध्ये फवारणी करण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यात रुग्णसंख्या वाढली असतानाही अनेक भागांमध्ये फवारणी करताना पाहायलाही मिळाली नाही. स्वच्छता, साफसफाई केली जात नाही.

कोरोना महामारीमुळे बेड्‌स, ऑक्सिजन, अत्यावश्यक औषधे व चाचण्यांसाठी मदतीच्या याचनाही सोशल मीडियाद्वारे केल्या आहेत. औषधी काळ्याबाजारात विकली जात आहेत. लसीकरणाचा तुटवडा जाणवू लागला आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचे सामान्य जनतेसाठी सातत्याने कान उपटले पाहिजेत, प्रशासकीय यंत्रणेतील दोष निर्मूलन करून सुधारणा व्हायला हव्यात. मात्र, या तालुक्यात तसे घडले नाही. त्यामुळे ‘बुडत्याचे पाय खोलात’, अशी भयावह परिस्थिती येथे निर्माण झाली आहे. त्यासाठी निष्क्रिय यंत्रणेचा बेंड काढून अचूक नियोजनाची संजीवनी देऊन चाळीसगाव तालुका यातून वाचविण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. महसूल, पोलीस, नगरपालिका व आरोग्य विभागाचा समन्वय झाल्याशिवाय कोरोनावर मात करणे अवघड आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

चाळीसगाव वार्तापत्र