शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

चाळीसगाव तालुक्यात कोरोनाची लाट रोखण्यात प्रशासनाला अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:12 IST

कोरोनाची दुसरी लाट प्रशासनाने खऱ्या अर्थाने गांभीर्याने घेतली होती काय? असती तर ही परिस्थिती ओढवली गेली नसती. असे ...

कोरोनाची दुसरी लाट प्रशासनाने खऱ्या अर्थाने गांभीर्याने घेतली होती काय? असती तर ही परिस्थिती ओढवली गेली नसती. असे संख्येवरून जाणवू लागले आहे. चाळीसगाव तालुक्यात आतापर्यंत एकूण ९ हजार ३७३ कोरोनाबाधित रुग्ण होते. त्यापैकी १२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर आठशेपेक्षा जास्त रुग्ण कोरोनाशी रुग्णालयात लढा देत आहेत, अशी भयावह परिस्थिती आहे. दररोज ही संख्या वाढतच आहे, त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे.

लोक उशिराने उपचारासाठी येतात, असे बोलले जात असले तरी दुसरीकडे मात्र चाचणी अहवाल उशिराने मिळणे, खाटा उपलब्ध नसणे, ऑक्सिजनची कमतरता, औषधी न मिळणे अशी अनेक कारणे आहेत. ज्यामुळे रुग्णांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

सद्यस्थितीत प्रशासनाकडून कुठलीही प्रभावी यंत्रणा न राबविता केवळ लॉकडाऊनचे नियम व संचारबंदी अशा पर्यायांवर काम केले जात आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात जी प्रभावी यंत्रणा राबवली होती, ती यंत्रणा या टप्प्यात राबविताना दिसून येत नाही. फवारणी तसेच रुग्ण शोधमोहीम देखील केवळ नावालाच ठरत आहे. रुग्णांच्या संपर्कातील आलेल्या नागरिकांचा शोध घेणे, प्रतिबंधित क्षेत्रात अधिक लक्ष घालून तो परिसर सील करणे, अशी प्रभावी यंत्रणा कुठेही राबविताना दिसत नाही. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना याबाबत खबरदारी घेतली जात नसल्याचे पाहावयास मिळत आहे. पहिल्या टप्प्यात गल्लोगल्लीमध्ये फवारणी करण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यात रुग्णसंख्या वाढली असतानाही अनेक भागांमध्ये फवारणी करताना पाहायलाही मिळाली नाही. स्वच्छता, साफसफाई केली जात नाही.

कोरोना महामारीमुळे बेड्‌स, ऑक्सिजन, अत्यावश्यक औषधे व चाचण्यांसाठी मदतीच्या याचनाही सोशल मीडियाद्वारे केल्या आहेत. औषधी काळ्याबाजारात विकली जात आहेत. लसीकरणाचा तुटवडा जाणवू लागला आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचे सामान्य जनतेसाठी सातत्याने कान उपटले पाहिजेत, प्रशासकीय यंत्रणेतील दोष निर्मूलन करून सुधारणा व्हायला हव्यात. मात्र, या तालुक्यात तसे घडले नाही. त्यामुळे ‘बुडत्याचे पाय खोलात’, अशी भयावह परिस्थिती येथे निर्माण झाली आहे. त्यासाठी निष्क्रिय यंत्रणेचा बेंड काढून अचूक नियोजनाची संजीवनी देऊन चाळीसगाव तालुका यातून वाचविण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. महसूल, पोलीस, नगरपालिका व आरोग्य विभागाचा समन्वय झाल्याशिवाय कोरोनावर मात करणे अवघड आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

चाळीसगाव वार्तापत्र