शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

चाळीसगाव तालुक्यात कोरोनाची लाट रोखण्यात प्रशासनाला अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:12 IST

कोरोनाची दुसरी लाट प्रशासनाने खऱ्या अर्थाने गांभीर्याने घेतली होती काय? असती तर ही परिस्थिती ओढवली गेली नसती. असे ...

कोरोनाची दुसरी लाट प्रशासनाने खऱ्या अर्थाने गांभीर्याने घेतली होती काय? असती तर ही परिस्थिती ओढवली गेली नसती. असे संख्येवरून जाणवू लागले आहे. चाळीसगाव तालुक्यात आतापर्यंत एकूण ९ हजार ३७३ कोरोनाबाधित रुग्ण होते. त्यापैकी १२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर आठशेपेक्षा जास्त रुग्ण कोरोनाशी रुग्णालयात लढा देत आहेत, अशी भयावह परिस्थिती आहे. दररोज ही संख्या वाढतच आहे, त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे.

लोक उशिराने उपचारासाठी येतात, असे बोलले जात असले तरी दुसरीकडे मात्र चाचणी अहवाल उशिराने मिळणे, खाटा उपलब्ध नसणे, ऑक्सिजनची कमतरता, औषधी न मिळणे अशी अनेक कारणे आहेत. ज्यामुळे रुग्णांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

सद्यस्थितीत प्रशासनाकडून कुठलीही प्रभावी यंत्रणा न राबविता केवळ लॉकडाऊनचे नियम व संचारबंदी अशा पर्यायांवर काम केले जात आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात जी प्रभावी यंत्रणा राबवली होती, ती यंत्रणा या टप्प्यात राबविताना दिसून येत नाही. फवारणी तसेच रुग्ण शोधमोहीम देखील केवळ नावालाच ठरत आहे. रुग्णांच्या संपर्कातील आलेल्या नागरिकांचा शोध घेणे, प्रतिबंधित क्षेत्रात अधिक लक्ष घालून तो परिसर सील करणे, अशी प्रभावी यंत्रणा कुठेही राबविताना दिसत नाही. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना याबाबत खबरदारी घेतली जात नसल्याचे पाहावयास मिळत आहे. पहिल्या टप्प्यात गल्लोगल्लीमध्ये फवारणी करण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यात रुग्णसंख्या वाढली असतानाही अनेक भागांमध्ये फवारणी करताना पाहायलाही मिळाली नाही. स्वच्छता, साफसफाई केली जात नाही.

कोरोना महामारीमुळे बेड्‌स, ऑक्सिजन, अत्यावश्यक औषधे व चाचण्यांसाठी मदतीच्या याचनाही सोशल मीडियाद्वारे केल्या आहेत. औषधी काळ्याबाजारात विकली जात आहेत. लसीकरणाचा तुटवडा जाणवू लागला आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचे सामान्य जनतेसाठी सातत्याने कान उपटले पाहिजेत, प्रशासकीय यंत्रणेतील दोष निर्मूलन करून सुधारणा व्हायला हव्यात. मात्र, या तालुक्यात तसे घडले नाही. त्यामुळे ‘बुडत्याचे पाय खोलात’, अशी भयावह परिस्थिती येथे निर्माण झाली आहे. त्यासाठी निष्क्रिय यंत्रणेचा बेंड काढून अचूक नियोजनाची संजीवनी देऊन चाळीसगाव तालुका यातून वाचविण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. महसूल, पोलीस, नगरपालिका व आरोग्य विभागाचा समन्वय झाल्याशिवाय कोरोनावर मात करणे अवघड आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

चाळीसगाव वार्तापत्र