शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाचा कारभार बिबट्यांच्या जीवाशी

By admin | Updated: July 1, 2014 14:45 IST

वाघांची संख्या घटल्याने बिबट्यांच्या शिकारीकडे तस्कर वळले आहेत. सुस्त आणि गाफील प्रशासनाची मेख ओळखून शिकारी वनांमध्ये सक्रीय झाले आहेत.

आता बिबटे बनले लक्ष्य
वाघांची संख्या घटल्याने बिबट्यांच्या शिकारीकडे तस्कर वळले आहेत. सुस्त आणि गाफील प्रशासनाची मेख ओळखून शिकारी वनांमध्ये सक्रीय झाले आहेत. वाघांची संख्या कमी झाल्याने बिबट्याच्या कातडीला बाजारात चांगली मागणी आहे. शौकीन यासाठी मागेल ती किंमत मोजायला तयार असतात. जळगाव : जिल्ह्यातील बिबट्यांचा अधिवास प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धोक्यात सापडला आहे. कातडीच्या तस्करीसाठी यांची शिकार होत असून त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर वन विभागाने तातडीने संवर्धन मोहीम हाती घेतली पाहिजे, अशी अपेक्षा पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे. 
या महिन्यात बिबट्याच्या कातडीच्या तस्करीच्या दोन घटना समोर आल्या आहेत. प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे जिल्ह्यातील यावल अभयारण्य, यावल वनविभाग, मुक्ताईनगर वनविभाग आणि चोपडा वनक्षेत्रातील बिबट्यांचा अधिवास धोक्यात सापडला असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे.
वन्यजीवांच्या संवर्धन आणि विकासाकरिता वन विभाग उदासिन असल्याने त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रशासनाचा नाकर्तेपणा मुक्या जीवांवर बेतत असून वरिष्ठ अधिकारीदेखील याची दखल घ्यायला तयार दिसत नाही. स्थानिक अधिकर्‍यांना वरिष्ठांचा धाक नसल्याने ते आपला मनमानी कारभार करीत आहेत. अशीच अवस्था कायम राहिल्यास जिल्ह्यातील वन्यजीवांचे अस्तित्व कायमचे नामशेष होईल. 
प्रशासनाने वेळोवेळी आपली भूमिका निभावण्याचे टाळल्याने यावल अभयारण्य आणि यावल वनविभागाची वाट लागली. तसेच व्याघ्र संवर्धन प्रकल्पातील डोलारखेडा येथे मोठी वृक्षतोड झाली. या सर्व घडामोडी ताज्या असतानाच गुरुवारी चोपडा तालुक्यातील मेलाणे या गावात एका गुन्हेगारास बिबट्याच्या कातडीसह अटक केली. वन विभागाची उदासिन कारभाराचे हे उत्तम उदाहरण ठरेल. याअगोदर याच महिन्यात १२ जून रोजी यावल तालुक्यात एकला बिबट्याच्या कातडीसह पकडले होते.
वन आणि वन्यजीवांची अनास्था पर्यावरण विकास आणि संवर्धनाला हानीकारक आहे. अपवाद वगळता स्थानिक आदिवासी आणि राजकीय नेत्यांच्या रोष स्वत:वर ओढवून घेण्याची हिम्मत वन विभागाने दाखविलेली नाही. त्यामुळे आज बिबट्याचा अधिवास धोक्यात आला आहे. 
आजरोजी यावल अभयारण्य, यावल वनविभाग, मुक्ताईनगर वन विभाग आणि चोपडा वनक्षेत्रात जवळ-जवळ २५ ते ३0 बिबटे आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न न झाल्यास कातडी तस्करीच्या घटना घडत राहतील हे निश्‍चित.
 
या आहेत कमतरता
■ गस्त घालण्यात कामचुकारपणा 
■ सुस्त अधिकारी
■ अप्रशिक्षित कर्मचारी
 ■ कर्मचार्‍यांची रिक्त पदे
■ मागासलेले तंत्रज्ञान आणि कार्यपद्धती
 
आता बिबटे बनले लक्ष्य
वाघांची संख्या घटल्याने बिबट्यांच्या शिकारीकडे तस्कर वळले आहेत. सुस्त आणि गाफील प्रशासनाची मेख ओळखून शिकारी वनांमध्ये सक्रीय झाले आहेत. वाघांची संख्या कमी झाल्याने बिबट्याच्या कातडीला बाजारात चांगली मागणी आहे. शौकीन यासाठी मागेल ती किंमत मोजायला तयार असतात.