शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

तर अंजनी धरणात अतिरिक्त पाणीसाठा होणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:20 IST

अंजनी धरणाच्या उंचीच्या अर्ध्या भागापर्यंत पाणी साठवून त्या भागातील येणाऱ्या सोनबर्डी, हनुमंत खेडे, मजरे गावांचे व शेतीचे काही प्रमाणात ...

अंजनी धरणाच्या उंचीच्या अर्ध्या भागापर्यंत पाणी साठवून त्या भागातील येणाऱ्या सोनबर्डी, हनुमंत खेडे, मजरे गावांचे व शेतीचे काही प्रमाणात पुनर्वसन केले तर ७ ते ८ दलघमी अतिरिक्त पाणीसाठा मिळू शकतो. या अतिरिक्त पाणीसाठ्यामुळे जवळपास ७०० ते ८०० हेक्टर जास्तीची शेतजमीन सिंचनाखाली येऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे. गेल्या दोन वर्षांपासून अतिरिक्त पाणी अंजनी नदीपात्रात सोडण्यात येऊन ते वाया गेले. या वाया गेलेल्या पाण्याचा शेतजमिनीसाठी उपयोग होऊ शकतो. वास्तविक अंजनी धरणाचे काम वाढीव उंचीनुसार करण्यात आलेले आहे, परंतु प्रत्यक्षात वाढीव उंचीनुसार अंजनी धरणात पाणीसाठा केला जात नाही. धरणामध्ये अतिरिक्त साठा केल्यास सुमारे ५०० हेक्टर जमीन ओलिताखाली येऊ शकते. या अनुषंगाने वाढीव पाणीसाठा केलेल्या उंचीनुसार विचार करता सोनबर्डी, हनुमंत खेडे, मजरे या गावांचे अंशतः पुनर्वसन करावे लागणार आहे

अंजनी धरणात अतिरिक्त पाणीसाठा केल्यास पुनर्वसन व शेतजमीन ताब्यात घेणे सोपे होईल व वाढीव उंचीसाठी धरणाच्या केलेल्या बांधकामाचा लाभ होऊ शकेल. येथील पुनर्वसनाची बाब सोडता जामदा कालवा, विस्तारीकरण व इतर अनुषंगिक बाबींवर होणारा खर्च वाचणार आहे. अंजनी पाणलोट क्षेत्रामधील शंभर टक्के पाणी अंजनी धरणातच साठवा, अशी मागणी जोर धरत आहे. अतिरिक्त वाया जाणारे पाणी साठवण्याची नितांत गरज आहे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व स्थानिक आमदार चिमणराव पाटील यांनी पुढाकार घेऊन शेती सिंचनासाठी अंजनी धरणात अतिरिक्त जलसाठा करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. अंजनी धरणामुळे एरंडोल व धरणगाव या दोन्ही तालुक्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. याशिवाय दोन्ही तालुक्यांचा कायापालट होऊन शेतीला खूपच लाभ होणार आहे.

---

बी. एस. चौधरी