शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

तर अंजनी धरणात अतिरिक्त पाणीसाठा होणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:20 IST

अंजनी धरणाच्या उंचीच्या अर्ध्या भागापर्यंत पाणी साठवून त्या भागातील येणाऱ्या सोनबर्डी, हनुमंत खेडे, मजरे गावांचे व शेतीचे काही प्रमाणात ...

अंजनी धरणाच्या उंचीच्या अर्ध्या भागापर्यंत पाणी साठवून त्या भागातील येणाऱ्या सोनबर्डी, हनुमंत खेडे, मजरे गावांचे व शेतीचे काही प्रमाणात पुनर्वसन केले तर ७ ते ८ दलघमी अतिरिक्त पाणीसाठा मिळू शकतो. या अतिरिक्त पाणीसाठ्यामुळे जवळपास ७०० ते ८०० हेक्टर जास्तीची शेतजमीन सिंचनाखाली येऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे. गेल्या दोन वर्षांपासून अतिरिक्त पाणी अंजनी नदीपात्रात सोडण्यात येऊन ते वाया गेले. या वाया गेलेल्या पाण्याचा शेतजमिनीसाठी उपयोग होऊ शकतो. वास्तविक अंजनी धरणाचे काम वाढीव उंचीनुसार करण्यात आलेले आहे, परंतु प्रत्यक्षात वाढीव उंचीनुसार अंजनी धरणात पाणीसाठा केला जात नाही. धरणामध्ये अतिरिक्त साठा केल्यास सुमारे ५०० हेक्टर जमीन ओलिताखाली येऊ शकते. या अनुषंगाने वाढीव पाणीसाठा केलेल्या उंचीनुसार विचार करता सोनबर्डी, हनुमंत खेडे, मजरे या गावांचे अंशतः पुनर्वसन करावे लागणार आहे

अंजनी धरणात अतिरिक्त पाणीसाठा केल्यास पुनर्वसन व शेतजमीन ताब्यात घेणे सोपे होईल व वाढीव उंचीसाठी धरणाच्या केलेल्या बांधकामाचा लाभ होऊ शकेल. येथील पुनर्वसनाची बाब सोडता जामदा कालवा, विस्तारीकरण व इतर अनुषंगिक बाबींवर होणारा खर्च वाचणार आहे. अंजनी पाणलोट क्षेत्रामधील शंभर टक्के पाणी अंजनी धरणातच साठवा, अशी मागणी जोर धरत आहे. अतिरिक्त वाया जाणारे पाणी साठवण्याची नितांत गरज आहे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व स्थानिक आमदार चिमणराव पाटील यांनी पुढाकार घेऊन शेती सिंचनासाठी अंजनी धरणात अतिरिक्त जलसाठा करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. अंजनी धरणामुळे एरंडोल व धरणगाव या दोन्ही तालुक्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. याशिवाय दोन्ही तालुक्यांचा कायापालट होऊन शेतीला खूपच लाभ होणार आहे.

---

बी. एस. चौधरी